शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

डिजीटल बोर्ड पडले अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:13 IST

बेटी बचाव बेटी पढाओ अभियान, लाखो रुपयांचा खर्च गेला पाण्यात

मतीन शेख।मुक्ताईनगर : केंद्र सरकारच्या डिजीटल इंडीया उपक्रमाअंतर्गत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी नागरिकांचा राबता असलेल्या कार्यालयांमध्ये ‘डिजीटल गुड्डी’ बोर्ड लावले होते. मात्र येथील एकाही कार्यालयात हा बोर्ड सुस्थितीत दिसत नाही, तर काही कार्यालयात हे बोर्ड अडगळीत पडलेले दिसून आले. जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हीच स्थिती आहे. एकंदरीत यावर झालेला खर्च पाण्यात गेला की काय असे चित्र आहे.‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या लोगोचा उपयोग करून तयार केलेल्या या डिजीटल बोर्डला आॅनलाईन जोडणी करुन मुला-मुलींच्या जन्मदराचे अवलोकन करणे तसेच बोर्डला एक आॅडिओ व्हिज्युअल डिस्प्ले युनिट तत्कालीन जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्या कल्पनेतून साकारण्यात आले होते. त्यासाठी शाळेत जाणाऱ्या मुलीचा कटआऊट बनविण्यात आला. या मुलीच्या हातातील शाळेच्या पाटीच्या आकारात एक १७ इंची डिजीटल डिस्प्ले बसविण्यात आला. या डिस्प्लेवर मान्यवरांचे संदेश, स्त्री भ्रूण हत्या विरोधी जनजागृतीपर संदेश, महिला सक्षमीकरणाबाबतच्या योजना, महिलासंदर्भात महत्वाचे असणारे टोल फ्री क्रमांक आदी माहिती प्रसारित करण्यात येत असे . जिल्हा व तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये हे बोर्ड बसविण्यात आले होते. विशेष करून नागरिकांचा राबता असलेल्या तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत, उपजिल्हा आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी हे डिजिटल बोर्ड बसविण्यात आले होते.दरम्यान उपक्रम सुरुकेल्यावर चार वर्षांनंतर या डिजिटल बोर्ड बाबत जाणून घेण्यासाठी येथील विविध कार्यालयात भेटी दिल्या असता तहसीलदारांच्या दालनात लावण्यात बोर्ड नव्हते, पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांच्या दलनातील हे बोर्ड काही करता सुरू होत नव्हते, उपजिल्हा रुग्णालयात बोर्ड चोरी होऊ नये यासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवल्याचे समजले तर नगर पंचायत आतित्वात आल्या पासून बोर्ड गायब आहे.बोर्ड नसलेल्या कार्यालयातील हे डिजिटल बोर्ड कोठे गेले याचा शोध घेतला असता धक्काच बसला. काही ठिकाणी रेकार्ड रूम मध्ये कोठे जिन्यात अडगळीत तर कोठे कार्यालयीन अधीक्षकाच्या खोलीत ठेवलेले दिसून आले.सरकारने केले होते कौतुकसुमारे चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात लावण्यात आलेल्या बोर्डचा गवगवा चांगलाच झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी जळगाव जिल्ह्यातील या अनोख्या डिजीटल उपक्रमाचे कौतुक केल होते.. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने जुलै २०१५ दरम्यान राबविलेल्या डिजीटल इंडिया अभियानाचा सर्वोत्तम उपक्रम म्हणून जळगावच्या या उपक्रमाला स्वीकारले होते.