शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘सबका साथ अन् खुदका विकास...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:48 IST

तोंडसुख : सर्वसामान्यांचा नशिबी खड्डेच ?

जळगाव : शहरातील नागरिक गेल्या काही वर्षांपासून खड्डयांमुळे त्रस्त झाले आहेत. सर्वच जळगावकर खड्डयांनी त्रस्त असताना शहरातील लोकप्रतिनिधींचा घराच्या परिसरातील रस्ते मात्र गुळगुळीत असल्याचे ‘लोकमत’ च्या पाहणीत आढळून आले होते. ‘लोकमत’ ने शुक्रवारच्या अंकात हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांवर नागरिकांकडून चांगलेच तोंडसुख घेतले जात आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या वाक्याचा वापर करून सत्तेत आलेल्यांनी ‘सबका साथ अन् खुदका विकास’ केल्याचे मत सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केले.

आमचं जळगाव ये फेसबूक पेजने देखील ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिअ‍ॅलिटी चेक’बाबत नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावर देखील जळगावकरांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील रस्ते म्हणजे इस्त्राईलच्या मधुमेहाच्या औषधांसारखे असल्याचे एका नेटीजन्स सांगितले. तर मिलिंद देशपांडे या नेटीजन्सने जळगावचे दुदैवाचे फेरे कधी संपणार ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.आमच्या घरातील रस्ता पाहताना परदेशात गेल्यासारख वाटतमाजी नगरसेवक नितीन पाटील यांनी आपल्या फेसबूक पेजवर त्यांच्या भागातील रस्त्याचा फोटो टाकून, हा रस्ता पाहिल्यानंतर परदेशात गेल्यासारख वाटत असे उपहासात्मक लिहले आहे. शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी ही ‘सबका साथ अन् खुदका विकास’ या शब्दात सत्ताधाºयांवर टीका केली आहे. त्यांच्यासह अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रृपवर देखील सत्ताधाºयांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. जनतेचा विचार न करणारे हे केवळ पुढारी होवू शकतात ते लोकांचे प्रतिनिधी होवूच शकत नाही अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव