शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

हिंमत न हरता मुलींनाही केले स्वावलंबी

By admin | Updated: May 14, 2017 19:31 IST

माया व प्रेम देऊन आपल्या पंखांच्या आभाळाखाली आई आपल्या पिलांना आकाश खुले करून देते.

बी. एस. चौधरी / ऑनलाइन लोकमतएरंडोल, जि. जळगाव, दि. 13 - माया व प्रेम देऊन आपल्या पंखांच्या आभाळाखाली आई आपल्या पिलांना आकाश खुले करून देते. ते आकाशात घिरटय़ा घालणा:या घारीच्या पिलांकडे पाहून जाणवते. असेच काहीसे घडते ते माणसाच्या आयुष्यात. अचानक वादळ येते आणि मोठय़ा मेहनतीने झाडावर बांधलेले घरटे खाली पडावे आणि आपल्या पिलांना पंखात घेऊन आभाळात उडण्याचे बळ द्यावे. हे बळ देण्याचे सामथ्र्य फक्त आईकडेच असते. याची प्रचिती एरंडोल येथील औषधी विक्रेत्या मीना अरुण पवार यांच्या उदाहरणावरून येते. त्यांचे पती अरुण नवल पवार हे अॅप्लाइड अॅनिमिया (कॅन्सर)ने आजारी पडले. त्यांना मुंबई येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. रुग्णालयात थांबून त्यांनी जवळपास तीन महिने त्यांची सेवा केली. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही काळाने क्रूरता दाखविली व त्यांना हिरावून नेले. त्यामुळे मीनाताईला एकटेपणाचे जीवन कंठण्याची वेळ आली. त्या वेळी त्यांना चेतना व अश्विनी ह्या दोन लहान मुली होत्या. त्यांच्या आधारस्तंभाचे काम त्यांनी केले. त्यांनी डी फॉर्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते. वैधव्याच्या काळात त्यांच्यावर त्यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी पडली. त्यांचे बारावीर्पयतचे शिक्षण झाल्यानंतर स्वत: मीनाताईसुद्धा एम.ए.(मराठी) झाल्या. त्यांचे वडील सेवानिवृत्त प्राचार्य यशवंत पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. 1985 मध्ये त्यांनी छोटेसे औषधी दुकान सुरू करून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल केली. त्या एरंडोल तालुक्यातील पहिल्या महिला उद्योजिका आहेत. औषधी दुकानाचे काम पाहून त्यांनी दोन्ही मुलींचे डी फॉर्मसीचे शिक्षण पूर्ण करण्यात यश मिळविले.योग्यवेळी चेतना व अश्विनीसाठी योग्य अशी स्थळे आली. बोरिवली येथील मयूर वसंतराव पाटील यांच्याशी चेतनाचा विवाह झाला, तर पनवेल येथील उद्योजक वीरेंद्र देवीदास डोके यांच्याशी अश्विनीचा विवाह झाला. दोघी कन्या प्रपंचात रमल्या आहेत.मीनाताई आजही औषधी दुकान चालवतात. काही महिन्यांपूर्वी त्यांना जळगाव जिल्हा मेडिकल असोसिएशनतर्फे ‘बेस्ट फार्मासिस्ट अवॉर्ड’ बहाल करण्यात आला. विशेष हे की, मीना पवार यांनी आपल्या दोघी कन्यांना स्वावलंबी होण्याइतपत शिक्षण दिले व त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वत:च्या पायावर उभे केले. स्वत: त्या स्वावलंबी जीवन जगत असून त्यांनी स्वावलंबनाचे आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. ऐन तारुण्यात आलेल्या वैधव्यावर त्यांनी मात करून त्यांच्या दोन्ही मुलींचा संसार उभारण्यासाठी अपार परिश्रम केले आहेत.