शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जि.प. सदस्य, नगरसेवकांकडून आदेश झुगारून उमेदवारी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 16:28 IST

मतदान होणार असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली: ग्रामीण गटात भाजपा ठरणार किंगमेकर

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रिया राबवावी लागणारमतदानात पसंतीक्रम असल्याने मतमोजणीची प्रक्रियाही किचकटजाहीर माघार घेतली तरी प्रशासनाला निवडणुकीची प्रक्रिया करावीच लागणार

लोकमत आॅनलाईन जळगाव, दि.२९- जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) निवडणुकीत विविध पक्षाच्या गटनेत्यांनी तसेच वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील काही जि.प. सदस्य व नगरसेवकांना माघार घेण्याचे आदेश देऊनही ते आदेश झुगारून या सदस्यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच डीपीडीसीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रिया राबवावी लागणार असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. २०१२-१३ मध्ये डीपीडीसीच्या निवडणुकीवेळी माघारीच्या मुदतीनंतरही माघारीचे प्रयत्न होऊन जवळपास सर्वच अतिरिक्त उमेदवारांनी जाहीर माघार घेतली होती. मात्र माघारीची मुदत उलटून गेली असल्याने मतदानाची औपचारीकता फक्त पार पाडावी लागली होती. मात्र यंदा जि.प. सदस्य व त्यापेक्षाही पालिका गटात नगरसेवकांनी वरिष्ठांचे आदेश धुडकावत उमेदवारी कायम ठेवली आहे. पालिका गटात ७ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीची मुदत संपलेली असल्याने आता जाहीर माघार घेतली तरी प्रशासनाला निवडणुकीची प्रक्रिया करावीच लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला तहसील कार्यालयात मतदान केंद्र करावे लागेल. तसेच मतदानात पसंतीक्रम असल्याने मतमोजणीची प्रक्रियाही किचकट राहील. ग्रामीण गटात भाजपा किंगमेकर ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निवडणक होणार आहे. यासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील दोघे राष्टÑवादीचे उमेदवार असून एक उमेदवार शिवसेनेचा आहे. वास्तविक गटनेत्यांच्या बैठकीत या दोन पैकी एका जागेवरच राष्टÑवादीने उमेदवार द्यायचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जि.प. सदस्यांनी आपसातील वादामुळे वरिष्ठांचे आदेश डावलत उमेदवारी कायम ठेवली आहे. मात्र राष्टÑवादीचेच सदस्य एक नंबर राष्टÑवादी तर दुसरा नंबर शिवसेनेला देणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे राष्टÑवादीचा तिसरा उमेदवार अडचणीत येणार आहे. मात्र भाजपानेही शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी पडद्याआडून ही खेळी केलेली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या तीन उमेदवारांमध्ये भाजपाचा उमेदवार नसल्याने भाजपाने जर राष्टÑवादीच्याच दोन्ही उमेदवारांना मतदान केले तर शिवसेनेचा उमेदवार पराभूत होऊ शकतो. त्यामुळेच कदाचित राष्टÑवादीच्या उमेदवारांनी तडजोडीत ठरलेले असतानाही माघार घेतली नसावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.