शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेप्रवास नको रे बाबा; दररोज २०० ते २५० तिकिटे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:15 IST

कोरोना परिणाम : संसर्ग वाढू लागल्याने मुंबई- दिल्लीकडे जाणाऱ्यांची गर्दी ओसरली लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची दुसरी लाट ...

कोरोना परिणाम : संसर्ग वाढू लागल्याने मुंबई- दिल्लीकडे जाणाऱ्यांची गर्दी ओसरली

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. याचा रेल्वेच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला असून, मुंबई, पुणे व दिल्ली मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांकडून दररोज २०० ते २५० तिकिटे रद्द करण्यात येत आहेत. कोरोनाच्या भीतीने ‘रेल्वेप्रवास नको रे बाबा’, अशा प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांमधून उमटत आहेत.

गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण पुन्हा वाढू लागल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यात शासनातर्फे ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली असून, यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या परप्रांतीय बांधवांनी घराकडे जायला सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई व पुण्याहून येणाऱ्या रेल्वे गाड्या परप्रांतीयांच्या गर्दीने फुल्ल भरून जात आहेत. तर परप्रांतातून मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. तसेच दिल्लीकडे जाणाऱ्या गोवा एक्स्प्रेस या गाडीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरुन दररोज अप आणि डाऊन मार्गावरील लांबपल्ल्यावरील प्रत्येक गाडीला तिकीट आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून तिकिटे रद्द केली जात आहेत.

इन्फो :

- दररोज जाणाऱ्या रेल्वे : ३०

दररोज रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या - १ ते २ हजार

- आरक्षण रद्द करणाऱ्यांची रोजची संख्या - २०० ते २५०

इन्फो :

मुंबई, पुणे व दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी ओसरली

गेल्या महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असताना, आता तर अधिकच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात दररोज ५० ते ६० हजारांच्या घरात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे भुसावळ विभागातून मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, राजस्थान याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. मात्र, मुंबई व पुण्याकडून जळगाव मार्गे परप्रांतात जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मुंबई व पुण्यात वाढलेल्या संसर्गामुळे गावाकडे परतत असल्याचे या परप्रांतीय बांधवांनी सांगितले.

इन्फो :

या गाड्यांना गर्दी कायम

दिवाळीनंतर पहिली लाट कमी झाल्यावर रेल्वे प्रशासनाने मुंबई व दिल्ली मार्गावर अनेक गाड्या सुरू केल्या. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे परप्रांतीय मजूरही परतू लागल्याने या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढल्याने या गाड्यांनी गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्या उत्तर भारत, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान या भागात जाणाऱ्या काशी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस या गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

इन्फो :

कोरोना काळात सर्व गाड्यांना विशेषचा दर्जा

रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात ज्या एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत, त्या प्रत्येक गाडीला विशेषचा दर्जा दिला आहे. या विशेष दर्जामुळे या गाड्यांना तिकीट आरक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी जनरल तिकीटही बंद करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर सुरुवातीपासूनच गाड्यांची संख्या कमी असल्याने, या विशेष गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मात्र, आता कोरोना काळात प्रवासी संख्या निम्म्यावर आली आहे.

इन्फो :

कोट बाकी आहे..थोडया वेळात देतो.