शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

कचर्‍याची विल्हेवाट उघड्यावर

By admin | Updated: November 5, 2014 15:03 IST

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद असल्याने मनपाकडून शहरातील गोळा केलेला कचरा त्या-त्या भागातच ठराविक ठिकाणी उघड्यावर टाकून दिला जात आहे.

 

जळगाव : प्रशासनाकडून नागरिकांमध्ये साफसफाईबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अभियान राबविले जात असतानच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद असल्याने मनपाकडून मात्र शहरातील गोळा केलेला कचरा त्या-त्या भागातच ठराविक ठिकाणी उघड्यावर टाकून दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. 
शहरातून दररोज १00 ते १२0 टन कचरा गोळा करून या प्रकल्पावर नेला जातो. मात्र प्रकल्प बंद असल्याने कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्याने गेल्या दीड वर्षांपासून हजारो टन कचरा या प्रकल्पाच्या आवारात जमा झाला आहे. 
त्यामुळे प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापासूनच कचर्‍याचे मोठे ढीग साचले आहेत. ते पेटवून देण्यात येत आहेत. तर काही ढीग आपोआपच पेट घेत आहेत. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २000 नुसार घनकचरा प्रकल्प अचानक बंद करता येत नाही. कारण त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कचर्‍यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवसाकाठी या प्रकल्पात जमा होणार्‍या १00 ते १२0 टन कचर्‍याची त्याच रात्री प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाते. कारण हा कचरा जर जास्तवेळ पडून राहिला तर त्यातून C2H2 म्हणजेच ग्रीन गॅस( मार्श गॅस) तयार होतो. त्याचा वातावरणातील O3 शी संयोग होऊन CO2 (कार्बनडाय ऑक्साईड) व H2O (पाणी) तयार होते. ते देखील वातावरणास घातक आहे. त्यामुळे कचरा पडून न राहू देता त्यावर तातडीने प्रक्रिया केली जाते. मात्र सुमारे दीड वर्षांपासून प्रकल्प बंद असून तेथे शहरातील कचरा मात्र दररोज जमा होत आहे. त्यामुळे आतापर्यंत हजारो टन कचरा प्रक्रियेविनाच पडून आहे.
-------------
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दीड वर्षांपासून बंद पडला आहे. कचर्‍याचे ढीगच्या ढीग साठले आहे. त्यावर प्रक्रिया होत नसल्याने त्यातून विषारी वायूचे उत्सर्जन वातावरणात सुरू आहे. त्यामुळे या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मात्र मनपा प्रशासन ढीम्म आहे. यादृष्टीने काहीही हालचाली अद्यापपर्यंत झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. जुनी न.पा.च्या जागेवरील खड्डय़ात मनपातर्फे कचरा टाकून पेटवून देण्यात येत आहे. शहरातील कचरा हंजीरच्या जागेत नेऊन टाकला जात असल्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे डंपींग ग्राऊंड बनले आहे. आता तर तेथे कचरा टाकण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे मेहरूण व परिसरातील कचरा मेहरूण तलावाच्या सांडव्याच्या काठावर टाकण्याचे उद्योग आरोग्य विभागाकडून सुरू आहेत. तसेच स्मशानभूमीजवळ, मिल्लतनगर समोरील (अक्सानगर) रस्त्यावर, प्रजापतनगर या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या कचर्‍यातून निघणार्‍या विषारी वायू व दुर्गंधीमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्रास जाळला जातो कचरा घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २000 नुसार कचर्‍यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असून कचरा जाळणे गुन्हा आहे. मात्र तरीही सर्रास कचरा पेटवून दिला जात आहे. त्यामुळे सफाई मोहिमेबरोबरच याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.