शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बळीराजावर दुहेरी संकट : एकीकडे अतिपाऊस, दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील सर्व गावातील पैसेवारी ५० पैशांच्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:40 IST

हंगामी पैसेवारी जाहीर

जळगाव : जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील १५०२ गावांची हंगामी पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या वर आहे. एकाही गावात ५० पैशांच्या आत पैैसेवारी नसल्याने एकाही गावामध्ये टंचाईचे निकष लागू होणार नसल्याचे संकेत असताना जिल्ह्यात अतिपावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हंगामही हातचा गेला आहे. त्यामुळे बळीराजावर हे दुहेरी संकट ओढवले गेले आहे.यंदा जिल्ह्यात पावसाने उशिरा हजेरी लावली तरी आॅगस्ट महिन्यापासून दमदार पाऊस होऊ लागल्याने तो जमिनीत मुरून पिकेही तरारली. त्यामुळे कोठेही कमी पाऊस नसल्याने पैसेवारी ५० पैशांच्यावर आहे. मात्र गेल्यावर्षी जो पाऊस झाला, त्यापैकी पूर यावा असा पाऊस मोजक्याच वेळी झाला होता. त्यानंतर पाण्याअभावी पिकांची स्थिती बिकट होत गेली व हंगामी पैसेवारीमध्ये एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या वर नसल्याची स्थिती समोर आली होती. मात्र यंदा दमदार पावसामुळे उलट चित्र असून ते सुखद असले तरी अतिपावसाने घात केला.जिल्ह्यातील जवळपास ६ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतिपावसामुळे नुकसान झालेले असताना दुसरीकडे एकाही गावाची गावाची पैसेवारी ५० पैशांच्या आत नाही. त्यामुळे ना दुष्काळी निकषाचा लाभ होणार ना पिके हाती येणार अशी स्थिती यंदा बळीराजाच्या नशिबी आली आहे. त्यात पंचनामे करण्याचे काम सुरू असले तरी पीक विमा असो की शासनाची मदत, ती किती व कधी पदरी पडते, याची चिंता बळीराजाला आहे.५० पैशांच्यावर हंगामी पैसेवारी असलेल्या गावांची तालुकानिहाय संख्याजळगाव - ९२, जामनेर - १५३, एरंडोल - ६५, धरणगाव - ८९, भुसावळ - ५४, यावल - ८४, रावेर - १२०, मुक्ताईनगर - ८१, बोदवड - ५१, पाचोरा - १२९, चाळीसगाव - १३६, भडगाव - ६३, अमळनेर - १५४, पारोळा - ११४, चोपडा - ११६.

टॅग्स :Jalgaonजळगाव