शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

देवा तुचि गणेशु...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:35 IST

आज गणेश चतुर्थी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी). प्रत्येकवर्षी हा उत्सव साधारणत: १०-११ दिवस साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ...

आज गणेश चतुर्थी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी). प्रत्येकवर्षी हा उत्सव साधारणत: १०-११ दिवस साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या उत्सवाची सांगता असते, अशी मान्यता आहे की, भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. भगवान गणेश म्हणजे ज्ञान, समृद्धी व उत्तम दैव यांचे प्रतिक आहे. आज श्री गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते, त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. आरती झाल्यावर मोदकांचा प्रसाद दिला जातो. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून साजरा केला जातो.वैदीक परंपरेनुसार किंवा अध्यात्म शास्त्रांच्या मान्यतेनुसार प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्व आहे. या तत्वानुसार श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. महाराष्टÑातील सर्व संतानी श्री गणेशाचे वर्णन केलेले आहे. ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकाचा मायबाप, कैवल्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी श्री गणेशाचे वर्णन केले आहे.देवा तुंचि गणेशु । सकलार्थमति प्रकाशु ।।म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजो जी । ज्ञानेश्वरी।।श्री निवृत्तीदासांचे दास, श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे आत्मरूपा परमेश्वर ! माझ्या बोलण्याकडे लक्ष दे ! वैदीक वाङमयातील संपूर्ण अर्थाच्या ज्ञानाचा प्रकाश किंवा स्फुरण स्वरूप असा जो गणेश तो तुच आहेस. वैदीक वाङमयात ज्ञानदात्री देवता गणेश समजली जाते. सर्व देवतांच्या ठिकाणी जो काही शक्तीचा उद्बोध दिसून येतो, तो सर्व माझ्याच शक्तीचा उद्बोध आहे असे भगवतांनीच गीतेत सांगितले आहे.वैदिक परंपरेत भगवान गणेशांचे विशेष स्थान आहे. कोणत्याही प्रकारची पूजा, हवन किंवा मंगलकार्याची सुरूवात गणेशाची स्तुतीशिवाय अपूर्ण असते.गणेश वंदनाशिवाय कोणत्याही कार्याला सुरूवात होत नाही. हा उत्सव पूर्ण भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगात भारतीय साजरा करतात. त्यातल्या त्यात महाराष्टÑ व मध्यप्रदेशात याची मजा काही औरच असते. या उत्सवाचे फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्व नाही तर राष्टÑीय एकामत्मतेचे प्रतीक आहे. या उत्सवाची सुरूवात आजपासून सुरू झालेली आहे. या उत्सवाचा सांस्कृतिक व राष्टÑीय एकात्मतेसाठीच उगम झालेला आहे आणि त्याचं पावित्र टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावयास पाहिजे. श्री गणेशाची पूजा किंवा उत्सव साजरा करणे ही साधना आहे. याचा विसर होऊ नये आणि श्री गणेशांनी आम्हाला यासाठी शक्ती द्यावी ही प्रार्थना..!-डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम, ता.धरणगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव