शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

जीर्ण रेल्वे उड्डाणपूल अखेर जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य सुरू असून, जळगाव ते भुसावळच्या दिशेने नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य सुरू असून, जळगाव ते भुसावळच्या दिशेने नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर त्यास समांतर असणारा जीर्ण झालेला जुना ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल महामार्ग प्राधिकरणाने जमीनदोस्त करण्यात सुरुवात केली आहे. या ठिकाणी समांतर असा नवीन भुसावळ ते जळगाव या दिशेने रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. या पुलाखाली अनेक घातपात झाले आहेत. पुलावरही अनेक अपघाताचा हा पूल साक्षीदार होता. तो आता इतिहासजमा झाला आहे.

महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य अति जलद गतीने सुरू आहे. फुलगाव ते तरसोद भुसावळ हद्दीत होणाऱ्या ३२ किलोमीटर महामार्गाच्या कामात चार रेल्वे उड्डाणपूल आहेत. ४ जून रोजी सायंकाळी सहाला भुसावळ महामार्गावरील जळगावच्या दिशेने जाणारा नवीन रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर आता ब्रिटिशकालीन जीर्ण झालेला रेल्वे उड्डाणपूल जमीनदोस्त करण्याच्या कार्याला सुरुवात झाली आहे. या कामासाठी जवळपास एक महिना लागणार आहे. यानंतर या ठिकाणी भुसावळ ते जळगाव दिशेने समांतर दुसरा नवीन रेल्वे उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. यासाठी साधारण पाच महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. अर्थात ते रेल्वेच्या ब्लॉक मिळण्यावर अवलंबून असेल.

अनेक घातपात-अपघाताचा होता साक्षी

ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल हा अनेक घातपाताचा साक्षी होता. या पुलाखाली अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. अनेकांनी रेल्वे रुळावर आत्महत्यासुद्धा केलेली आहे, तर कित्येक जणांची लूटही याठिकाणी झालेली आहे. तसेच पुलावरही मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. या पुलावरील अनेक अनेक किस्से चर्चेत नेहमीच असतात.

पुलास पडले होते मोठे भगदाड

ब्रिटिश काळातील या जीर्ण पुलाची अत्यंत विदारक स्थिती झाली होती. पुलाच्या वर मोठे भगदाड पडले होते. याखाली जाणारी रेल्वे गाडी पुलावरून दिसत होती. कोणत्याही स्थितीत पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्याआधीच पुलास जमीनदोस्त करण्यात आले.

लाखो रेल्वेगाड्या तसेच कोटीच्या संख्येने गेली पुलावरून व खालून वाहने

या पुलाखालील रेल्वे रुळावरून लाखो रेल्वेगाड्यांमधून देशभरातील कानाकोपऱ्यातील प्रवाशांनी अपडाऊनच्या दिशेने प्रवास केला आहे. याशिवाय पुलावरून चार चाकीसह कोट्यवधी दुचाकी वाहनांनी प्रवास केला आहे. तो आता इतिहास जमा होणार असून फक्त राहतील फक्त आठवणी...