शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सदस्य, नगरसेवकांकडून आदेश झुगारून उमेदवारी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 16:28 IST

मतदान होणार असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली: ग्रामीण गटात भाजपा ठरणार किंगमेकर

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रिया राबवावी लागणारमतदानात पसंतीक्रम असल्याने मतमोजणीची प्रक्रियाही किचकटजाहीर माघार घेतली तरी प्रशासनाला निवडणुकीची प्रक्रिया करावीच लागणार

लोकमत आॅनलाईन जळगाव, दि.२९- जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) निवडणुकीत विविध पक्षाच्या गटनेत्यांनी तसेच वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील काही जि.प. सदस्य व नगरसेवकांना माघार घेण्याचे आदेश देऊनही ते आदेश झुगारून या सदस्यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच डीपीडीसीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रिया राबवावी लागणार असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. २०१२-१३ मध्ये डीपीडीसीच्या निवडणुकीवेळी माघारीच्या मुदतीनंतरही माघारीचे प्रयत्न होऊन जवळपास सर्वच अतिरिक्त उमेदवारांनी जाहीर माघार घेतली होती. मात्र माघारीची मुदत उलटून गेली असल्याने मतदानाची औपचारीकता फक्त पार पाडावी लागली होती. मात्र यंदा जि.प. सदस्य व त्यापेक्षाही पालिका गटात नगरसेवकांनी वरिष्ठांचे आदेश धुडकावत उमेदवारी कायम ठेवली आहे. पालिका गटात ७ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीची मुदत संपलेली असल्याने आता जाहीर माघार घेतली तरी प्रशासनाला निवडणुकीची प्रक्रिया करावीच लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला तहसील कार्यालयात मतदान केंद्र करावे लागेल. तसेच मतदानात पसंतीक्रम असल्याने मतमोजणीची प्रक्रियाही किचकट राहील. ग्रामीण गटात भाजपा किंगमेकर ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निवडणक होणार आहे. यासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील दोघे राष्टÑवादीचे उमेदवार असून एक उमेदवार शिवसेनेचा आहे. वास्तविक गटनेत्यांच्या बैठकीत या दोन पैकी एका जागेवरच राष्टÑवादीने उमेदवार द्यायचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जि.प. सदस्यांनी आपसातील वादामुळे वरिष्ठांचे आदेश डावलत उमेदवारी कायम ठेवली आहे. मात्र राष्टÑवादीचेच सदस्य एक नंबर राष्टÑवादी तर दुसरा नंबर शिवसेनेला देणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे राष्टÑवादीचा तिसरा उमेदवार अडचणीत येणार आहे. मात्र भाजपानेही शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी पडद्याआडून ही खेळी केलेली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या तीन उमेदवारांमध्ये भाजपाचा उमेदवार नसल्याने भाजपाने जर राष्टÑवादीच्याच दोन्ही उमेदवारांना मतदान केले तर शिवसेनेचा उमेदवार पराभूत होऊ शकतो. त्यामुळेच कदाचित राष्टÑवादीच्या उमेदवारांनी तडजोडीत ठरलेले असतानाही माघार घेतली नसावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.