शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

जिल्ह्यात ५५० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

जळगाव : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या पीक कर्जाच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत ३५ टक्के अर्थात ५५० कोटी रुपयांचे कर्ज ...

जळगाव : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या पीक कर्जाच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत ३५ टक्के अर्थात ५५० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेकडून ४०० कोटी तर इतर बँकांकडून १५० कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे. गेल्या वर्षी कर्ज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने अनेक जण पीक कर्जापासून वंचित राहिले होते. मात्र यंदा जुलै-ऑगस्टमध्ये खरीप कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

खरीप, रब्बी हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदी, शेती मशागत इत्यादी कामांसाठी भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून दरवर्षी खरीप व रब्बी हंगामापूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यानुसार यंदाही एप्रिल महिन्यापासून खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली.

दोन महिन्यात ३५ टक्के वितरण

यंदा पीक कर्जाचे जिल्ह्याला २२०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये खरीप हंगामासाठी १५४० कोटी रुपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून यापैकी आतापर्यंत ५५० कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे. पहिल्या दोन महिन्यात ३५ टक्क्यांपर्यंत उद्दिष्ट साध्य झाले असून यंदा पावसाळा चांगला राहण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांकडूनही कर्जाची मागणी चांगली राहून ऑगस्ट अखेरपर्यंत १०० टक्के कर्ज वितरणाचे लक्ष्य असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत वितरित झालेल्या ५५० कोटींपैकी ४०० कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून वितरित झाले असून उर्वरित १५० कोटी रुपयांचे कर्ज व्यापारी बँकांकडून वितरित झाले आहे.

गेल्या वर्षी ५३ टक्के कर्ज वितरण

गेल्या वर्षी जिल्ह्याला पीक कर्ज वितरणाचे ३३४० कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १७८० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. उद्दिष्टाच्या ५३ टक्के कर्ज वितरण गेल्या वर्षी झाले होते.

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत रखडले पीक कर्ज

सरकारने कर्जमाफी योजनेची घोषणा केल्यानंतर आपल्यालाही या योजनेचा लाभ होईल या प्रतीक्षेत अनेक शेतकरी होते. त्यामुळे गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट पाहत कर्ज भरलेच नाही. त्यामुळे त्यांना नवीन कर्जाचा लाभ होऊ शकला नाही. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली व नवीन कर्जही त्यांना मिळू शकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चार वर्षातील पीक कर्जाची स्थिती

२०१८-१९ - उद्दिष्ट २ हजार ८०० कोटी, वाटप १ हजार ७०० कोटी

२०१९-२० - उद्दिष्ट २ हजार ८०० कोटी, वाटप १ हजार १०० कोटी

२०२०-२१ - उद्दिष्ट ३ हजार ३४० कोटी, वाटप १ हजार ७८० कोटी

२०२१-२२- उद्दिष्ट २ हजार २०० कोटी, वाटप - ५५० कोटी (३१ मे २०२१ पर्यंत)