शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

बोरअजंटी येथे वनदावे मंजूर करू नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:31 IST

ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

चोपडा, जि.जळगाव : मध्य प्रदेशातील काही ग्रामस्थ बोरअजंटी परिसरातील वनजमिनीवर येऊन अतिक्रमण करून बसलेले आहेत. त्यामुळे आमचे उदरनिवार्हाचे साधन गेले आहे. वृक्षतोडीमुळे पडणाºया पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, याचा दुष्परिणाम गावकºयांना भोगावा लागत असल्याने बोअजंटी येथील वनदावे मंजूर करू नये ही मागणी बोअजंटी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांकडे दिले.निवेदनात म्हटले आहे की, वन हक्क कायदा २००५ अंतर्गत गावातून वनदावे दाखल केले आहेत. सदर दावे दाखल करणारे बोरअजंटी येथील रहिवासी नसून चार ते पाच वर्षांपूर्वी त्यांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यांची बोरअजंटी येथे जन्मनोंद नाही. पाच ते दहा वर्षांपूर्वी ते मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आले आहेत आणि शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण केले आह,े हे अतिक्रमण आमच्या विकासास बाधक आहे. गावालगत जंगल हे आमचे वैभव असून दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी जंगल तोडून तेथे शेती तयार केली आहे. त्यामुळे आमचे वैभव हिरावून घेतले आहे म्हणून अतिक्रमणधारकांकडे स्वत:च्या जमिनी असूनही या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. त्यामुळे ते वनांचा नाश करत आहेत. तसेच या जंगल तोडीमुळे आमचे उदरनिवार्हाचे साधन हिरावून घेतले आहे. जनावरांना चरायला जंगलात जागा नाही. त्यामुळे पावसाचे पाणीही कमी पडू लागले आहे. वेळोवेळी शासनाला ही बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र अतिक्रमण काढले जात नाही. उलट शासन दावे मागत असते ग्रामसभेचा ठराव मागते, हे चुकीच्या असून, अशा लोकांना वनदावे मंजूर करू नयेत या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर सुनील कोळी, रतीलाल कोळी, युवराज कोळी, पोपट कोळी, हरेश्वर पाटील, पंडित पाटील, हरिओम पाटील यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Natureनिसर्गChopdaचोपडा