शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

२०० कुटुंबांच्या जीवनात आणणार परिवर्तन आणण्याचा अभाविप पूर्व कार्यकर्ता बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 14:36 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साधला संवाद

ठळक मुद्देअभाविपचे राष्टÑीय संघटनमंत्री सुनील अंबेकर यांनी केले मार्गदर्शनप्रश्नोत्तरांच्या स्वरूपात पूर्व कार्यकर्त्यांशी साधला संवाद संघाची शाखा जीवन नीट ठेवणारे यंत्र

जळगाव: जिल्ह्यातील अभाविपच्या व संघ परिवारातील कार्यकर्त्यांची १०० जणांची यादी करून त्यांनी प्रत्येकी दोन याप्रमाणे जिल्ह्यातील २०० सामान्य कुटुंबांच्या विकासावर, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीवर लक्ष केंद्रीत करावे. पुढील वर्षी याचा आढावा घ्यावा. या २०० कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन आणावे, असा निर्धार अभाविपचे पूर्व कार्यकर्ता व विद्यमान महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ मैदानावर मंगळवार, २६ रोजी आयोजित अभाविपच्या पूर्व कार्यकर्ता बैठकीत घेण्यात आला.शिवतीर्थ मैदानावर अभाविपच्या सुरू असलेल्या ५२व्या प्रदेश अधिवेशनाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी ११ वाजता भेट दिली. यावेळी त्यांनी पूर्व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पूर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अभाविपचे राष्टÑीय संघटनमंत्री सुनील अंबेकर,  राष्टÑीय सहसंघटनमंत्री जी. लक्ष्मण, क्षेत्रीयसह कार्यवाह बाळासाहेब चौधरी, सहकार भारतीचे दिलीप रामू पाटील, संमेलनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष अशोक जैन, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, अभाविपचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.मनिष जोशी, महानगरप्रमुख प्रा.भूषण राजपूत, महानगरमंत्री विराज भामरे, सचिन बोरसे उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात पूर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात संघ परिवारातील वेगवेगळ्या संघटनांमधील विविध क्षेत्रात काम करणाºया कार्यकर्त्यांची संख्या किती? अशी विचारणा केली. त्यावर अंदाजे १० हजार पर्यंत ही संख्या असल्याचे समजल्यावर या लोकांची छाननी करून त्यातून सुरूवातीला केवळ १०० जणांची नावे निवडावीत. त्या १०० लोकांनी जिल्ह्यातील प्रत्येकी दोन सामान्य, गरीब कुटुंबांची निवड करून त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना मांडली. ती सर्वांनी एकमताने मंजूर केली. या कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच शैक्षणिक, सामाजिक उन्नतीसाठी वेळोवेळी मदत, मार्गदर्शन करून या कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा निर्धार करण्यात आला. पुढील वर्षी याचा आढावा घ्यावा, असे ठरले.संघाची शाखा जीवन नीट ठेवणारे यंत्रपालकमंत्री पाटील यांनी उपस्थितांपैकी किती जर नियमित संघाच्या शाखेत जातात? किमान आठवड्याला किती जातात? किंवा स्वत:चे सामाजिक कार्य करतात? अशी विचारणा केली. त्यावर आलेला अल्प प्रतिसाद पाहता त्यांनी सांगितले की, अभाविपने आपल्याला घडविण्यावर आर्थिक नसला तरी वेळ व श्रम खर्च केले आहेत. परिषदेतून बाहेर पडल्यावर त्याचा उपयोग समाजासाठी व्हायला हवा. आणि आगामी काळात जे यंत्र आपल्याला नीट ठेवेल ते यंत्र म्हणजे संघाचीशाखाअसल्याचेसांगितले.