शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण रेल्वे उड्डाणपूल अखेर जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य सुरू असून, जळगाव ते भुसावळच्या दिशेने नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य सुरू असून, जळगाव ते भुसावळच्या दिशेने नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर त्यास समांतर असणारा जीर्ण झालेला जुना ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल महामार्ग प्राधिकरणाने जमीनदोस्त करण्यात सुरुवात केली आहे. या ठिकाणी समांतर असा नवीन भुसावळ ते जळगाव या दिशेने रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. या पुलाखाली अनेक घातपात झाले आहेत. पुलावरही अनेक अपघाताचा हा पूल साक्षीदार होता. तो आता इतिहासजमा झाला आहे.

महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य अति जलद गतीने सुरू आहे. फुलगाव ते तरसोद भुसावळ हद्दीत होणाऱ्या ३२ किलोमीटर महामार्गाच्या कामात चार रेल्वे उड्डाणपूल आहेत. ४ जून रोजी सायंकाळी सहाला भुसावळ महामार्गावरील जळगावच्या दिशेने जाणारा नवीन रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर आता ब्रिटिशकालीन जीर्ण झालेला रेल्वे उड्डाणपूल जमीनदोस्त करण्याच्या कार्याला सुरुवात झाली आहे. या कामासाठी जवळपास एक महिना लागणार आहे. यानंतर या ठिकाणी भुसावळ ते जळगाव दिशेने समांतर दुसरा नवीन रेल्वे उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. यासाठी साधारण पाच महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. अर्थात ते रेल्वेच्या ब्लॉक मिळण्यावर अवलंबून असेल.

अनेक घातपात-अपघाताचा होता साक्षी

ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल हा अनेक घातपाताचा साक्षी होता. या पुलाखाली अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. अनेकांनी रेल्वे रुळावर आत्महत्यासुद्धा केलेली आहे, तर कित्येक जणांची लूटही याठिकाणी झालेली आहे. तसेच पुलावरही मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. या पुलावरील अनेक अनेक किस्से चर्चेत नेहमीच असतात.

पुलास पडले होते मोठे भगदाड

ब्रिटिश काळातील या जीर्ण पुलाची अत्यंत विदारक स्थिती झाली होती. पुलाच्या वर मोठे भगदाड पडले होते. याखाली जाणारी रेल्वे गाडी पुलावरून दिसत होती. कोणत्याही स्थितीत पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्याआधीच पुलास जमीनदोस्त करण्यात आले.

लाखो रेल्वेगाड्या तसेच कोटीच्या संख्येने गेली पुलावरून व खालून वाहने

या पुलाखालील रेल्वे रुळावरून लाखो रेल्वेगाड्यांमधून देशभरातील कानाकोपऱ्यातील प्रवाशांनी अपडाऊनच्या दिशेने प्रवास केला आहे. याशिवाय पुलावरून चार चाकीसह कोट्यवधी दुचाकी वाहनांनी प्रवास केला आहे. तो आता इतिहास जमा होणार असून फक्त राहतील फक्त आठवणी...