शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जिल्हा बँक व साखर कारखाना यांनी शेतकरी हितासाठी मार्ग काढणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:02 IST

फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना १ फेब्रुवारीपासूनचे पेमेंट मसाकाने दिलेले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हा बँकेनेसुद्धा कारखान्याचे खाते एनपीएमध्ये केल्याने कर्जपुरवठा करण्यास असमर्थता दाखविल्याने अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँक व कारखाना यांनी समन्वय साधावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्दे१ फेब्रुवारीपासूनचे पेमेंट दिलेले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीतकार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य, त्याचा परिमाण ऊस लागवडीवर४२ वर्षे सलगपणे गाळप करणारा एकमेव कारखाना ‘मसाका’

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना १ फेब्रुवारीपासूनचे पेमेंट मसाकाने दिलेले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हा बँकेनेसुद्धा कारखान्याचे खाते एनपीएमध्ये केल्याने कर्जपुरवठा करण्यास असमर्थता दाखविल्याने अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँक व कारखाना यांनी समन्वय साधावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.मधुकर सहकारी साखर कारखाना हा गेली ४२ वर्षे सलगपणे गाळप करणारा एकमेव कारखाना असून, कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले. त्यांचा परिमाण ऊस लागवडीवर झाला. तसेच टनेजमध्येसुद्धा घट आलेली आहे.कारखान्याच्या गाळप हंगाम २०१८-१९ आर्थिक अडचणीमुळे एक महिना उशिरा सुरू झाला, त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले केंद्र सरकारने साखर विक्रीसाठी कोटा पद्धत सुरू केल्याने साखर साठा पडून आहे. साखरेस उठाव नसल्याने साखर विक्री मंदावलेली आहे. त्यामुळे बँक व्याजाचा बोझा वाढत आहे. मागील हंगामाची साखर तसेच चालू हंगामाची शिल्लक साखर यामुळे कर्ज उचलीची मर्यादा संपलेली आहे. सदर मर्यादा वाढवून मिळण्याबाबत बँकेस प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. याबाबत जिल्हा बँकेकडे सतत पाठपुरावा मधुकर कारखान्याने केला आहे.कर्ज उचल मर्यादा बँकेकडून अद्याप वाढवून न मिळाल्यामुळे १ फेब्रुवारीपासून पुरवठा झालेल्या उसाचे पेमेंट शेतकºयांना करखान्याकडून अद्याप करता आलेले नाही. कर्ज उचल मर्यादा वाढवून देण्यासाठी बँकेस अपुरा पुरावा, एन.पी.ए. नेटवार्थ इ. बाबींची तांत्रिक अडचण असल्याने तसेच त्यासाठी शासनाची थकहमी आवश्यक आहे. अशा बाबी चर्चेमध्ये कारखान्याच्या वतुर्ळात सुरू आहे मधुकर कारखान्याकडे बँकेची असलेली कर्ज यामध्ये प्रामुख्याने साखर मालतारणवरील कर्ज रु.५७ कोटी आहे. सदर कर्ज हे साखरेच्या ताबेगहाणावरील आहे. तसेच साखरेचे भाव घसरल्याने सदर साखर साठ्यावर रु. १९ कोटींचे शॉर्ट मार्जिन आहे. माल तारण कर्ज वगळता कारखान्याकडे इतर कर्ज रु. ७.५७ कोटी इतके आहे. तसेच कारखान्याच्या संपूर्ण मालमत्तेचे प्रथम अग्रहक्कांचे गहाणखत बँकेस करून दिलेले असल्याने कारखाना जास्तीच्या कर्जाची मागणी जिल्हा बँकेकडे करू शकतो. म्हणून बँकेने किमान ऊस पुरवठादार शेतकºयांचे ऊस पेमेंट करण्यासाठी रक्कम उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर इतर देय रकमांबाबत निर्णय चचेर्अंती घेता येईल, अशी भूमिका कारखान्याने मांडली.बँकेस येणाºया तांत्रिक अडचणी व ऊस पेमेंटबाबतची वस्तुस्थिती याची सांगड घालून बँक व साखर कारखाना यांनी शेतकरी हितासाठी यामधून योग्य मार्ग काढणे आवश्यक आहे. सध्या शेतकरी दुष्काळामध्ये होरपडत आहे. त्यास येणाºया हंगामासाठी बी-बियाणे, खते, मशागत यासाठी पैशांची आवश्यकता आहे. यासाठी वेळेत शेतकºयांना पैसा न मिळाल्यास त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याचा गांभिर्याने विचार करावा, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFaizpurफैजपूर