शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जामनेरात बनावट मिठ साठ्याची लावली विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 19:59 IST

जामनेरात बनावट मिठ साठ्याची व्यापाऱ्यांनी विल्हेवाट लावल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या कारवाईने व्यापारी सावधमहसूल विभागाकडून तपासणी

जामनेर  :  टाटा मिठाचा बनावट साठा येथील मयूर ट्रेडर्समधून गुरुवारी पोलिसांनी जप्त केल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईनंतर सावध झालेल्या इतर दुकानदारांनी त्यांच्याकडील बनावट मिठाच्या साठ्याची विल्हेवाट लावल्याची माहिती मिळाली आहे.कोमल एजन्सीकडून आणखी कोणी मिठाचा साठा घेऊन त्याची विक्री केली याबाबत पोलीस तपास करीत आहे. मोहम्मद हुसेन चौधरी (रा.जोगेश्वरी, पश्चिम, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजकुमार प्रकाशचंद कावडिया (रा.बजरंगपुरा, जामनेर) यांच्या कोमल एजन्सी दुकानातून व बाजार समितीच्या दुकान नंबर १६ मधून ३ लाख १२ हजार रुपये किमतीच्या बनावट टाटा सॉल्ट कंपनीच्या ३१२ गोण्या जप्त केल्या. टाटा सॉल्ट कंपनीचे स्वामित्व अधिकाराचे उल्लंघन करून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळून आल्याने भादंवि कलम ४८२, ४८६, प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७ (सुधारित अधिनियम १९८४ व १९९४ चे कलम ५१, ६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन काळात शहरातील काही किराणा व्यावसायिक भेसळ केलेल्या खाद्य तेलाचा साठा करीत असून, त्याची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. महसूल विभागाने तपासणी केली, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने खुलेआम तेल विक्री सुरूच राहिली. राजकीय अभय असल्याने अशा व्यापाऱ्यांना कारवाईची भीती नाही. जामनेर येथून तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटे किराणा दुकानदार तेल, मीठ विक्रीसाठी नेतात. बनावट मीठ व भेसळयुक्त तेलामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळाला जात असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने याकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. काही नागरिक याबाबत ग्राहक न्यायालयात  दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :businessव्यवसायJamnerजामनेर