शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनासाठी तुटपुंजे अनुदान नको, शाश्वत निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:46 IST

चाळीसगाव येथे प्रकट मुलाखतीत डॉ.श्रीपाद जोशी यांची अपेक्षा

चाळीसगाव, जि.जळगाव : एकीकडे तुटपुंजे अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे साहित्य महामंडळाची माहितीही मागायची, ही दुटप्पी भूमिका असून, महामंडळाला शाश्वत निधी द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध विचारवंत, लेखक, कवी डॉ. श्रीपाद जोशी यांनी येथे केली.चाळीसगाव येथील महाराष्ट साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे वाणी मंगल कार्यालयात शनिवारी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मसापचे विभागीय कार्यवाह प्राचार्य तानसेन जगताप होते. व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, विश्वस्त डॉ. सुनील राजपूत उपस्थित होते.मराठी माणसाने भाषा, साहित्य, संस्कृती राक्षणासाठी खिशातून पैसे काढावे, जोपर्यंत हे होत नाही, तोवर शासनाकडे निधी मागण्यासाठी पदर पसरवाच लागेल, अशी खंतही डॉ. जोशी त्यांनी बोलून दाखवली. अशोक वाबळे आणि प्रा. तुषार चव्हाण यांनी विविधांगी प्रश्नांची मांडणी करुन डॉ.जोशी यांना बोलते केले.बदल घडतोच. मात्र त्याची दिशा सकारात्मक असायला हवी, असे सांगत डॉ.जोशी यांनी गेल्या ५० वर्षात साहित्य महामंडळात जे काम झाले नाही, ते आपल्या अडीच वर्षाच्या काळात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डोबिंवलीचे साहित्य संमेलन दर्दींच्या गदीर्ने यशस्वी झाले. संमेलनात युवा, स्त्रिया, दलित, आदिवासी यांना स्थान दिल्यानेच हे घडू शकले, असे ते म्हणाले. या वेळी किसनराव जोर्वेकर, अरुण भावसार, डॉ.विनोद कोतकर, उ.भ.काळे, जयसिंग बागुल, सुभाष कारवा, विजय पाटील, गणेश आढाव, अण्णा धुमाळ, अ‍ॅड. सुषमा पाटील, प्राचार्य पी.एस.चव्हाण, कवी गौतम निकम, मनोहर आंधळे, रमेश पोतदार, प्रतिभा बागुल, राकेश बोरसे, शालिग्राम निकम, रामचंद्र गोसावी, संगिता देव, बी.एल.ठाकरे आदी उपस्थित होते.म्हणून निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतलासाहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीचा वाद पोलिस स्टेशनपर्यंत गेला. त्यामुळेच निवडणुक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. साहित्य संमेलनाच्या २० घटक संस्थांनी सुचविलेल्या २० नावांमधून एकाची अध्यक्षपदी निवड केली जाईल, असे डॉ. जोशी यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.मसापचे कार्य प्रागतिक झाले आहे. याचा दाखला देतानाच ज्याला डोकं नाही तो वाद घालणार नाही. वाद जरुर घाला. मात्र अगोदर वाद घालण्याइतके समृद्ध व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला.मराठीची होतेय कुचुंबणासमाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून साहित्याकडे पहावे, असे उद्बोधन करताना एका प्रश्नांच्या उत्तरात डॉ.जोशी यांनी मराठी भाषेच्या गळचेपी सविस्तर सांगितले. ते म्हणाले, ब्रिटीशकालिन शिक्षण पद्धतीमुळे मराठी भाषेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. अमेरीका, इंग्लंड सारख्या देशांबरोबर शासन व्यवस्थेने करार केले आहेत. त्यामुळे इंग्रजीला प्राधान्य मिळते. मराठी भाषेची कुचंंबणा होते. एकट्या मुंबईत ३४ मराठी शाळा बंद पडल्या असून, हे दुर्देैवी आहे.

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगाव