शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

जीर्ण रेल्वे उड्डाणपूल अखेर जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य सुरू असून, जळगाव ते भुसावळच्या दिशेने नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य सुरू असून, जळगाव ते भुसावळच्या दिशेने नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर त्यास समांतर असणारा जीर्ण झालेला जुना ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल महामार्ग प्राधिकरणाने जमीनदोस्त करण्यात सुरुवात केली आहे. या ठिकाणी समांतर असा नवीन भुसावळ ते जळगाव या दिशेने रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. या पुलाखाली अनेक घातपात झाले आहेत. पुलावरही अनेक अपघाताचा हा पूल साक्षीदार होता. तो आता इतिहासजमा झाला आहे.

महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य अति जलद गतीने सुरू आहे. फुलगाव ते तरसोद भुसावळ हद्दीत होणाऱ्या ३२ किलोमीटर महामार्गाच्या कामात चार रेल्वे उड्डाणपूल आहेत. ४ जून रोजी सायंकाळी सहाला भुसावळ महामार्गावरील जळगावच्या दिशेने जाणारा नवीन रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर आता ब्रिटिशकालीन जीर्ण झालेला रेल्वे उड्डाणपूल जमीनदोस्त करण्याच्या कार्याला सुरुवात झाली आहे. या कामासाठी जवळपास एक महिना लागणार आहे. यानंतर या ठिकाणी भुसावळ ते जळगाव दिशेने समांतर दुसरा नवीन रेल्वे उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. यासाठी साधारण पाच महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. अर्थात ते रेल्वेच्या ब्लॉक मिळण्यावर अवलंबून असेल.

अनेक घातपात-अपघाताचा होता साक्षी

ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल हा अनेक घातपाताचा साक्षी होता. या पुलाखाली अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. अनेकांनी रेल्वे रुळावर आत्महत्यासुद्धा केलेली आहे, तर कित्येक जणांची लूटही याठिकाणी झालेली आहे. तसेच पुलावरही मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. या पुलावरील अनेक अनेक किस्से चर्चेत नेहमीच असतात.

पुलास पडले होते मोठे भगदाड

ब्रिटिश काळातील या जीर्ण पुलाची अत्यंत विदारक स्थिती झाली होती. पुलाच्या वर मोठे भगदाड पडले होते. याखाली जाणारी रेल्वे गाडी पुलावरून दिसत होती. कोणत्याही स्थितीत पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्याआधीच पुलास जमीनदोस्त करण्यात आले.

लाखो रेल्वेगाड्या तसेच कोटीच्या संख्येने गेली पुलावरून व खालून वाहने

या पुलाखालील रेल्वे रुळावरून लाखो रेल्वेगाड्यांमधून देशभरातील कानाकोपऱ्यातील प्रवाशांनी अपडाऊनच्या दिशेने प्रवास केला आहे. याशिवाय पुलावरून चार चाकीसह कोट्यवधी दुचाकी वाहनांनी प्रवास केला आहे. तो आता इतिहास जमा होणार असून फक्त राहतील फक्त आठवणी...