शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री - गिरीश महाजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:00 IST

पक्षातून कोणी गेले तरी फरक नाही 

जळगाव : पक्षातून कोणी गेले फरक पडत नाही. अगदी मी गेलो तरी फरक पडणार नाही. हा पक्ष नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा आहे. पक्ष म्हणजे कुणाची खाजगी मालमत्ता नसून येथे घराणेशाहीही चालत नाही. मी म्हणून पक्ष असे आता कोणीही समजू नये, भविष्यात यश भाजपाचेच असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील,  असे प्रतिपादन  जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी पक्षाच्या  बैठकीत केले.भाजपाची महागनर आणि ग्रामीणची बैठक ब्राह्मण संघाच्या सभागृहात शनिवारी दुपारी झाली.   बैठकीस माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे,  आमदार चंदुलाल पटेल, आमदार स्मिता वाघ, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, जि.प. अध्यक्ष उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे , विभाग संघटनमंत्री किशोर काळकर , नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , माजी जिल्हाध्यक्ष सुनील बढे , उदय वाघ,  जि . प . उपाध्यक्ष  नंदकुमार महाजन, सभापती पोपट भोळे, माजी आमदार डॉ. बी. एस . पाटील, जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे - खेवलकर, डॉ शशिकांत वाणी आदी उपस्थित होते .  परिश्रमाचे यशपाच वर्षातील कामांमुळे पक्षाला अभूतपूर्वी विजय मिळाला असे सांगून खडसे पुढे म्हणाले, स्व. प्रमोद महाजन नेहमी भाषणात जळगावचा उल्लेख करत.  मिळालेल्या यशाचा आनंद आहे मात्र आश्चर्य वाटत नाही असे आपण त्यांना म्हणालो, हे यश आतापासून नाही तर १९८९ ते २०१९ या काळात सतत मिळत आले आहे.अनेक जण नमस्कार घाबरत करतातआज पक्षात अनेक नवीन चेहेरे दिसताय, ७० टक्के चेहेरे पहाता आपण त्यांना ओळखतही नाही. काही जण तर नमस्कारही घाबरत करतात. त्यांनाही पक्षाने स्विकारले. भाजपला निवडून आणायचे हेच सर्वांचे ध्येय आहे. ११ जागा जिंकायच्या आहेत.  या जिल्ह्यातील सर्व संस्था पक्षाच्या ताब्यात आहे मग विधानसभा नको का? असा प्रश्न करून कामाला लागा हवेत राहू नका, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक आमदार सुरेश भोळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुनील नेवे यांनी केले. ५० वर जागा कॉँग्रेस, राष्टÑवादील मिळणार नाहीआगामी निवडणुकीत कॉँग्रेस, राष्टÑवादीला ५० च्यावर जागा मिळणार नाहीत, हे आपण हिमतीने सांगतो. त्यामुळे या पक्षाचे कार्यकर्तेच काय नेतेही तेथे रहायला तयार नाहीत. या जिल्ह्यासाठी मी तीन महिन्यांचा पालकमंत्री आहे.  पूर्वी बरीच कामे झाली आहेत, विकास निधीही मिळाला आहे. त्या जोरावर जिल्ह्यातील अकराच्या अकरा जागा आपल्याला जिंंकायच्या आहेत. आता रडायचे नाही लढायचे आहे. ए.टी. पाटील गेले फरक पडला नाहीमहाजन पुढे म्हणाले, माझा पक्ष या सिद्धांतावर अनेकांनी पूर्वी काम केले म्हणून हा पक्ष वाढला. ए.टी. पाटील यांच्या सारख्यांना पक्षाने दोन वेळा खासदारकीची संधी गेली.   जात-पात सारी बंधणे तोडून जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि ३०३ जागांवर यश दिले. केंद्रात मोदी तसे राज्यात देवेंद्र फडणवीस जनतेला पाहीजे आहेत,  बहुतांश मनपा निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळाले. आज सगळीकडे बोलबाला आपलाच आहे. भाजपला हरविणे हाच सर्वांचा अजेंडालोकसभा निवडणुकीत यश मिळाले तेच विधानसभेत असेल या भ्रमात राहू नका निवडणुकांनुसार समिकरणे बदलतात, यासह भाजपला हरविणे हाच विरोधी व मित्र पक्षांचाही अजेंडा असेल त्यामुळे सजग राहून कामे करा असे सल्ला यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :Jalgaonजळगाव