शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

कोणताही निधी निष्क्रियपणामुळे परत जाऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेला राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा वेळेवर खर्च होत नसल्याने तो निधी अनेकदा परत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेला राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा वेळेवर खर्च होत नसल्याने तो निधी अनेकदा परत पाठविण्याची वेळ महापालिकेवर येते. अनेक वेळा या निधीतून नियोजन केल्यानंतरही केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा निधी खर्च होऊ शकत नाही. त्यामुळे या पुढील काळात कोणत्याही अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे कोणताही निधी परत पाठविण्याची वेळ महापालिकेवर येऊ नये, अशा कडक शब्दांत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बुधवारी महापालिकेच्या सर्व विभाग अधिकाऱ्यांची बैठक आपल्या दालनात घेतली. या बैठकीला सर्व विभागप्रमुख व महापालिकेचे इतर अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत महापौरांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेची माहिती घेतली. यासह वॉटर ग्रेसकडून शहरात सुरू असलेल्या साफसफाईच्या कामांचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.

आतापर्यंत जे चालले ते झालं, आता प्रत्यक्ष कामांवर भर द्या

गेल्या अडीच वर्षांत कशा प्रकारे कामकाज झाले त्यावर आता कोणतीही चर्चा न करता नव्याने कामकाज करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. अधिकाऱ्यांच्या ज्या अडचणी असतील, त्या अडचणी मनात कोणताही संकोच न बाळगता आमच्याकडे सांगा. त्या अडचणी तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मात्र शहरातील नागरिकांचा आलेल्या अडचणींकडे अधिकारी व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे. यासह महापालिकेचा आकृतिबंध मंजूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचीही माहिती महापौरांनी दिली. यासह अनुकंपाधारकांना लवकरच सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठीही आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशीही माहिती यावेळी महापौरांनी दिली.

घनकचरा प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आव्हाने शिवारातील घनकचरा प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घनकचरा प्रकल्पाचा नव्याने तयार करण्यात आलेला डीपीआर आहे. मंजुरी मिळविण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करण्याच्याही सूचना उपमहापौर यांनी दिल्या. घनकचरा प्रकल्पातील पडलेला कचऱ्यावर लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे प्राधान्याने या कामाला सुरुवात करून कचऱ्याला लागणाऱ्या आगीवर नियंत्रण आणण्याच्या सूचनाही उपमहापौरांनी दिल्या.