शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री - गिरीश महाजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 12:00 IST

पक्षातून कोणी गेले तरी फरक नाही 

जळगाव : पक्षातून कोणी गेले फरक पडत नाही. अगदी मी गेलो तरी फरक पडणार नाही. हा पक्ष नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा आहे. पक्ष म्हणजे कुणाची खाजगी मालमत्ता नसून येथे घराणेशाहीही चालत नाही. मी म्हणून पक्ष असे आता कोणीही समजू नये, भविष्यात यश भाजपाचेच असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील,  असे प्रतिपादन  जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी पक्षाच्या  बैठकीत केले.भाजपाची महागनर आणि ग्रामीणची बैठक ब्राह्मण संघाच्या सभागृहात शनिवारी दुपारी झाली.   बैठकीस माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे,  आमदार चंदुलाल पटेल, आमदार स्मिता वाघ, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, जि.प. अध्यक्ष उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे , विभाग संघटनमंत्री किशोर काळकर , नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , माजी जिल्हाध्यक्ष सुनील बढे , उदय वाघ,  जि . प . उपाध्यक्ष  नंदकुमार महाजन, सभापती पोपट भोळे, माजी आमदार डॉ. बी. एस . पाटील, जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे - खेवलकर, डॉ शशिकांत वाणी आदी उपस्थित होते .  परिश्रमाचे यशपाच वर्षातील कामांमुळे पक्षाला अभूतपूर्वी विजय मिळाला असे सांगून खडसे पुढे म्हणाले, स्व. प्रमोद महाजन नेहमी भाषणात जळगावचा उल्लेख करत.  मिळालेल्या यशाचा आनंद आहे मात्र आश्चर्य वाटत नाही असे आपण त्यांना म्हणालो, हे यश आतापासून नाही तर १९८९ ते २०१९ या काळात सतत मिळत आले आहे.अनेक जण नमस्कार घाबरत करतातआज पक्षात अनेक नवीन चेहेरे दिसताय, ७० टक्के चेहेरे पहाता आपण त्यांना ओळखतही नाही. काही जण तर नमस्कारही घाबरत करतात. त्यांनाही पक्षाने स्विकारले. भाजपला निवडून आणायचे हेच सर्वांचे ध्येय आहे. ११ जागा जिंकायच्या आहेत.  या जिल्ह्यातील सर्व संस्था पक्षाच्या ताब्यात आहे मग विधानसभा नको का? असा प्रश्न करून कामाला लागा हवेत राहू नका, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक आमदार सुरेश भोळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुनील नेवे यांनी केले. ५० वर जागा कॉँग्रेस, राष्टÑवादील मिळणार नाहीआगामी निवडणुकीत कॉँग्रेस, राष्टÑवादीला ५० च्यावर जागा मिळणार नाहीत, हे आपण हिमतीने सांगतो. त्यामुळे या पक्षाचे कार्यकर्तेच काय नेतेही तेथे रहायला तयार नाहीत. या जिल्ह्यासाठी मी तीन महिन्यांचा पालकमंत्री आहे.  पूर्वी बरीच कामे झाली आहेत, विकास निधीही मिळाला आहे. त्या जोरावर जिल्ह्यातील अकराच्या अकरा जागा आपल्याला जिंंकायच्या आहेत. आता रडायचे नाही लढायचे आहे. ए.टी. पाटील गेले फरक पडला नाहीमहाजन पुढे म्हणाले, माझा पक्ष या सिद्धांतावर अनेकांनी पूर्वी काम केले म्हणून हा पक्ष वाढला. ए.टी. पाटील यांच्या सारख्यांना पक्षाने दोन वेळा खासदारकीची संधी गेली.   जात-पात सारी बंधणे तोडून जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि ३०३ जागांवर यश दिले. केंद्रात मोदी तसे राज्यात देवेंद्र फडणवीस जनतेला पाहीजे आहेत,  बहुतांश मनपा निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळाले. आज सगळीकडे बोलबाला आपलाच आहे. भाजपला हरविणे हाच सर्वांचा अजेंडालोकसभा निवडणुकीत यश मिळाले तेच विधानसभेत असेल या भ्रमात राहू नका निवडणुकांनुसार समिकरणे बदलतात, यासह भाजपला हरविणे हाच विरोधी व मित्र पक्षांचाही अजेंडा असेल त्यामुळे सजग राहून कामे करा असे सल्ला यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :Jalgaonजळगाव