शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोणताही निधी निष्क्रियपणामुळे परत जाऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेला राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा वेळेवर खर्च होत नसल्याने तो निधी अनेकदा परत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेला राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा वेळेवर खर्च होत नसल्याने तो निधी अनेकदा परत पाठविण्याची वेळ महापालिकेवर येते. अनेक वेळा या निधीतून नियोजन केल्यानंतरही केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा निधी खर्च होऊ शकत नाही. त्यामुळे या पुढील काळात कोणत्याही अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे कोणताही निधी परत पाठविण्याची वेळ महापालिकेवर येऊ नये, अशा कडक शब्दांत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बुधवारी महापालिकेच्या सर्व विभाग अधिकाऱ्यांची बैठक आपल्या दालनात घेतली. या बैठकीला सर्व विभागप्रमुख व महापालिकेचे इतर अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत महापौरांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेची माहिती घेतली. यासह वॉटर ग्रेसकडून शहरात सुरू असलेल्या साफसफाईच्या कामांचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.

आतापर्यंत जे चालले ते झालं, आता प्रत्यक्ष कामांवर भर द्या

गेल्या अडीच वर्षांत कशा प्रकारे कामकाज झाले त्यावर आता कोणतीही चर्चा न करता नव्याने कामकाज करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. अधिकाऱ्यांच्या ज्या अडचणी असतील, त्या अडचणी मनात कोणताही संकोच न बाळगता आमच्याकडे सांगा. त्या अडचणी तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मात्र शहरातील नागरिकांचा आलेल्या अडचणींकडे अधिकारी व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे. यासह महापालिकेचा आकृतिबंध मंजूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचीही माहिती महापौरांनी दिली. यासह अनुकंपाधारकांना लवकरच सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठीही आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशीही माहिती यावेळी महापौरांनी दिली.

घनकचरा प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आव्हाने शिवारातील घनकचरा प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घनकचरा प्रकल्पाचा नव्याने तयार करण्यात आलेला डीपीआर आहे. मंजुरी मिळविण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करण्याच्याही सूचना उपमहापौर यांनी दिल्या. घनकचरा प्रकल्पातील पडलेला कचऱ्यावर लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे प्राधान्याने या कामाला सुरुवात करून कचऱ्याला लागणाऱ्या आगीवर नियंत्रण आणण्याच्या सूचनाही उपमहापौरांनी दिल्या.