शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

भारनियमन नसतानाही वीज खंडित

By admin | Updated: October 17, 2015 00:18 IST

भारनियमन न करण्याच्या सूचना असतानाही नंदुरबार शहरासह जिल्ह्यात तांत्रिक कारणांमळे सर्रास भारनियमन केले जात आहे.

नंदुरबार : सण-उत्सवांच्या काळात भारनियमन न करण्याच्या सूचना असतानाही नंदुरबार शहरासह जिल्ह्यात तांत्रिक कारणांमळे सर्रास भारनियमन केले जात आहे. नंदुरबार शहरातील अनेक भागात सकाळी किंवा दुपारी तीन ते साडेतीन तास भारनियमन केले जात असल्यामुळे उत्सवावर विरजण पडत आहे. दरम्यान, ज्या भागात विजेची गळती आणि चोरी, तसेच थकबाकी आहे अशा भागातच तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा काही काळ बंद ठेवावा लागत असल्याचे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे.

सण-उत्सवांच्या काळात भारनियमन करू नये अशी मागणी जनतेने केली होती. त्याची दखल घेऊन शासनाने नवरात्रोत्सवात भारनियमन न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वीज पारेषण आणि वितरण कंपनीला सूचना देण्यात आल्या. त्यामुळे जनतेला हायसे वाटले. परंतु वीज वितरण कंपनीने आपल्या पद्धतीने कारभार सुरूच ठेवला आहे. भारनियमन नसतानाही शहरातील अनेक भागात अडीच ते साडेतीन तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

आठ वीजवाहिन्या

शहराला दरमहा सरासरी 50 लाख 39 हजार युनिट वीज लागते. सण-उत्सवांच्या काळात त्यात वाढ होऊन पाच ते सात हजार युनिट अतिरिक्त वीज लागते. सध्याची स्थिती पाहता तेवढी वीज उपलब्ध होत आहे. शहराला विविध भागातील आठ वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. यापैकी पाच वीजवाहिन्या ए, बी, सी व डी या ग्रुपमध्ये येतात. उर्वरित झराळी, नमस्कार कॉलनी व अर्बन वीजवाहिन्या या ई व एफ ग्रुपमध्ये येतात. एकूण वीज ग्राहक आणि उपलब्ध होणारी वीज लक्षात घेता फारशी तफावत नाही. त्यामुळे भारनियमन करण्याची गरज सध्या तरी नसल्याचे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे. असे असतानाही तांत्रिक कारणांच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नाराजी आहे.

यंत्रणा कोलमडू नये म्हणून

सध्या अडीच ते साडेतीन तास ज्या भागात वीजपुरवठा खंडित केला जातो ते भारनियमन नसून वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्यावर त्या- त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावा लागतो. तसे केले नाही तर पुरवठय़ापेक्षा मागणी जास्त ही तफावत राहिल्यास राज्यभरातील यंत्रणा कोलमडण्याची शक्यता असते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून जितक्या वेळ आणि फीडरनिहाय वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश येतात. त्यानुसार झोननुसार आणि ए, बी, सी, डी ग्रेडनुसार त्या-त्या फीडरवर वीजपुरवठा बंद करावा लागतो. कालावधी जास्त राहिल्यास एकापेक्षा जास्त फीडरवर तीन तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित करावा लागत असतो. त्यात ई, डी, सी, बी व ए या उलटय़ा क्रमाने वीजपुरवठा खंडित करावा लागतो.

त्यातही ज्या भागात वीज गळती अधिक, चोरी अधिक आणि थकबाकी जास्त राहत असते अशा फीडरवर आधी वीजपुरवठा खंडित करावा लागतो. नाइलाज झालाच तर ए ग्रेडच्या फीडरवरही वीजपुरवठा बंद करावा लागत आहे.

नागरिकांमध्ये नाराजी

सण-उत्सवांच्या काळात तरी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. परंतु शहरातील अनेक भागात सायंकाळच्या वेळीच वीजपुरवठा खंडित होत आहे. बुधवारी तर यात्रेत अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. असाच प्रकार गणेशोत्सवात विसजर्न मिरवणुकीच्या वेळी हरिहर भेट होत असतानाच वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता नवरात्रोत्सवातदेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे नाराजी आहे. सायंकाळी व रात्रीच्या वेळी तरी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

'' भारनियमन सध्या बंद आहे. परंतु वरिष्ठ पातळीवरून वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश आल्यास फीडरनिहाय वीजपुरवठा बंद करावा लागतो. ब:याच वेळा एकापेक्षा जास्त फीडरवर वीजपुरवठा बंद ठेवावा लागतो. त्यासाठी वेळेची मर्यादा नसते. तसे केले नाही तर राज्य पातळीवरील यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका असतो. सध्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा होत आहे. तूट किंवा टंचाई नाही. त्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे भारनियमन होत नाही.''

-अनिल पाटील, कार्यकारी अभियंता,

वीज वितरण कंपनी, नंदुरबार.