शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

जि.प. सदस्य, नगरसेवकांकडून आदेश झुगारून उमेदवारी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 16:28 IST

मतदान होणार असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली: ग्रामीण गटात भाजपा ठरणार किंगमेकर

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रिया राबवावी लागणारमतदानात पसंतीक्रम असल्याने मतमोजणीची प्रक्रियाही किचकटजाहीर माघार घेतली तरी प्रशासनाला निवडणुकीची प्रक्रिया करावीच लागणार

लोकमत आॅनलाईन जळगाव, दि.२९- जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) निवडणुकीत विविध पक्षाच्या गटनेत्यांनी तसेच वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील काही जि.प. सदस्य व नगरसेवकांना माघार घेण्याचे आदेश देऊनही ते आदेश झुगारून या सदस्यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच डीपीडीसीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रिया राबवावी लागणार असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. २०१२-१३ मध्ये डीपीडीसीच्या निवडणुकीवेळी माघारीच्या मुदतीनंतरही माघारीचे प्रयत्न होऊन जवळपास सर्वच अतिरिक्त उमेदवारांनी जाहीर माघार घेतली होती. मात्र माघारीची मुदत उलटून गेली असल्याने मतदानाची औपचारीकता फक्त पार पाडावी लागली होती. मात्र यंदा जि.प. सदस्य व त्यापेक्षाही पालिका गटात नगरसेवकांनी वरिष्ठांचे आदेश धुडकावत उमेदवारी कायम ठेवली आहे. पालिका गटात ७ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीची मुदत संपलेली असल्याने आता जाहीर माघार घेतली तरी प्रशासनाला निवडणुकीची प्रक्रिया करावीच लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला तहसील कार्यालयात मतदान केंद्र करावे लागेल. तसेच मतदानात पसंतीक्रम असल्याने मतमोजणीची प्रक्रियाही किचकट राहील. ग्रामीण गटात भाजपा किंगमेकर ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निवडणक होणार आहे. यासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील दोघे राष्टÑवादीचे उमेदवार असून एक उमेदवार शिवसेनेचा आहे. वास्तविक गटनेत्यांच्या बैठकीत या दोन पैकी एका जागेवरच राष्टÑवादीने उमेदवार द्यायचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जि.प. सदस्यांनी आपसातील वादामुळे वरिष्ठांचे आदेश डावलत उमेदवारी कायम ठेवली आहे. मात्र राष्टÑवादीचेच सदस्य एक नंबर राष्टÑवादी तर दुसरा नंबर शिवसेनेला देणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे राष्टÑवादीचा तिसरा उमेदवार अडचणीत येणार आहे. मात्र भाजपानेही शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी पडद्याआडून ही खेळी केलेली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या तीन उमेदवारांमध्ये भाजपाचा उमेदवार नसल्याने भाजपाने जर राष्टÑवादीच्याच दोन्ही उमेदवारांना मतदान केले तर शिवसेनेचा उमेदवार पराभूत होऊ शकतो. त्यामुळेच कदाचित राष्टÑवादीच्या उमेदवारांनी तडजोडीत ठरलेले असतानाही माघार घेतली नसावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.