शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

साहित्य संमेलनासाठी तुटपुंजे अनुदान नको, शाश्वत निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:46 IST

चाळीसगाव येथे प्रकट मुलाखतीत डॉ.श्रीपाद जोशी यांची अपेक्षा

चाळीसगाव, जि.जळगाव : एकीकडे तुटपुंजे अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे साहित्य महामंडळाची माहितीही मागायची, ही दुटप्पी भूमिका असून, महामंडळाला शाश्वत निधी द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध विचारवंत, लेखक, कवी डॉ. श्रीपाद जोशी यांनी येथे केली.चाळीसगाव येथील महाराष्ट साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे वाणी मंगल कार्यालयात शनिवारी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मसापचे विभागीय कार्यवाह प्राचार्य तानसेन जगताप होते. व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, विश्वस्त डॉ. सुनील राजपूत उपस्थित होते.मराठी माणसाने भाषा, साहित्य, संस्कृती राक्षणासाठी खिशातून पैसे काढावे, जोपर्यंत हे होत नाही, तोवर शासनाकडे निधी मागण्यासाठी पदर पसरवाच लागेल, अशी खंतही डॉ. जोशी त्यांनी बोलून दाखवली. अशोक वाबळे आणि प्रा. तुषार चव्हाण यांनी विविधांगी प्रश्नांची मांडणी करुन डॉ.जोशी यांना बोलते केले.बदल घडतोच. मात्र त्याची दिशा सकारात्मक असायला हवी, असे सांगत डॉ.जोशी यांनी गेल्या ५० वर्षात साहित्य महामंडळात जे काम झाले नाही, ते आपल्या अडीच वर्षाच्या काळात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डोबिंवलीचे साहित्य संमेलन दर्दींच्या गदीर्ने यशस्वी झाले. संमेलनात युवा, स्त्रिया, दलित, आदिवासी यांना स्थान दिल्यानेच हे घडू शकले, असे ते म्हणाले. या वेळी किसनराव जोर्वेकर, अरुण भावसार, डॉ.विनोद कोतकर, उ.भ.काळे, जयसिंग बागुल, सुभाष कारवा, विजय पाटील, गणेश आढाव, अण्णा धुमाळ, अ‍ॅड. सुषमा पाटील, प्राचार्य पी.एस.चव्हाण, कवी गौतम निकम, मनोहर आंधळे, रमेश पोतदार, प्रतिभा बागुल, राकेश बोरसे, शालिग्राम निकम, रामचंद्र गोसावी, संगिता देव, बी.एल.ठाकरे आदी उपस्थित होते.म्हणून निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतलासाहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीचा वाद पोलिस स्टेशनपर्यंत गेला. त्यामुळेच निवडणुक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. साहित्य संमेलनाच्या २० घटक संस्थांनी सुचविलेल्या २० नावांमधून एकाची अध्यक्षपदी निवड केली जाईल, असे डॉ. जोशी यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.मसापचे कार्य प्रागतिक झाले आहे. याचा दाखला देतानाच ज्याला डोकं नाही तो वाद घालणार नाही. वाद जरुर घाला. मात्र अगोदर वाद घालण्याइतके समृद्ध व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला.मराठीची होतेय कुचुंबणासमाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून साहित्याकडे पहावे, असे उद्बोधन करताना एका प्रश्नांच्या उत्तरात डॉ.जोशी यांनी मराठी भाषेच्या गळचेपी सविस्तर सांगितले. ते म्हणाले, ब्रिटीशकालिन शिक्षण पद्धतीमुळे मराठी भाषेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. अमेरीका, इंग्लंड सारख्या देशांबरोबर शासन व्यवस्थेने करार केले आहेत. त्यामुळे इंग्रजीला प्राधान्य मिळते. मराठी भाषेची कुचंंबणा होते. एकट्या मुंबईत ३४ मराठी शाळा बंद पडल्या असून, हे दुर्देैवी आहे.

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगाव