शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दिवाळी होणार ‘नमकीन’, डाळींच्या भावात मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 12:22 IST

भाव सहा महिन्यांच्या निच्चांकीवर

ठळक मुद्देतेलातही वाढ नाहीबेसनपीठाचेही भाव घसरलेआवक वाढली

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 -  आवकच्या तुलनेत मागणी नसल्याने  डाळींचे भाव गडगडल्याने ग्राहकांना दिलासा मिळला असून दिवाळीचा गोडवा वाढणार  आहे. एरव्ही दिवाळीमध्ये हरभ:याच्या डाळीसह बेसनपीठाला मागणी वाढून भावही कडाडतात.  मात्र यंदा उलट चित्र असून सणासुदीत भाव कमी झाले आहे. 

आवक वाढलीप्रत्येक डाळ, कडधान्याचा विचार केला तर सर्वाची आवक वाढली आहे. महाराष्ट्रात उडीद-मुगाचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न व आवक नसले तरी इतर राज्यातून मुगाची चांगली आवक होत आहे. दुसरीकडे मात्र पाहिजे त्या प्रमाणात मागणी नसल्याने डाळींचे भाव कमी होत आहे. उडीदाच्या बाबतीतही असेच चित्र असून मध्यप्रदेशात उडीदाचे चांगले उत्पादन आल्याने तेथून येणा:या मालाला 4000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. 

दिवाळीत ज्या डाळीला सर्वात जास्त मागणी असते त्या हरभरा डाळीतही असेच चित्र आहे. दिवाळीमध्ये लाडू, बर्फी व इतर पदार्थ तयार करण्यासाठी हरभरा डाळ, बेसनपीठ यांना जास्त मागणी असते. त्यामुळे त्यांचे भाव या दिवसात वाढतात. मात्र यंदा आवकच जास्त असल्याने भाव वाढण्यापेक्षा उलटकमी झाले आहे. 

बेसनपीठाचेही भाव घसरलेबेसनपीठाचे भाव यंदा तर शंभरीच्या आत आले आहे. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये 100 ते 120 रुपये प्रति किलो असणारे भाव यंदा 80 ते 90 रुपये प्रति किलोवर आले आहे. 

तेलातही वाढ नाहीदिवाळीमध्ये खाद्य तेलाचेदेखील भाव वाढतात. मात्र यंदा तेलाचे भावदेखील स्थिर आहे. सोयाबीन तेल 72 ते 78 रुपये प्रति किलो तर शेंगदाणा तेल 115 ते 130 रुपये प्रति किलो (दर्जा व कंपनीन्यांनुसार यापेक्षा जास्त दर) आहे. 

डाळींसह बेसनपीठाचे भाव कमी होणे व तेलाचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांची दिवाळी गोड होणार आहे.  सध्या फराळाचे विविध पदार्थ करण्यास जोमाने सुरुवात झाली आहे. 

डाळींचे भाव गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचे व्यापा:यांनी सांगितले. सध्या तूर डाळीचे भाव 55 ते 60 रुपये प्रति किलो, हरभरा डाळ - 62 ते 70, मूग डाळ - 60 ते 64, उडीद डाळ 60 ते 64 रुपये प्रति किलो आहे. गेल्या महिन्यात हेच भाव 10 ते 20 रुपयांनी जास्त होते. 

दरवर्षी दिवाळीमध्ये डाळींची मागणी वाढते, मात्र यंदा आवक वाढली असली तरी मागणी पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यामुळे भावदेखीलघसरलेआहे. - प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल असोसिएशन. 

महाराष्ट्रात कडधान्याचे उत्पादन कमी असले तरी इतर राज्यातून माल येत असल्याने आवक वाढून डाळींचे भाव कमी झाले आहे. दिवाळीमध्ये असणारी मागणी पाहिजे तेवढी नाही. - प्रविण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणार्मचट असोसिएशन.