शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांमधील गटबाजीमुळेच शहराच्या विकासाला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST

जळगाव - शहरातील विकासाचे ग्रहण सुटता-सुटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात भाजपची सत्ता असल्याने जळगावकरांनी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला बहुमत ...

जळगाव - शहरातील विकासाचे ग्रहण सुटता-सुटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात भाजपची सत्ता असल्याने जळगावकरांनी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला बहुमत देत सत्ता दिली. राज्यातील सत्तेचा फायदा घेऊन मनपातील सत्ताधारी जळगाव शहराच्या थांबलेल्या विकासाला गती देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अडीच वर्षांतच ती अपेक्षा फोल ठरली. आता राज्यात सेनेची, तर मनपातही सेनेची सत्ता आहे. मात्र, मनपातील सत्ताधाऱ्यांमधील असलेल्या गटबाजीमुळे या सत्तेचा फायदा शहराच्या विकासासाठी करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश येत असल्याचेच पाहायला मिळत आहे.

महापालिकेत भाजपला अडीच वर्षांत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता आल्याने व अंतर्गत बंडाळीने खिळखिळी झालेली भाजपची सत्ता अवघ्या अडीच वर्षांत गेली. भाजप बंडखोरांच्या जोरावर सत्तेत आलेल्या शिवसेनेकडूनदेखील जळगावकरांना अपेक्षा होत्या. राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे शहराच्या विकासाचा बॅकलॉक भरून निघेल अशी अपेक्षा होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांचा कार्यकाळातच शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी व आपापसातील ‘इगो’च्या समस्येमुळे शहराचा विकासाला ‘ब्रेक’ लावण्याची एकप्रकारे चढाओढ सेनेतच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

१०० कोटींसाठी पाठपुराव्याचा अभाव

शहरातील रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने स्थगिती दिलेल्या १०० कोटी रुपयांवरील स्थगिती उठविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून ही स्थगिती आणण्यात आली आहे. नगरविकास मंत्रालय हे सेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. महापालिकेतील सत्तांतरांमध्ये एकनाथ शिंदे यांचीच महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, असे असतानाही १०० कोटींच्या निधीवरील स्थगिती उठविली जात नाही. दुसरीकडे मनपातील सत्तांतरात विश्वासात घेतले नसल्याने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारीदेखील महापालिकेतील कामांबाबत फारसे आग्रही दिसून येत नसल्याने १०० कोटींच्या निधीसाठी फारसा पाठपुरावा होताना दिसून येत नाही.

जे भाजपत झाले तेच शिवसेनेत होतेय?

भाजपने मनपा निवडणुकीच्या तोंडावर काही इतर पक्षांतील नगरसेवकांना फोडून आपल्या पक्षात घेतले. मनपात तब्बल ५७ जागा घेऊन भाजपने सत्ता आणली. मात्र, ५७ नगरसेवकांच्या बहुमतात अनेक गट-तट पडल्याने अडीच वर्षांत भाजपला विकासकामांचे नियोजन करता आले नाही. त्यात अडीच वर्षांतच बंडखोरीमुळे सत्ता गमवावी लागली. आता शिवसेनेकडे मनपातील बहुमत आले आहे. मात्र, जी भाजपची स्थिती होती तीच स्थिती आज शिवसेनेची झाली असून, अनेक गट-तट झाले आहेत. यासह अनेक नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये विस्तवदेखील जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकाने दिलेले काम दुसऱ्याकडून थांबविले जात आहे. यामुळेच शहराच्या विकासाचा थांबलेला गाडा अधिक फसत जात असल्याचेच पाहायला मिळत आहे.