शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

रेल्वेप्रवास नको रे बाबा; दररोज २०० ते २५० तिकिटे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:15 IST

कोरोना परिणाम : संसर्ग वाढू लागल्याने मुंबई- दिल्लीकडे जाणाऱ्यांची गर्दी ओसरली लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची दुसरी लाट ...

कोरोना परिणाम : संसर्ग वाढू लागल्याने मुंबई- दिल्लीकडे जाणाऱ्यांची गर्दी ओसरली

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. याचा रेल्वेच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला असून, मुंबई, पुणे व दिल्ली मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांकडून दररोज २०० ते २५० तिकिटे रद्द करण्यात येत आहेत. कोरोनाच्या भीतीने ‘रेल्वेप्रवास नको रे बाबा’, अशा प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांमधून उमटत आहेत.

गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण पुन्हा वाढू लागल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यात शासनातर्फे ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली असून, यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या परप्रांतीय बांधवांनी घराकडे जायला सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई व पुण्याहून येणाऱ्या रेल्वे गाड्या परप्रांतीयांच्या गर्दीने फुल्ल भरून जात आहेत. तर परप्रांतातून मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. तसेच दिल्लीकडे जाणाऱ्या गोवा एक्स्प्रेस या गाडीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरुन दररोज अप आणि डाऊन मार्गावरील लांबपल्ल्यावरील प्रत्येक गाडीला तिकीट आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून तिकिटे रद्द केली जात आहेत.

इन्फो :

- दररोज जाणाऱ्या रेल्वे : ३०

दररोज रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या - १ ते २ हजार

- आरक्षण रद्द करणाऱ्यांची रोजची संख्या - २०० ते २५०

इन्फो :

मुंबई, पुणे व दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी ओसरली

गेल्या महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असताना, आता तर अधिकच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात दररोज ५० ते ६० हजारांच्या घरात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे भुसावळ विभागातून मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, राजस्थान याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. मात्र, मुंबई व पुण्याकडून जळगाव मार्गे परप्रांतात जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मुंबई व पुण्यात वाढलेल्या संसर्गामुळे गावाकडे परतत असल्याचे या परप्रांतीय बांधवांनी सांगितले.

इन्फो :

या गाड्यांना गर्दी कायम

दिवाळीनंतर पहिली लाट कमी झाल्यावर रेल्वे प्रशासनाने मुंबई व दिल्ली मार्गावर अनेक गाड्या सुरू केल्या. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे परप्रांतीय मजूरही परतू लागल्याने या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढल्याने या गाड्यांनी गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्या उत्तर भारत, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान या भागात जाणाऱ्या काशी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस या गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

इन्फो :

कोरोना काळात सर्व गाड्यांना विशेषचा दर्जा

रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात ज्या एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत, त्या प्रत्येक गाडीला विशेषचा दर्जा दिला आहे. या विशेष दर्जामुळे या गाड्यांना तिकीट आरक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी जनरल तिकीटही बंद करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर सुरुवातीपासूनच गाड्यांची संख्या कमी असल्याने, या विशेष गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मात्र, आता कोरोना काळात प्रवासी संख्या निम्म्यावर आली आहे.

इन्फो :

कोट बाकी आहे..थोडया वेळात देतो.