शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

लोक न्यायालयात ६० हजार प्रकरणांचा जिल्ह्यात निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:15 IST

लोकन्यायालयाच्या माध्यमातून १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात ६० हजार ८१० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.  पक्षकारांना १७३ कोटी ८५ लाख ७३ हजार २६४ रुपयांची भरपाई देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांनी ‘लोकमत’ ला दिली.

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत  विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

सुनील पाटील । जळगाव : लोकन्यायालयाच्या माध्यमातून १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात ६० हजार ८१० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.  पक्षकारांना १७३ कोटी ८५ लाख ७३ हजार २६४ रुपयांची भरपाई देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांनी ‘लोकमत’ ला दिली. दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यात प्रथमच झालेल्या वैकल्पिक वाद निवारणात १९४ पैकी १८५ प्रकरणांमध्ये मध्यस्थी घडवून आणत तडजोड करण्यात आली. तडजोडीची ही रक्कम ५० कोटीच्यावर असून टप्याटप्याने शेतकºयांच्या बॅँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. लोक न्यायालयाच्या संदर्भात ठोंबरे यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला असता तो प्रश्नोत्त्तर स्वरुपात देत आहोत.लोक न्यायालय म्हणजे नेमके काय?दुरावलेले संबंध, प्रलंबित व दाखलपूर्व असलेली प्रकरणे सांमजस्याने मिटविण्याकरिता भरविण्यात येत असलेल्या दाव्यांच्या प्रकरणाला लोक अदालत म्हणतात. महाराष्टÑातील उच्च न्यायालय, सर्व जिल्हा, तालुका, कौटुंबिक न्यायालये व इतर न्यायाधीकरण येथे राष्टÑीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये हे लोक न्यायालय घेण्यात येते.कोणती प्रकरणे लोक न्यायालयात     ठेवता येतात?निगोशिएबल इन्स्टुमेंटस् अ‍ॅक्टच्या कलम १३८ खाली दाखल झालेली प्रकरणे ठेवता येतात. त्यात बॅँक वसुली, कामगार वाद, नोकरीबाबतचे प्रकरणे (त्यात पगार व इतर भत्यांचा समावेश आहे.) अपघात, महसूल, भूसंपादन, वीज व पाणी देयकाबाबत तसेच वैवाहिंक व इतर दिवाणी प्रकरणांचा समावेश आहे. महसुलची जिल्हा व उच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणेही ठेवता येतात.-लोक न्यायालयात प्रकरण आल्यानंतर पक्षकाराला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुध्द अपील करता येत नाही. खटल्यांमध्ये साक्षी, पुरावा, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. लोक न्यायालयात निकाली निघणाºया प्रकरणामंध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.लोक न्यायालय कधी घेण्यात येते?तालुका व जिल्हा पातळीवर दर महिन्याला लोक न्यायालय होते. त्यात न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्त्यांची मदत होते. शिवाय विधी सेवा प्राधिकरणामार्फत वकील पुरविण्यात येतो. आता १३ जुलै रोजी लोक न्यायालय होणार आहे. या लोक न्यायालयात प्रकरणे ठेवण्यासाठी पक्षकाराला आधी प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव