शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

बेपत्ता वृध्देचे मृत्यू प्रकरण : सत्य शोधण्यासाठी एसआयटी स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 11:40 IST

डॉक्टरांवर कारवाईचा बडगा; पोलिसांची जबाबदारी नाही का?

जळगाव : बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित मालती नेहते या वृध्देच्या मृत्यूस जबाबदार व कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवून अधिष्ठाता व दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केली, मग महिला बेपत्ता झाल्याचे कळवूनही त्याची चौकशी न करणाऱ्या पोलिसांची काहीच जबाबदारी नाही का? असा सवाल निलंबित झालेल्या डॉक्टरांसह कोरोना रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, मालती नेहते यांच्या मृत्यूस नेमके कोण जबाबदार आहे, हे सत्य शोधण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी आठ जणांची एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केली आहे.मालती नेहते यांच्या मृत्यूप्रकरणी वॉर्ड क्र.७ मधील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर दुसºयाच दिवशी अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे, सहायक प्राध्यापक डॉ.सुयोग चौधरी व कनिष्ठ निवासी डॉ.कल्पना धनकवार यांना निलंबित करण्यात आले. या कारवाईनंतर २४ तास कोरोना रुग्णालयात काम करणाºया डॉक्टर व कर्मचाºयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. काम करणाºयांना निंलबित केले, मग काम न करता लाखोने पगार घेणारे डॉक्टर तसेच बेपत्ताची माहिती कळवूनही तपास न करणाºया पोलिसांचे काय? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. नेहते या दोन जून रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना कळविली. ज्या पोलीस कर्मचाºयाला माहिती कळविली, त्याची नोंद रुग्णालयाच्या दप्तरी घेण्यात आली. तेव्हापासून तपास करण्याची जबाबदारी पोलिसांची होती असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.एसपी म्हणतात, लेखी तक्रार दिल्यापासून कारवाई सुरुयासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना विचारले असता, पोलिसात लेखी कळविल्यानंतर त्याच दिवशी हरविल्याची नोंद घेण्यात आली व तेव्हापासूनच तपास सुरु करण्यात आला. यात कुठलीही कुचराई केलेली नाही. नेहते या दोन जून रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्याच दिवशी रुग्णालय प्रशासनाने लेखी कळवायला हवे होते, मात्र त्यांनी तसे कळविले नाही. तोंडी कळविण्याला अर्थ नाही. एखादी घटना घडली तरी त्याचा लेखी मेमो रुग्णालयाकडून पोलीस ठाण्यात पाठविला जातो, मग या घटनेत का नाही कळविला? असेही डॉ.उगले म्हणाले. दरम्यान, या घटनेत २ ते ५ तीन दिवस फक्त टोलवाटोलवी व जबाबदारी झटकण्याचेच काम झाल्याचे यावरुन सिध्द होते. हे प्रकरण ना रुग्णालयाने गांभिर्याने घेतले, ना पोलिसांनी. रितसर हरविल्याची नोंद झाल्यानंतरच सूत्रे हलली व त्यानंतरही पाच दिवसांनी नेहते यांचा मृतदेह आढळून आला.पहिल्याच दिवशी २० जणांचा जबाबएसआयटीने शुक्रवारी पहिल्याच दिवशी कोविड रुग्णालयातील परिचारिका, वॉर्ड बॉय व सफाई कामगार अशा २० जणांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी रुग्णालयात जावून चौकशी केली व कोणाचे जबाब नोंदवायचे याची यादी तयार केली, साधारण ५० जणांचे जबाब यात घेतले जाणार आहे. दुसºया एका पथकाने भुसावळ येथे नेहते यांच्या घरी, गल्लीत तसेच रेल्वे रुग्णालयात जावून चौकशी केली. तेथेही काही जणांचे जबाब नोंदविण्यात आले.महिला बेपत्ता झाल्यानंतर रुग्णालयाने रितसर लेखी कळविणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी कळविले नाही. जेव्हा लेखी तक्रार आली, तेव्हापासून तपासाला गती देण्यात आली. मृत्यूस नेमके कोण जबाबदार आहे, कोणाचा हलगर्जीपणा झाला आहे याची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी ८ जणांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव