शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

जि.प. सदस्य, नगरसेवकांकडून आदेश झुगारून उमेदवारी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 16:28 IST

मतदान होणार असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली: ग्रामीण गटात भाजपा ठरणार किंगमेकर

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रिया राबवावी लागणारमतदानात पसंतीक्रम असल्याने मतमोजणीची प्रक्रियाही किचकटजाहीर माघार घेतली तरी प्रशासनाला निवडणुकीची प्रक्रिया करावीच लागणार

लोकमत आॅनलाईन जळगाव, दि.२९- जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) निवडणुकीत विविध पक्षाच्या गटनेत्यांनी तसेच वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील काही जि.प. सदस्य व नगरसेवकांना माघार घेण्याचे आदेश देऊनही ते आदेश झुगारून या सदस्यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच डीपीडीसीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रिया राबवावी लागणार असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. २०१२-१३ मध्ये डीपीडीसीच्या निवडणुकीवेळी माघारीच्या मुदतीनंतरही माघारीचे प्रयत्न होऊन जवळपास सर्वच अतिरिक्त उमेदवारांनी जाहीर माघार घेतली होती. मात्र माघारीची मुदत उलटून गेली असल्याने मतदानाची औपचारीकता फक्त पार पाडावी लागली होती. मात्र यंदा जि.प. सदस्य व त्यापेक्षाही पालिका गटात नगरसेवकांनी वरिष्ठांचे आदेश धुडकावत उमेदवारी कायम ठेवली आहे. पालिका गटात ७ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीची मुदत संपलेली असल्याने आता जाहीर माघार घेतली तरी प्रशासनाला निवडणुकीची प्रक्रिया करावीच लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला तहसील कार्यालयात मतदान केंद्र करावे लागेल. तसेच मतदानात पसंतीक्रम असल्याने मतमोजणीची प्रक्रियाही किचकट राहील. ग्रामीण गटात भाजपा किंगमेकर ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निवडणक होणार आहे. यासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील दोघे राष्टÑवादीचे उमेदवार असून एक उमेदवार शिवसेनेचा आहे. वास्तविक गटनेत्यांच्या बैठकीत या दोन पैकी एका जागेवरच राष्टÑवादीने उमेदवार द्यायचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जि.प. सदस्यांनी आपसातील वादामुळे वरिष्ठांचे आदेश डावलत उमेदवारी कायम ठेवली आहे. मात्र राष्टÑवादीचेच सदस्य एक नंबर राष्टÑवादी तर दुसरा नंबर शिवसेनेला देणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे राष्टÑवादीचा तिसरा उमेदवार अडचणीत येणार आहे. मात्र भाजपानेही शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी पडद्याआडून ही खेळी केलेली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या तीन उमेदवारांमध्ये भाजपाचा उमेदवार नसल्याने भाजपाने जर राष्टÑवादीच्याच दोन्ही उमेदवारांना मतदान केले तर शिवसेनेचा उमेदवार पराभूत होऊ शकतो. त्यामुळेच कदाचित राष्टÑवादीच्या उमेदवारांनी तडजोडीत ठरलेले असतानाही माघार घेतली नसावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.