शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

कुणी शिक्षक देता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:02 IST

गोद्री येथील पालकांची मागणी : शिक्षणाधिकारी रजेवर, पदभार कुणाकडे सोपवला कळेना

जामनेर, जि.जळगाव : तालुक्यातील गोद्री येथे जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत पंधरवड्यापासून एकही शिक्षक नसल्याने विद्यार्थी व पालकांनी शिक्षण विभागाकडे कुणी शिक्षक देता का? अशी विनवणी केली आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गलथान कारभारावर पालक संतप्त झाले असून, शनिवारी पालकांनी पंचायत समितीचे कार्यालय गाठले. मात्र गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट न झाल्याने त्यांना माघारी परतावे लागले.जिल्हा परिषदेच्या गोद्री येथील उर्दू शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून, ६० विद्यार्थी प्रवेशित आहेत. गेल्या २४ जुलैपासून शिक्षक नव्हता, एका शिक्षकाची नियुक्ती झाली. मात्र ते आठवडाभर थांबले. त्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून शाळेत एकही शिक्षक नसल्याने विद्यार्थी शाळेत येतात व निघून जातात.शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कुणीही दखल घेत नसल्याने शनिवारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालखा तडवी, अरमान पिंजारी, सत्तार पिंजारी, शेख रशीद इब्राहीम, भिकन पिंजारी आदी पंचायत समितीत आले व तसा अर्ज सादर केला.गोद्री हे गाव अवघड क्षेत्रात येते. या ठिकाणी रुजू होण्यास शिक्षक तयार होत नसल्याची माहिती मिळाली.दरम्यान, गटशिक्षणाधिकारी आदीनाथ वाडेकर हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. त्यांचा पदभार कुणाकडे सोपविला आहे, याची माहिती पंचायत समितीतील अधिकाºयांकडे नाही. शिक्षण विस्तार अधिकारी आर.पी.दुसाने यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, पदभार कुणाकडे आहे याची माहिती नाही, मात्र गोद्री उर्दू शाळेसाठी जामनेर येथील मुलांच्या उर्दू शाळेतील एका शिक्षकाची नियुक्ती केली असून, ते सोमवारी रुजू होतील.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. शिक्षकांअभावी शाळांना कुलूप लावण्याचे प्रकारही वाढले आहेत.गोद्री उर्दू शाळेत विद्यार्थी दररोज सकाळी येतात, बसतात, खेळतात व घरी निघून जातात. याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने लक्ष देवून कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.जिल्हा परिषदेच्या गोद्री येथील उर्दू शाळेत एकच शिक्षक होतात. त्यांचीही आॅनलाइन बदली झाली. यानंतर येथे शिक्षकाची नियुक्ती झालेली नाही. शिक्षकांच्या मागणीसाठी वारंवार पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागतात. गटविकास अधिकारी भेट देत नाहीत. गटशिक्षणाधिकारी रजेवर असून, त्यांचा पदभार कुणाकडे आहे, हे कुणालाच माहिती नाही. यामुळे आम्ही दाद कुणाकडे मागावी?-लालखा तडवी, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, गोद्री, ता.जामनेर

टॅग्स :SchoolशाळाJamnerजामनेर