शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भक्तीवीण शब्द ज्ञान... व्यर्थ अवघ ते जाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 16:39 IST

प्रत्येक जीवाची धावपळ ही सुख मिळविण्यासाठी आहे

आजच्या या विज्ञान युगात सर्वच बाबी विकत मिळू शकतात. सर्व धावपळ ही मिळविण्यासाठी आहे आणि या सर्व धावपळीतून काय मिळणार तर उत्तर मिळत नाही, नुसतीच सकाळपासून रात्री उशिरापर्यंत नुसतीच धावपळ. प्रत्येक जीवाची धावपळ ही सुख मिळविण्यासाठी आहे. सुखाची व्याख्या ही जीवापरत्वे कदाचित वेगवेगळी असेल. या महाराष्टÑातील थोर संतांंनी मात्र सुखाची किंवा सुखी होण्याची व्याख्या आगळीवेगळीच केली आहे. संत तुकारामांंना कोणीतरी विचारलं, ‘महाराज तुम्ही सुखी कधी असता’, त्यावर तुकोबांनी खालील अभंग सांगितला.आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल मुखी ।।याबाबत अशीही कथा आहे की, शिवाजी महाराजांंनी काही वित्त-धन वगैरे संत तुकोबांकडे पाठविले होते, त्यावेळीच हे उद्गार तुकोबांच्या मुखातून बाहेर आले.तुुमचे येरं वित्त धन। ते मज मृत्तीके समान ।।हिरे-मोती, धन, यांना मातीसमान समजणारे संत फक्त खरे संत असतात, हे तुकोबांनी स्वानुभवातुन सिद्ध केले. तत्वज्ञान हे नुसते जगाला सांगण्यासाठी नसतं तर स्वत: अनुभवातून तत्वे निर्माण केली जातात, अशीच तत्वे चिरकाल टिकतात. तुकोबांच्या या तत्वांनाच अभंग म्हणतात, आणि हे कधीही भंगत नाही. चिरकाल आहेत.वारकरी संतांनी भक्ती व्यतिरिक्त ज्ञानाला महत्व दिलेले नाही. संत नामदेव महाराज म्हणतात,भक्त विठोबांचे भोळे । त्यांचे पायी ज्ञान लोळे ।।१।।भक्तीविण शब्द ज्ञान । व्यर्थ अवघे ते जाण ।। २।।नाही ज्याचे चित्ती भक्ती । जळो तयाची व्युत्पत्ती ।। ३।।महाराष्टÑातील वारकरी परंपरेतील संतांचं आराध्य दैवत श्रीविठ्ठल. त्याच्या नामाशिवाय सुख नाही. मुखात श्री विठ्ठलाचे नाम हेच आमचे सुख । हे सर्व संतांनी सांगितले आहे.संत ज्ञानेश्वर महाराज हे योगी असून देखील ते म्हणतात. नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।नामावर आधारित वारकरी सांप्रदाय आहे आणि संतांंनी यावर विविध दाखले देवून सिद्ध केले आहे की, श्रीविठ्ठलाच्या नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही. संत तुकोबांनी तर स्पष्ट सांगितले आहे.अठरा पुराणांचे पोटी । नामाविण नाही गोठी ।।आणि नाम हेच साध्य व साधन आहे, तसेच सकळ, मंगल व निधी हे देखील श्री विठ्ठलाचे नाम आहे.सकळ मंगळ निधी । श्री विठ्ठलाचे नाम आधी ।।-संत ज्ञानेश्वरश्री विठ्ठलाचे नाम मुखात सतत येणे हेच सुख आहे आणि हेच वारकरी संतांचं विशेषत्व आहे.- डॉ.कैलास पाटील, पिंपळेसीम, ता.धरणगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव