शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

हिंमत न हरता मुलींनाही केले स्वावलंबी

By admin | Updated: May 14, 2017 19:31 IST

माया व प्रेम देऊन आपल्या पंखांच्या आभाळाखाली आई आपल्या पिलांना आकाश खुले करून देते.

बी. एस. चौधरी / ऑनलाइन लोकमतएरंडोल, जि. जळगाव, दि. 13 - माया व प्रेम देऊन आपल्या पंखांच्या आभाळाखाली आई आपल्या पिलांना आकाश खुले करून देते. ते आकाशात घिरटय़ा घालणा:या घारीच्या पिलांकडे पाहून जाणवते. असेच काहीसे घडते ते माणसाच्या आयुष्यात. अचानक वादळ येते आणि मोठय़ा मेहनतीने झाडावर बांधलेले घरटे खाली पडावे आणि आपल्या पिलांना पंखात घेऊन आभाळात उडण्याचे बळ द्यावे. हे बळ देण्याचे सामथ्र्य फक्त आईकडेच असते. याची प्रचिती एरंडोल येथील औषधी विक्रेत्या मीना अरुण पवार यांच्या उदाहरणावरून येते. त्यांचे पती अरुण नवल पवार हे अॅप्लाइड अॅनिमिया (कॅन्सर)ने आजारी पडले. त्यांना मुंबई येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. रुग्णालयात थांबून त्यांनी जवळपास तीन महिने त्यांची सेवा केली. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही काळाने क्रूरता दाखविली व त्यांना हिरावून नेले. त्यामुळे मीनाताईला एकटेपणाचे जीवन कंठण्याची वेळ आली. त्या वेळी त्यांना चेतना व अश्विनी ह्या दोन लहान मुली होत्या. त्यांच्या आधारस्तंभाचे काम त्यांनी केले. त्यांनी डी फॉर्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते. वैधव्याच्या काळात त्यांच्यावर त्यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी पडली. त्यांचे बारावीर्पयतचे शिक्षण झाल्यानंतर स्वत: मीनाताईसुद्धा एम.ए.(मराठी) झाल्या. त्यांचे वडील सेवानिवृत्त प्राचार्य यशवंत पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. 1985 मध्ये त्यांनी छोटेसे औषधी दुकान सुरू करून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल केली. त्या एरंडोल तालुक्यातील पहिल्या महिला उद्योजिका आहेत. औषधी दुकानाचे काम पाहून त्यांनी दोन्ही मुलींचे डी फॉर्मसीचे शिक्षण पूर्ण करण्यात यश मिळविले.योग्यवेळी चेतना व अश्विनीसाठी योग्य अशी स्थळे आली. बोरिवली येथील मयूर वसंतराव पाटील यांच्याशी चेतनाचा विवाह झाला, तर पनवेल येथील उद्योजक वीरेंद्र देवीदास डोके यांच्याशी अश्विनीचा विवाह झाला. दोघी कन्या प्रपंचात रमल्या आहेत.मीनाताई आजही औषधी दुकान चालवतात. काही महिन्यांपूर्वी त्यांना जळगाव जिल्हा मेडिकल असोसिएशनतर्फे ‘बेस्ट फार्मासिस्ट अवॉर्ड’ बहाल करण्यात आला. विशेष हे की, मीना पवार यांनी आपल्या दोघी कन्यांना स्वावलंबी होण्याइतपत शिक्षण दिले व त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वत:च्या पायावर उभे केले. स्वत: त्या स्वावलंबी जीवन जगत असून त्यांनी स्वावलंबनाचे आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. ऐन तारुण्यात आलेल्या वैधव्यावर त्यांनी मात करून त्यांच्या दोन्ही मुलींचा संसार उभारण्यासाठी अपार परिश्रम केले आहेत.