शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांना वेगळा अन राजकारण्यांना वेगळा न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसल्याने शासनाने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व जनतेच्या भल्यासाठीच असल्याने गेल्या महिनाभरापासून ...

कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसल्याने शासनाने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व जनतेच्या भल्यासाठीच असल्याने गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातही या निर्बंधांचे पालन सर्वसामान्य जनता मुकाट्याने करीत आहे. जे या निर्बंधांचे पालन करीत नाहीत, त्यांना पोलीस व मनपा प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच ॲंटीजन चाचणी केली जात आहे. जे निगेटिव्ह येतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असून पॉझिटिव्ह आल्यास कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी केली जात आहे. यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यास निश्चित मदत होत आहे. हे सर्व खरे असले तरीही सर्वांना समान न्याय मात्र प्रशासन करताना दिसत नाही. राजकारण्यांना मात्र यातून वगळण्यात आले आहे की काय, असे चित्र सध्या जळगावात दिसत आहे. दुसऱ्या लाटेची सुरुवात फेब्रुवारीत झाली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा सुरू होता. त्या दौऱ्यातही फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. अनेक कार्यकर्त्यांनी तर मास्कही लावलेले नव्हते. परिणामी दौरा आटोपल्यानंतर अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह झाले. मात्र तेव्हाही सर्व सामान्यांकडून काटेकोर नियमांची अंमलबजावणीची अपेक्षा करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली. किंबहुना काही करू शकत नसल्याने डोळेझाक केली, असेच म्हणावे लागेल. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण प्रचंड प्रमाणात वाढले. अगदी देशातील सर्वाधिक संसर्ग असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश झाला. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेड शोधण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ नागरिकांवर आली. आता कुठे परिस्थिती जेमतेम नियंत्रणात आली असून संसर्ग हळूहळू कमी होत असताना काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांचा शनिवारी जिल्हा दौरा झाला. त्यांनी अजिंठा विश्रामगृहावर कॉंग्रेसच्या विविध फ्रंटल्सच्या पदाधिकाऱ्यांची तब्बल चार तास आढावा बैठक घेतली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उघड उल्लंघन झाले. वास्तविक राज्यभर कोरोनाचे कडक निर्बंध लागू आहेत. जिल्हा बंदी करण्यात आली असून केवळ हॉस्पिटल अथवा अंत्यसंस्कार या दोन कारणांसाठीच जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी असताना आमदार शिंदे सोलापूरपासून तीन-चार जिल्हे ओलांडून जळगावात पोहोचल्याच कशा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्या आल्यानंतरही सर्व राजकीय कार्यक्रमांवर बंदी असतानाही अजिंठा विश्रामगृहावर चार तास बैठका घेतल्याच कशा? याची माहिती पोलीस अथवा जिल्हा प्रशासनाला नव्हती असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. याबाबत पोलीस अधीक्षकांना विचारणा केली असता तक्रार आल्यास कारवाई करू अशी भूमिका घेतली तर जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करू असे स्पष्ट केले आहे. मात्र त्याचवेळी कार्यक्रम रोखून संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे. सर्व सामान्यांना रस्त्यावर अडवून कारवाई करणारे जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा राजकारण्यांबाबत मात्र सोयीची भूमिका घेत असल्याचेच यातून दिसून येत आहे.