शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता वृध्देचे मृत्यू प्रकरण : सत्य शोधण्यासाठी एसआयटी स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 11:40 IST

डॉक्टरांवर कारवाईचा बडगा; पोलिसांची जबाबदारी नाही का?

जळगाव : बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित मालती नेहते या वृध्देच्या मृत्यूस जबाबदार व कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवून अधिष्ठाता व दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केली, मग महिला बेपत्ता झाल्याचे कळवूनही त्याची चौकशी न करणाऱ्या पोलिसांची काहीच जबाबदारी नाही का? असा सवाल निलंबित झालेल्या डॉक्टरांसह कोरोना रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, मालती नेहते यांच्या मृत्यूस नेमके कोण जबाबदार आहे, हे सत्य शोधण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी आठ जणांची एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केली आहे.मालती नेहते यांच्या मृत्यूप्रकरणी वॉर्ड क्र.७ मधील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर दुसºयाच दिवशी अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे, सहायक प्राध्यापक डॉ.सुयोग चौधरी व कनिष्ठ निवासी डॉ.कल्पना धनकवार यांना निलंबित करण्यात आले. या कारवाईनंतर २४ तास कोरोना रुग्णालयात काम करणाºया डॉक्टर व कर्मचाºयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. काम करणाºयांना निंलबित केले, मग काम न करता लाखोने पगार घेणारे डॉक्टर तसेच बेपत्ताची माहिती कळवूनही तपास न करणाºया पोलिसांचे काय? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. नेहते या दोन जून रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना कळविली. ज्या पोलीस कर्मचाºयाला माहिती कळविली, त्याची नोंद रुग्णालयाच्या दप्तरी घेण्यात आली. तेव्हापासून तपास करण्याची जबाबदारी पोलिसांची होती असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.एसपी म्हणतात, लेखी तक्रार दिल्यापासून कारवाई सुरुयासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना विचारले असता, पोलिसात लेखी कळविल्यानंतर त्याच दिवशी हरविल्याची नोंद घेण्यात आली व तेव्हापासूनच तपास सुरु करण्यात आला. यात कुठलीही कुचराई केलेली नाही. नेहते या दोन जून रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्याच दिवशी रुग्णालय प्रशासनाने लेखी कळवायला हवे होते, मात्र त्यांनी तसे कळविले नाही. तोंडी कळविण्याला अर्थ नाही. एखादी घटना घडली तरी त्याचा लेखी मेमो रुग्णालयाकडून पोलीस ठाण्यात पाठविला जातो, मग या घटनेत का नाही कळविला? असेही डॉ.उगले म्हणाले. दरम्यान, या घटनेत २ ते ५ तीन दिवस फक्त टोलवाटोलवी व जबाबदारी झटकण्याचेच काम झाल्याचे यावरुन सिध्द होते. हे प्रकरण ना रुग्णालयाने गांभिर्याने घेतले, ना पोलिसांनी. रितसर हरविल्याची नोंद झाल्यानंतरच सूत्रे हलली व त्यानंतरही पाच दिवसांनी नेहते यांचा मृतदेह आढळून आला.पहिल्याच दिवशी २० जणांचा जबाबएसआयटीने शुक्रवारी पहिल्याच दिवशी कोविड रुग्णालयातील परिचारिका, वॉर्ड बॉय व सफाई कामगार अशा २० जणांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी रुग्णालयात जावून चौकशी केली व कोणाचे जबाब नोंदवायचे याची यादी तयार केली, साधारण ५० जणांचे जबाब यात घेतले जाणार आहे. दुसºया एका पथकाने भुसावळ येथे नेहते यांच्या घरी, गल्लीत तसेच रेल्वे रुग्णालयात जावून चौकशी केली. तेथेही काही जणांचे जबाब नोंदविण्यात आले.महिला बेपत्ता झाल्यानंतर रुग्णालयाने रितसर लेखी कळविणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी कळविले नाही. जेव्हा लेखी तक्रार आली, तेव्हापासून तपासाला गती देण्यात आली. मृत्यूस नेमके कोण जबाबदार आहे, कोणाचा हलगर्जीपणा झाला आहे याची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी ८ जणांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव