शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

कर्मचाऱ्यांना अखेर शिस्तीचे डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST

शासकीय काम आणि सहा महिने थांब ही म्हण मुद्दामहून प्रचलित झाली असे नाही, यामागे सामन्यांना येणारे नियमितचे अनुभव काम ...

शासकीय काम आणि सहा महिने थांब ही म्हण मुद्दामहून प्रचलित झाली असे नाही, यामागे सामन्यांना येणारे नियमितचे अनुभव काम करताना होत असलेला विलंब अगदी तासाभरात होणाऱ्या कामासाठी उद्या या, परवा या अशी उत्तरे आणि वारंवार चकरा मारूनही काम मार्गी न लागणे या बाबीतूनच या म्हणीचा जन्म झाला मात्र, प्रशासकीय यंत्रणेत हव्या तशा सुधारणा अद्यापही झालेल्या नाहीत. जिल्हा परिषद हा ग्रामीण यंत्रणेचा आत्मा आहे. या ठिकाणीही कामे खोळंबत असल्याची असंख्य उदाहरणे आहेत, सामान्यांशी वैयक्तिकरित्या निगडित ही यंत्रणा आहे. एका विभागातून दुसऱ्या विभागात मागितलेली माहिती ही दोन महिन्यांनी दिली जाते, यात कामाचा संथपणा किती याची तीव्रता आपल्याला समजते. या सर्व बाबी, शिस्तीचे पालन न करणे, नियमांचे पालन न होणे, कामापेक्षा गप्पा अधिक होणे, मोबाईलचा वापर अधिक होणे या बाबींची कुठेतरी अतिशयोक्ती होत होती. नवीन सीईओंच्या ते निदर्शनास आले आणि त्यांनी सोमवारी एक पत्रच काढले...वारंवार सांगूनही शिस्त लागत नसल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी या पत्रात स्पष्ट म्हटले आहे. सात दिवसांपेक्षा कुठलेही प्रकरण प्रलंबित राहता कामा नये, अशा स्पष्ट सूचना आता सर्व कर्मचाऱ्यांना आहेत, यावर विभागप्रमुखांचे नियोजन असणे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे. याचा जाब विभागप्रमुखांनाच विचारला जाणार आहे. त्यामुळे विभागप्रमुखांची जबाबदारी वाढणार आहे. डॉ. आशिया यांनी मांडलेल्या मुद्यावर गांभीर्याने काम झाल्यास जि. प खरेच एक आदर्श ठरेल...