शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

सहनशीलता कमी झाल्याने घटस्फोट वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:03 IST

जळगाव : दोघांच्या जबाबदारीने घर कुटुंब व्यवस्था टिकवता येते. सहनशीलता व समजंसपणा दोघांमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र, मुलींची सहनशीलता ...

जळगाव : दोघांच्या जबाबदारीने घर कुटुंब व्यवस्था टिकवता येते. सहनशीलता व समजंसपणा दोघांमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र, मुलींची सहनशीलता कमी झाल्याने घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. असे मत नागपूर येथील ज्येष्ठ लेखिका तथा कवयित्री प्रा. विजया मारोतकर यांनी रविवारी व्यक्त केले.श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान आणि माळी समाज पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सकाळी वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव शालिनी बुंधे, शिवसेना जिल्हा संघटक गुलाबराव वाघ, अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे, सचिव शरद मोरे आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी राज्याभरासह मध्यप्रदेश, गुजराथ येथुन मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. यापुढे लेखिका मारोतकर यांनी सांगितले की, समाजामध्ये मुलांचे व्यासनाधीन होण्याचे प्रमाण वाढले असून, मुलींनी घरातून निघुन जाण्याचेही प्रमाण वाढले आहे. मुलींची सुरक्षा ही मुलांवर सुद्धा अवलंबुन असून, त्यांनी मुलींचा आदर केला पाहिजे. तसेच समाजाशी आपण काही तरी देणं लागतो,याचा विचार करुन समाजाची परतफेडं करणे गरजेचे असल्याचे सांगित, मुलींनी मोबाईलाचा अतिरेक टाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. या मेळाव्यात ४३१ जणांनी परिचय दिला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे यांच्यासह संचालक प्रकाश साबळे, संजय महाजन, गोपाळ चौधरी, वैशाली महाजन, धनराज माळी, डी. बी. महाजन, वाय. एस. महाजन आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव