शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

कोणताही निधी निष्क्रियपणामुळे परत जाऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेला राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा वेळेवर खर्च होत नसल्याने तो निधी अनेकदा परत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेला राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा वेळेवर खर्च होत नसल्याने तो निधी अनेकदा परत पाठविण्याची वेळ महापालिकेवर येते. अनेक वेळा या निधीतून नियोजन केल्यानंतरही केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा निधी खर्च होऊ शकत नाही. त्यामुळे या पुढील काळात कोणत्याही अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे कोणताही निधी परत पाठविण्याची वेळ महापालिकेवर येऊ नये, अशा कडक शब्दांत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बुधवारी महापालिकेच्या सर्व विभाग अधिकाऱ्यांची बैठक आपल्या दालनात घेतली. या बैठकीला सर्व विभागप्रमुख व महापालिकेचे इतर अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत महापौरांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेची माहिती घेतली. यासह वॉटर ग्रेसकडून शहरात सुरू असलेल्या साफसफाईच्या कामांचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.

आतापर्यंत जे चालले ते झालं, आता प्रत्यक्ष कामांवर भर द्या

गेल्या अडीच वर्षांत कशा प्रकारे कामकाज झाले त्यावर आता कोणतीही चर्चा न करता नव्याने कामकाज करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. अधिकाऱ्यांच्या ज्या अडचणी असतील, त्या अडचणी मनात कोणताही संकोच न बाळगता आमच्याकडे सांगा. त्या अडचणी तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मात्र शहरातील नागरिकांचा आलेल्या अडचणींकडे अधिकारी व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे. यासह महापालिकेचा आकृतिबंध मंजूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचीही माहिती महापौरांनी दिली. यासह अनुकंपाधारकांना लवकरच सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठीही आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशीही माहिती यावेळी महापौरांनी दिली.

घनकचरा प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आव्हाने शिवारातील घनकचरा प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घनकचरा प्रकल्पाचा नव्याने तयार करण्यात आलेला डीपीआर आहे. मंजुरी मिळविण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करण्याच्याही सूचना उपमहापौर यांनी दिल्या. घनकचरा प्रकल्पातील पडलेला कचऱ्यावर लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे प्राधान्याने या कामाला सुरुवात करून कचऱ्याला लागणाऱ्या आगीवर नियंत्रण आणण्याच्या सूचनाही उपमहापौरांनी दिल्या.