शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

विकास हाच श्वास आणि ध्यास असलेला नेता : खासदार उन्मेष पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST

यासोबतच वनजीबाबा मंडळातर्फे अध्यापक विद्यालय, सौ. शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निक आदींद्वारे त्यांनी तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली. एम.एस्सी. (पर्यावरणशास्त्र) एम.एड. केलेल्या ...

यासोबतच वनजीबाबा मंडळातर्फे अध्यापक विद्यालय, सौ. शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निक आदींद्वारे त्यांनी तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली.

एम.एस्सी. (पर्यावरणशास्त्र) एम.एड. केलेल्या संपदा यांनी २००५ मध्ये उन्मेष यांच्या आयुष्यात पत्नीच्या रूपात प्रवेश केला. सृष्टी, स्वामी आणि समर्थ या अपत्यांनी त्यांच्या घराचे गोकूळ केलेय. शिक्षणावर नितांत प्रेम करणाऱ्या उन्मेष यांचा शेती हा ‘श्वास’ आणि शेतकऱ्यांची समृध्दी ‘ध्यास’ होता. त्यातूनच त्यांनी पाच हजार एकरावर ‘करार शेती ’चा यशस्वी प्रयोग करून शेतकऱ्यांना विकासाचा मार्ग दाखविला. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला ‘बेलगंगा’ साखर कारखाना विक्री न करता भाडेतत्वावर सुरू व्हावा यासाठी त्यांनी पदयात्रा, जनजागृती अभियान आदी

माध्यमातून तालुक्यात मोठे आंदोलन उभारले. शेतकरी आणि युवकांचा थेट जिल्हा बँकेवर मोर्चा काढून संचालकांसमोर शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. उन्मेष पाटील यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून तालुकाभर असंख्य उपक्रमांचा जणू धडाका लावला.

तालुक्यातील युवक चळवळीचे नेतृत्व करणारा हा उमदा तरुण भारतीय जनता पक्षाचा सक्रिय सदस्य, पदाधिकारी झाला. आणि त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरत गुणवत्तेच्या बळावर पक्षाने त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. आणि पक्षाच्या विश्वासाला पात्र ठरत २२ हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत त्यांनी विजय संपादन केला.

लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी तालुक्याला जागतिक दर्जाची गणित नगरी मंजूर करण्यासोबतच पर्यटन विकासाकडेही लक्ष दिले. १ हजार कोटींहून अधिकचे उद्योग चाळीसगाव औद्योगिक वसाहतीमध्ये आणून रोजगार निर्माण केला. शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात सर्वाधिक निधी आणि अनुदान आणले. आपल्या शिक्षणाचा व कौशल्याचा वापर करत शासकीय योजना तळागाळात पोहचवण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ व ‘ समाधान शिबिर’ असे अभिनव उपक्रम राबविले. या उपक्रमांचे कौतुक मुख्यमंत्र्यांसह राज्यभरात केले गेले. आज चाळीसगाव तालुक्यात एकही रस्ता असा नसेल ज्यासाठी त्यांनी निधी आणून काम सुरू केले नसेल. शहरासाठी अंतर्गत ७१ कोटींची पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार (पहिला टप्पा) ६८ कोटी, नदी सुशोभिकरण, एलईडी पथदिवे आदी कोट्यवधींची कामे मंजूर करून आणली. विधानसभेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी जळगाव जिल्ह्यासह खानदेशातील सिंचन, पाणी, रस्ते आदी विषयांवर आवाज उठवला.

२०१९ लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होण्यासाठी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचे होते. पक्ष कोणत्याही स्थितीत जोखीम घेण्यास तयार नसल्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातून आमदार उन्मेष पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली. अवघे २० दिवस इतक्या कमी वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा कामाला लावत राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या ४ लाख ११ हजार मताधिक्याने त्यांनी विजय मिळविला. अनेक विषयांच्या पाठपुराव्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले. संसदेच्या अधिवेशनात सात्यत्याने विविध विषयावरील चर्चेत सहभागी झाले. याचा परिणाम असा झाला की देशातील टॉप २५

खासदारांमध्ये येण्याचा मान खासदार उन्मेष पाटील यांना मिळाला. सतत जनतेशी संवाद आणि संपर्क ठेवून असल्यामुळे गेल्या वर्षात अधिकतर वेळ कोरोना रुग्णांच्या सेवा सुविधेसाठी व्यतीत होत असताना संपर्काची गल्ली ते दिल्ली नाळ अतूट ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहील.

शब्दांकन : सुनील रणदिवे पाटील,

खासदार, जनसंपर्क कार्यालय प्रमुख, चाळीसगाव