शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

धुळे चकाकणार ‘एलईडी’ दिव्यांनी!

By admin | Updated: October 2, 2015 00:46 IST

धुळे : घरगुती वीज ग्राहकांना 105 रुपयात एलईडी बल्ब उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आह़े.या योजनेचा येत्या 15 दिवसात शहरात प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़

धुळे : शहरातील घरगुती वीज ग्राहकांना 105 रुपयात एलईडी बल्ब उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आह़े 1 जुलैपासून राज्यातील अन्य शहरात राबविण्यात येत असलेल्या या योजनेचा येत्या 15 दिवसात धुळे शहरात प्रारंभ होणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली़‘डोमेस्टिक इफिशियंट लाईटिंग प्रोग्रॅम’ (डीईएलपी) या योजनेंतर्गत राज्य शासनाने एनर्जी इफिशियन्सी सव्र्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीशी करार केला आह़े या योजनेंतर्गत घरगुती वीज ग्राहकांना बाजारात 400 रुपयांना मिळणारा 7 व्हॅटचा एलईडी बल्ब अवघ्या 105 रुपयात उपलब्ध करून दिला जाणार आह़े या योजनेत वीज ग्राहकाला सर्वप्रथम 10 रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. त्यानंतर दहा महिने दर महिन्याच्या वीज बिलाच्या माध्यमातून दहा रुपये वसूल केले जातील व अकराव्या महिन्यात 5 रुपये वसूल केले जातील़ ‘लोकमत’शी बोलताना दिली़ सदर योजनेत जुने चालू बल्बही स्वीकारले जाणार असल्याचेही सांगण्यात आल़े मात्र त्याबाबत अजून अधिक स्पष्टता झालेली नाही़ सदर कंपनीचा राज्यातील सर्व वीज कंपन्यांशी 8 जुलै 2015 ला करार झाला असून योजनेला आतार्पयत ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, अमरावती याठिकाणी सुरुवात झाली आह़े या योजनेत सहभागी होण्यासाठी वीज ग्राहकांना कंपनीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आह़े याठिकाणी मिळणा:या नोंदणी क्रमांकासह लेखी अर्ज व फोटो आणि पत्त्याची कागदपत्रे (आधार कार्ड, मतदान कार्ड) द्यावी लागतील़

केंद्र शासनाची योजना

राज्यात वीज कंपनीला थकबाकीमुळे आर्थिक फटका बसत आह़े त्यामुळे केंद्र शासनाच्या

वीज कंपन्यांशी करार

शिवाय 100 रुपयात विकतही बल्ब उपलब्ध करून दिले जाणार आहेत़ एका वीज ग्राहकाला कमीत कमी दोन व जास्तीत जास्त चार एलईडी बल्ब उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती ईईएसएल कंपनीच्या सूत्रांनी

कंपनी तपासणार बिले

ग्राहकांना एलईडी बल्ब उपलब्ध करून दिल्यानंतर संबंधित कंपनी 1 वर्षार्पयत वीज बिले तपासणार आह़े जे नागरिक एलईडी बल्बचे हप्ते नियमित भरतील त्यांची यादी कंपनीकडून वीज कंपनीला दिली जाईल व संबंधित ग्राहकांना पुढील बिलात त्यांची अनामत रक्कम माफ करून दिली जाईल़

वीज कंपनीला होणार लाभ

जिल्ह्यात वीज कंपनीचे 8 लाख घरगुती ग्राहक आहेत़ मात्र त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात वीज बिलाची थकबाकी आह़े थकबाकी वसूल करत करत वीज कंपनीची चांगलीच दमछाक होत असल्याने ही योजना वीज कंपनीला लाभदायी ठरणार आह़े एलईडी बल्ब ग्राहकांना उपलब्ध करून दिल्यामुळे वीज बिलात 60 टक्के बचत होणार आह़े परिणामी वीज बिल कमी आल्यास ग्राहक ते नियमित भरतील व वीज कंपनीवरील बोजा कमी होईल, अशी अपेक्षा वीज कंपनीला आह़े

शासनाची मान्यताप्राप्त कंपनी

सदर योजनेचे काम स्वीकारलेल्या ईईएसएल कंपनीला केंद्र शासनाची मान्यता आह़े त्यामुळे ही मान्यताप्राप्त कंपनी वीज कंपनीला एलईडी बल्बही पुरविणार आह़े त्याचप्रमाणे वीज कंपनीच्या प्रत्येक कार्यालयात, तसेच खासगी जागा घेऊनही कंपनीकडून नागरिकांसाठी वीज बिल भरणा केंद्र सुरू केले जातील़ यात एलईडी बल्बची विक्रीदेखील होणार आह़े लोकसंख्येनुसार केंद्रांच्या संख्येबाबतचा निर्णय घेतला जाणार आह़े

15 दिवसात सुरुवात

ईईएसएल कंपनीकडून राज्यात ठिकठिकाणी राबविण्यात येत असलेल्या या योजनेत आतार्पयत 18 लाख एलईडी बल्ब लावण्यात आले आहेत़, तर देशातही विविध भागात कंपनीचे काम सुरू आह़े

 

राज्यातील सर्व वीज कंपन्यांशी करार झाला असून 1 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचे उद्घाटनही झाले आह़े आतार्पयत योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून 18 लाख एलईडी बल्ब विविध शहरांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आह़े धुळे शहरासाठीही करार झाला असून 15 दिवसात धुळ्यात काम सुरू केले जाणार आह़े राज्यात ठिकठिकाणी योजनेचे काम सुरू आह़े

-दीपक कोकाटे, प्रकल्प संचालक, ईईएसएल, मुंबई