शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

शिक्षणाच्या माध्यमातूनच विकास शक्य

By admin | Updated: June 20, 2017 12:23 IST

मनीषा खत्री- शर्मा यांची ‘लोकमत’भेटीत माहिती : लोकसहभागातून परिसर स्वच्छ होऊ शकतो

ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.20 : ग्रामीण भागात साक्षरतेचे प्रमाण वाढले पाहिजे. हे प्रमाण कमी असल्याने  दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी साक्षरता तसेच डिजिटल साक्षरता वाढल्यास अनेक अडचणी व समस्या दूर होतील. विकासाला चालना मिळेल, असा विश्वास सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पाचोरा विभागाच्या प्रांताधिकारी मनीषा खत्री-शर्मा यांनी ‘लोकमत’ शी साधलेल्या संवादाप्रसंगी व्यक्त केला.
सोमवारी ‘लोकमत’ कार्यालयास  त्यांनी सदिच्छा भेट दिली. प्रारंभी निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.  यावेळी त्यांच्याशी झालेला संवाद असा..
प्रश्न : कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे कसे वळलात?
मनीषा खत्री-शर्मा - मी मूळची हरियाणा राज्यातील. कुटुंबातील सदस्य शेती  व व्यवसायात आहेत. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर प्रथम काही महिने मुंबईत खाजगी क्षेत्रात नोकरी केली. 
मात्र तेथे मन रमले नाही. जनतेची सेवा करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी केली व आयएएस म्हणून माझी निवड झाली. महाराष्ट्रात काम करायची संधी मिळाली.
प्रश्न -  खाजगी क्षेत्रात आव्हान आहे की शासकीय सेवेतील कामकाजात?
 मनीषा खत्री - शासकीय सेवेत निश्चितच आव्हान असते.  जिल्हाधिकारी पदाच्या जबाबदारीत सर्व प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. दररोज नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत असते. 
प्रश्न - ग्रामीण भागातील आव्हाने काय आहेत?
मनीषा खत्री - ग्रामीण भागात खरे आव्हान म्हणजे तेथील जनतेचे शिक्षण. शिक्षण फारसे नसल्याने नागरिकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असते. तेथे बदल करायचे असतील तर ते शिक्षणाच्या माध्यमातनूच शक्य आहे. शिक्षण  असे असावे की ते पदवीर्पयत मर्यादित नाही तर त्यातून व्यावहारिकता शिकविली जावी. 
प्रश्न - महाराष्ट्राविषयी आपले अनुभव व मत काय?
मनीषा खत्री - अन्य राज्याच्या तुलनेत  महाराष्ट्रात अधिक सुरक्षितता आहे. महिलांच्या बाबतीत ती अधिक आहे.  विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग त्यामुळेच जास्त आहे. हरियाणा, दिल्ली येथे फारशी सुरक्षिततेचे भावना महिलांमध्ये नाही. 
प्रशासकीय सेवेत महाराष्ट्राचा टक्का वाढतोय
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गेल्या काही वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्राचा टक्का वाढत आहे.  हरियाणा, राजस्थानमध्ये हे प्रमाण जास्त आहे. दिल्लीच्या जवळ ही राज्ये असल्याने सहाजिकच दिल्ली येथे विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीसाठी जात असतात. मात्र महाराष्ट्रात पुणे येथेही विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करीत असतात व यशस्वी होत आहे. 
जिल्ह्यात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर
जळगाव जिल्ह्यात सर्वात गंभीर परिस्थिती असेल तर ती स्वच्छतेबाबत. जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये तर अतिशय अस्वच्छता आहे.  नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. भुसावळ तर देशात दुस:या क्रमांकाचे अस्वच्छ शहर आहे.  सर्वच शासन करणार हे योग्य नाही. नागरिकांनी ठरविले तरच स्वच्छ भारत मिशन यशस्वी होईल. शौचालयांचा वापर केला तर आपले आरोग्य हे निरोगी राहील हे जनतेला पटवून देण्याची आज गरज आहे. 
डिजिटल जागृती होतेय
मनीषा खत्री म्हणाल्या, ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून अनेक बदल होत आहेत. यातूनच दलाली करणा:यांनाही चाप बसणार आहे. गावात सेतू केंद्र आहेत. तेथे जाऊन नागरिक आपली कामे करून घेऊ शकतात. डिजिटल जागृती हळू हळू वाढत आहे. आज सात-बारा संगणकीकरणासारखी कामे काही भागात शंभर टक्के झाली आहेत.