शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

लोक न्यायालयात ६० हजार प्रकरणांचा जिल्ह्यात निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:15 IST

लोकन्यायालयाच्या माध्यमातून १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात ६० हजार ८१० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.  पक्षकारांना १७३ कोटी ८५ लाख ७३ हजार २६४ रुपयांची भरपाई देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांनी ‘लोकमत’ ला दिली.

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत  विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

सुनील पाटील । जळगाव : लोकन्यायालयाच्या माध्यमातून १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात ६० हजार ८१० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.  पक्षकारांना १७३ कोटी ८५ लाख ७३ हजार २६४ रुपयांची भरपाई देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांनी ‘लोकमत’ ला दिली. दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यात प्रथमच झालेल्या वैकल्पिक वाद निवारणात १९४ पैकी १८५ प्रकरणांमध्ये मध्यस्थी घडवून आणत तडजोड करण्यात आली. तडजोडीची ही रक्कम ५० कोटीच्यावर असून टप्याटप्याने शेतकºयांच्या बॅँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. लोक न्यायालयाच्या संदर्भात ठोंबरे यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला असता तो प्रश्नोत्त्तर स्वरुपात देत आहोत.लोक न्यायालय म्हणजे नेमके काय?दुरावलेले संबंध, प्रलंबित व दाखलपूर्व असलेली प्रकरणे सांमजस्याने मिटविण्याकरिता भरविण्यात येत असलेल्या दाव्यांच्या प्रकरणाला लोक अदालत म्हणतात. महाराष्टÑातील उच्च न्यायालय, सर्व जिल्हा, तालुका, कौटुंबिक न्यायालये व इतर न्यायाधीकरण येथे राष्टÑीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये हे लोक न्यायालय घेण्यात येते.कोणती प्रकरणे लोक न्यायालयात     ठेवता येतात?निगोशिएबल इन्स्टुमेंटस् अ‍ॅक्टच्या कलम १३८ खाली दाखल झालेली प्रकरणे ठेवता येतात. त्यात बॅँक वसुली, कामगार वाद, नोकरीबाबतचे प्रकरणे (त्यात पगार व इतर भत्यांचा समावेश आहे.) अपघात, महसूल, भूसंपादन, वीज व पाणी देयकाबाबत तसेच वैवाहिंक व इतर दिवाणी प्रकरणांचा समावेश आहे. महसुलची जिल्हा व उच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणेही ठेवता येतात.-लोक न्यायालयात प्रकरण आल्यानंतर पक्षकाराला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुध्द अपील करता येत नाही. खटल्यांमध्ये साक्षी, पुरावा, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. लोक न्यायालयात निकाली निघणाºया प्रकरणामंध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.लोक न्यायालय कधी घेण्यात येते?तालुका व जिल्हा पातळीवर दर महिन्याला लोक न्यायालय होते. त्यात न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्त्यांची मदत होते. शिवाय विधी सेवा प्राधिकरणामार्फत वकील पुरविण्यात येतो. आता १३ जुलै रोजी लोक न्यायालय होणार आहे. या लोक न्यायालयात प्रकरणे ठेवण्यासाठी पक्षकाराला आधी प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव