शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रस्ता खोदल्यामुळे विजेचे खांब कोसळून अपघात घडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी विद्युत खांब हटविण्यापूर्वीच रस्ता खोदण्यात आल्यामुळे, या ठिकाणी असलेली अतिउच्च क्षमतेची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी विद्युत खांब हटविण्यापूर्वीच रस्ता खोदण्यात आल्यामुळे, या ठिकाणी असलेली अतिउच्च क्षमतेची विद्युत लाइन जोरदार वाऱ्याने कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तत्काळ खोदलेल्या रस्त्याच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरणारे विद्युत खांब अखेर महावितरण प्रशासनातर्फेच हटविण्यात येणार आहेत. त्यामुळे महावितरण प्रशासनातर्फे या कामाची जोरदार तयारी करण्यात येत असून, यासाठी सोमवारी दुपारी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र डांगे, सहायक अभियंता रोहित गोवे, विजय कापुरे यांनी शिवाजीनगर उड्डाणपुलाची पाहणी केली. या वेळी त्यांना टॉवर चौकापासून ते जुन्या जिल्हा परिषद इमारतीपर्यंत अनेक ठिकाणी वीज खांबांच्या आजूबाजूला दोन ते अडीच फुटांपर्यंत खोदकाम केलेले आढळून आले. विशेष म्हणजे वीज खांब हटविण्याआधीच खोदकाम करण्यात आल्यामुळे आजूबाजूचा परिसर पूर्णपणे मोकळा झाला आहे. तसेच पुढील आठवड्यापासून पावसाळा सुरू होणार असल्याने, पावसाच्या पाण्यामुळे येथील मातीचा भाग पूर्णपणे खचून हे विद्युत खांब कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर दिवसा हे खांब कोसळले तर जीवितहानी होण्याची शक्यताही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

इन्फो :

मनपा आयुक्तांना दिले पत्र

या प्रकाराबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना संभाव्य धोका आणि अपघाताची परिस्थिती लक्षात घेता तत्काळ खोदलेल्या रस्त्याच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे. तसेच खांब हटविण्याआधीच खोदकाम केल्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.