शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

चर्चा आता शेतावर व्हावी - संपाबाबत नेटिझन्सचा सूर

By admin | Updated: June 3, 2017 19:05 IST

बळीराजाच बळी दिला जात असल्याने संतापाची लाट संप मागे घेतल्यानंतरही कायम

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 3 -  कर्ज असो वा हमीभाव यासाठी जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच बळी दिला जात असल्याने संतापाची लाट  संप मागे घेतल्यानंतरही कायम असून या बाबत सोशल मीडियावर सकाळपासून ‘चर्चा आता वर्षा बंगल्यावर नको, शेतावर व्हावी..’ असे वेगवेगळे संदेश फिरत आहे. कजर्माफीचा प्रश्न असो वा शेतमालाला हमीभाव मिळण्याचा प्रश्न असो, यासाठी शेतकरी वेठीस धरला जात असल्याने शेतक:यांनी 1 जूनपासून संप पुकारला. या संपाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश फिरू लागले. अखेर  कोअर कमिटीच्या सदस्यांची सरकारशी चर्चा होऊ हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या नंतरही सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश फिरू लागले. मुख्यमंत्री गोड बोलून वेळ मारून नेतातशेतक:यांशी चर्चा होऊन संप मागे घेतला असला तरी यामध्ये मुख्यमंत्र्यांवर अविश्वास दाखवत ‘मुख्यमंत्री गोड बोलून वेळ मारून नेतात’, असे संदेश पाठविले जात आहे. सोबतच आता आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात शेतक:यांच्या पदरात काय पडेल, हे सांगता ये नाही याची शाश्वती नसल्याचा सूर उमटत आहे. शेतक:यांनी सावध रहायला हवेसरकारच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण करीत सरकारने निवडणुकीपूर्वी शेतक:यांबाबत सकारात्मक चित्र निर्माण केले होते. मात्र सत्ता मिळताच सरकारने शब्द फिरविले असल्याने शेतक:यांनी आताही सावध रहायला हवे, असे आवाहन केले जात आहे. विश्वास ठेवू नकासरकारने अल्प भूधारक शेतक:यांना कजर्माफीची घोषणा केली असली तरी ती प्रत्यभात मिळेल की नाही याबाबत विश्वास न ठेवण्याचा उल्लेख करीत आता चर्चा बंगल्यावर नको, शेतावर व्हावी, असे आवाहन केले जात आहे. संपादरम्यान कोअर कमिटीचे सदस्य फुटल्याचा आरोप करीत संपाबाबत संभ्रम असल्याचे, शेतक:यांना संप मागे घेतल्याचा निर्णय अमान्य असेही छोटे, मोठे संदेश व डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची यादी व त्यासाठी लिंकही शेअर केली जात आहे. मुख्यमंत्र्यांची चित्रफितनिवडणुकीपूर्वी भाजपाने काढलेल्या दिंडी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक:यांची बाजू घेत तत्कालीन सरकराला शेतकरी धडा शिकवतील, असे वक्तव्य केले होते. ही चित्रफीतही फिरत आहे. सरकारचे समर्थनया अविश्वासाच्या संदेशासह सरकारचे समर्थन करणारेही संदेश फिरत आहे. यामध्ये सरकारने केलेले काम, आताच्या बोलणीमध्ये झालेले मुद्दे मांडले जात आहे. जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाचे डिजिटलायङोशनसोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता सर्वत्र आपापली माहिती शेअर करण्यासाठी याचा पुरेपूर वापर केला जात आहे. यामध्ये जळगाव जिल्हा माहिती कार्यालयानेही याचा स्वीकार करीत आपली माहिती, शासकीय उपक्रम, दररोजच्या बातम्या शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर लिंक पाठविली जात आहे.