शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सहनशीलता कमी झाल्याने घटस्फोट वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:03 IST

जळगाव : दोघांच्या जबाबदारीने घर कुटुंब व्यवस्था टिकवता येते. सहनशीलता व समजंसपणा दोघांमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र, मुलींची सहनशीलता ...

जळगाव : दोघांच्या जबाबदारीने घर कुटुंब व्यवस्था टिकवता येते. सहनशीलता व समजंसपणा दोघांमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र, मुलींची सहनशीलता कमी झाल्याने घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. असे मत नागपूर येथील ज्येष्ठ लेखिका तथा कवयित्री प्रा. विजया मारोतकर यांनी रविवारी व्यक्त केले.श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान आणि माळी समाज पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सकाळी वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव शालिनी बुंधे, शिवसेना जिल्हा संघटक गुलाबराव वाघ, अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे, सचिव शरद मोरे आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी राज्याभरासह मध्यप्रदेश, गुजराथ येथुन मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. यापुढे लेखिका मारोतकर यांनी सांगितले की, समाजामध्ये मुलांचे व्यासनाधीन होण्याचे प्रमाण वाढले असून, मुलींनी घरातून निघुन जाण्याचेही प्रमाण वाढले आहे. मुलींची सुरक्षा ही मुलांवर सुद्धा अवलंबुन असून, त्यांनी मुलींचा आदर केला पाहिजे. तसेच समाजाशी आपण काही तरी देणं लागतो,याचा विचार करुन समाजाची परतफेडं करणे गरजेचे असल्याचे सांगित, मुलींनी मोबाईलाचा अतिरेक टाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. या मेळाव्यात ४३१ जणांनी परिचय दिला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे यांच्यासह संचालक प्रकाश साबळे, संजय महाजन, गोपाळ चौधरी, वैशाली महाजन, धनराज माळी, डी. बी. महाजन, वाय. एस. महाजन आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव