शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

धरणगाव तालुक्यासाठी गिरणा धरणातून जानेवारी-एप्रिलमध्ये आवर्तन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 21:44 IST

धरणगाव तालुक्यात येत्या महिन्याभरात भीषण पाणीटंचाई भासणार असून, पूर्ण तालुक्याला टँकरने पाणी पुरवणे प्रशासनाला शक्य होणार नाही. यासाठी जानेवारी व एप्रिल महिन्यात आठ दिवसांसाठी गिरणा धरणातून दोन आवर्तन द्या, असा ठराव शुक्रवारी तालुका सरपंच मेळाव्यात करण्यात आला.

ठळक मुद्देधरणगाव येथे झालेल्या सरपंच मेळाव्यात ठरावभीषण पाणीटंचाईसह विविध विषयांवर चर्चा

धरणगाव, जि.जळगाव : तालुक्यात येत्या महिन्याभरात भीषण पाणीटंचाई भासणार असून, पूर्ण तालुक्याला टँकरने पाणी पुरवणे प्रशासनाला शक्य होणार नाही. यासाठी जानेवारी व एप्रिल महिन्यात आठ दिवसांसाठी गिरणा धरणातून दोन आवर्तन द्या, असा ठराव शुक्रवारी तालुका सरपंच मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पुरुनीत चौधरी होते.धरणगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांचा मेळावा १४ रोजी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाला. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सचिन पवार यांनी केले.या वेळी जिल्हाउपाध्यक्ष श्रीकांत महाजन, तालुका उपाध्यक्ष रमेश पाटील यांनी भविष्यातील पाणीटंचाई व त्यावरील उपाय म्हणून गिरणा धरणातून दोन आवर्तने दिल्यास तालुक्यातील ८० गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. यासाठी ग्राम पंचायती योग्य तो निधी जलसंपदा खात्याकडे भरणार असल्याचा ठराव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला. यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालक मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना तालुक्यातील सरपंचांनी साकडे घालावे, असे ठरविण्यात आले.या मेळाव्यात सतखेडा सरपंच कृषिभूषण शरद पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, भोणे सरपंच बालू पाटील यांनी ग्राम पंचायतीच्या अडचणी, समस्या यावर चर्चा केली. रोजगार हमी योजना प्रभावी अंमलबजावणी यावर पष्टाणे येथील सरपंच किशोर निकम यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन व आभार व्ही. डी. पाटील यांनी केले. यशस्वितेसाठी महिला तालुका अध्यक्षा सरला पाटील, शिवदास पाटील, कैलास पाटील, मंगल पाटील, रेखा कोळी, वैशाली पाटील पंढरीनाथ पाटील यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईDharangaonधरणगाव