शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांमध्ये यंदा होणार नाहीत खुल्या निवडणुका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 21:52 IST

नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर १९९४ पासून बंद झालेल्या विद्यार्थ्यांचा खुल्या निवडणुका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र अद्याप राज्यशासनाकडून खुल्या निवडणुकांसाठी नियमावली तयार करण्यात आलेली नाही, त्यामुळे यावर्षी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थी परिषदेसाठी खुल्या स्वरुपात निवडणुका न घेता, जुन्या कायद्याप्रमाणेच महाविद्यालयीन निवडणुका घेण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे. याबाबत शासनाकडून आठवड्याभरात अध्यादेश काढून विद्यापीठांना सूचना केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देजुन्या कायद्याप्रमाणेच तयार होणार विद्यार्थी परिषदशासनाकडून लवकरच काढला जाणार अध्यादेशविद्यार्थी संघटनाकडून विरोधाची शक्यता

आॅनलाईन लोकमत

अजय पाटीलजळगाव, दि.२८-नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर १९९४ पासून बंद झालेल्या विद्यार्थ्यांचा खुल्या निवडणुका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र अद्याप राज्यशासनाकडून खुल्या निवडणुकांसाठी नियमावली तयार करण्यात आलेली नाही, त्यामुळे यावर्षी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थी परिषदेसाठी खुल्या स्वरुपात निवडणुका न घेता, जुन्या कायद्याप्रमाणेच महाविद्यालयीन निवडणुका घेण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे. याबाबत शासनाकडून आठवड्याभरात अध्यादेश काढून विद्यापीठांना सूचना केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१ मार्च रोजी नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर विद्यापीठांच्या कामकाजात अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ व महाविद्यालयस्तरावर विद्यार्थी परिषद स्थापन केली जाणार आहे. या परिषदेवर नियुक्त होणाºया प्रतिनिधींची निवड ही खुल्या निवडणूक पध्दतीने करण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता. तसेच विद्यापीठांमधील अधिसभा निवडणुका संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा निवडणुका घेतल्या जाणार होत्या. विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षांची निवड ही थेट विद्यार्थ्यांमधून केली जाणार होती. तसेच खुल्या निवडणुकांबाबत विद्यार्थी संघटनांकडून देखील जोरदार तयारी होती. मात्र यावर्षी या निवडणुका न घेण्याचा विचारात शासन आहे.

डॉ.आर.एस.माळी समितीचा अहवाल शासनाकडे सादरखुल्या विद्यार्थी निवडणुकांच्या नियमावली तयार करण्यासाठी शासनाकडून डॉ.आर.एस.माळी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती. दरम्यान, या समितीने आपला अहवाल तयार करून शासनाकडे पाठविला आहे. मात्र यावर्षीच या निवडणुका घेण्याबाबत शासनाच्या मनात संभ्रावस्था आहे. त्यामुळे यंदा खुल्या पध्दतीने विद्यार्थी परिषदेची स्थापना न करता जुन्याच कायद्याप्रमाणे विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती केली जावी या असा विचार शासनाचा आहे. मात्र पुढच्या वर्षी विद्यार्थी प्रतिनीधींची निवड ही खुल्या निवडणुकांचाच माध्यमातून केली जाणार आहे.

यु.आर.ची नियुक्ती कुलगुरुंमार्फतचशासनाकडून जुन्या पध्दतीने विद्यार्थी प्रतिनीधींची निवड करण्यात यावी, याबाबतचा सूचना राज्यातील सर्व विद्यापीठांना दिल्या जाणार आहेत. त्यानुसार जुन्या कायद्याप्रमाणेच प्रत्येक वर्गातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्याची निवड ही महाविद्यालयीन प्रतिनिधीसाठी केली जाईल. तसेच प्राचार्यांमार्फत महाविद्यालयीन प्रतिनिधीची निवड विद्यापीठ प्रतिनिधीसाठी केली जाईल. त्यानंतर कुलगुरु महाविद्यालयांकडून आलेल्या महाविद्यालयीन प्रतिनिधी (सी.आर.) मधून १५ प्रतिनिधींची निवड विद्यापीठ प्रतिनिधीपदी करतील, १५ पैकी २ सदस्यांची निवड (यु.आर.)ही अध्यक्ष व सचिव म्हणून हे कुलगुरुच करतील. अशी माहिती सूत्रानी ‘लोकमत’ला दिली आहे.

विद्यार्थी संघटनाकडून विरोधाची शक्यताखुल्या निवडणूक पध्दतीने यंदा विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने, सर्वच विद्यार्थी संघटनाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते. तसेच यासाठी अनेक संघटनांनी जोरदार तयारी देखील सुरु केली होती. तसेच या निवडणुका लवकर व्हाव्यात यासाठी विद्यार्थी संघटनाकडून शासनाला पत्र व निवेदने देखील देण्यात आले होते. मात्र यंदा या निवडणुका होणार नसल्याने विद्यार्थी संघटनाकडून विरोध होण्याची शक्यता आहे.