शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या गप्पा आणि आकड्यांचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:55 IST

कोट्यवधीची कामे मंजूर झाली तर ती दिसत का नाही? सत्ताधारी मंडळींना जनतेला द्यावा लागेल विश्वास हतबल, गलीतगात्र झालेल्या विरोधी पक्षाला पोलखोल करण्याचादेखील उत्साह नाही

मिलिंद कुलकर्णीभाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील एक ठोस काम दाखवा, असे आव्हान खरे तर विरोधी पक्षाने द्यायला हवे. प्रशासकीय मान्यता, सविस्तर प्रकल्प अहवाल, केंद्र, राज्य सरकारच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर, निविदा प्रक्रिया सुरु, कार्यादेशाच्या टप्प्यावर, कमी दराने निविदा घेतल्याने कंत्राटदाराचा वेळकाढूपणा अशा सबबी सत्ताधारी मंडळी सांगत असताना विरोधी पक्षांनी ते ठळकपणे मांडायला हवे. परंतु,पराभवाने ही मंडळी हतबल, गलीतगात्र झाली आहे.हरितक्रांतीचे प्रणेते, विकास पुरुष, संकटमोचक अशी बिरुदे मिरविणारे भाजपाचे नेते आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. केंद्रीय व राज्य अर्थसंकल्प सादर झाल्याने जनतेच्या हिताच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार धूमधडाक्यात सुरु झाला आहे. कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचा दावा करीत विकास गंगा अवतरल्याचा भास निर्माण केला जात असला तरी वास्तव वेगळे असल्याची जाणीव सामान्य जनतेला आहे. दुर्देव असे आहे की, विरोधी पक्ष प्रबळ नाही. सत्ताधारी मंडळींच्या ‘उक्ती आणि कृती’मधील भेद अधोरेखित करण्याची चांगली संधी विरोधकांना चालून आलेली असताना हतबल झालेले विरोधी पक्षाचे नेते मूग गिळून गप्प आहेत. केवळ निवडणुकांपुरती जनसामान्यांची आठवण काढायची आणि पाच वर्षे आपल्या संस्था, हित सांभाळायचे असे केले तर जनता कसा विश्वास ठेवणार विरोधी पक्षांवर याचाही विचार करायला हवा. स्थानिक पातळीवर तडजोडी करायच्या आणि राष्टÑीय पातळीवर विरोध दर्शवायचा, याला काही अर्थ नाही. अलिकडे राष्टÑीय पातळीवरुन येणाऱ्या कार्यक्रमांना, आंदोलनाला गर्दी कमी होऊ लागली आहे, हे कशाचे निदर्शक आहे? लोकशाहीमध्ये सशक्त विरोधी पक्षाची आवश्यकता असते. अन्यथा सत्ताधारी मंडळी बेफाम होतील, अमर्याद अधिकारांचा दुरुपयोग करतील. परंतु, एक-दोन पराभवाने गलीतगात्र झालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची मानसिकता पराभूताची आहे, हीच मोठी समस्या आहे. जनतेला चांगला पर्याय मिळाला तर ते निश्चित तो निवडल्याशिवाय राहत नाही, हे इतिहासात डोकावले तरी लक्षात येईल.२०१४ मध्ये एकनाथराव खडसे जी भूमिका भाजपमध्ये निभावत होते, तीच आता गिरीश महाजन वठवत आहेत. उत्तर महाराष्टÑाच्या दृष्टीने त्यांचे नियोजन सुरु झालेले आहे. नवापूरच्या जागेसाठी भरत माणिकराव गावीत यांच्यारुपाने काँग्रेसमधील तुल्यबळ नेता भाजपला गवसला आहे. सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र शिरीष आणि भरत या दोन वारसदारांमध्ये तेथे लढतीची शक्यता आहे. २००९ मध्ये डॉ.विजयकुमार गावीत यांचे बंधू शरद गावीत यांनी सुरुपसिंग नाईक यांचा पराभव करुन धक्का दिला होता.जळगावात सुरेशदादा जैन हे निवडणूक लढणार असल्याचे जाहीर झाल्याने भाजप-शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे. आमदार सुरेश भोळे यांना पत्रकार परिषदा घेऊन विकासाचा पाढा वाचावा लागत आहे, हा घोषणेचा परिणाम म्हणावा लागेल.खडसे यांचे विधानसभेतील निरोपाचे भाषण आणि रावेरमध्ये तिकिटाविषयी व्यक्त केलेली शंका ही भाजपमधील अंतर्गत खळबळ दर्शविणारी आहे. श्रेष्ठी दुर्लक्ष करीत असल्याने खडसे अधिक आक्रमक होत आहेत.लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यशाने भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांमध्ये अमाप उत्साह संचारला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीची दोन महिने कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या मंजुरी, भूमिपूजन सोहळे यांचा झगमगाट राहणार आहे. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांत आलेला नाही, एवढा निधी मतदारसंघात आला आहे, असा दावा आतापासून आमदार करु लागले आहेत. राष्टÑीय महामार्गासाठी १६०० कोटी रुपयांच्या कामांचे झालेले भूमिपूजन असो की, जळगावसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटींचे नियोजनाचा अनुभव जनतेसमोर असताना या घोषणांविषयी विश्वास वाटायला हवा.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव