शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

२०० कुटुंबांच्या जीवनात आणणार परिवर्तन आणण्याचा अभाविप पूर्व कार्यकर्ता बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 14:36 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साधला संवाद

ठळक मुद्देअभाविपचे राष्टÑीय संघटनमंत्री सुनील अंबेकर यांनी केले मार्गदर्शनप्रश्नोत्तरांच्या स्वरूपात पूर्व कार्यकर्त्यांशी साधला संवाद संघाची शाखा जीवन नीट ठेवणारे यंत्र

जळगाव: जिल्ह्यातील अभाविपच्या व संघ परिवारातील कार्यकर्त्यांची १०० जणांची यादी करून त्यांनी प्रत्येकी दोन याप्रमाणे जिल्ह्यातील २०० सामान्य कुटुंबांच्या विकासावर, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीवर लक्ष केंद्रीत करावे. पुढील वर्षी याचा आढावा घ्यावा. या २०० कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन आणावे, असा निर्धार अभाविपचे पूर्व कार्यकर्ता व विद्यमान महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ मैदानावर मंगळवार, २६ रोजी आयोजित अभाविपच्या पूर्व कार्यकर्ता बैठकीत घेण्यात आला.शिवतीर्थ मैदानावर अभाविपच्या सुरू असलेल्या ५२व्या प्रदेश अधिवेशनाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी ११ वाजता भेट दिली. यावेळी त्यांनी पूर्व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पूर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अभाविपचे राष्टÑीय संघटनमंत्री सुनील अंबेकर,  राष्टÑीय सहसंघटनमंत्री जी. लक्ष्मण, क्षेत्रीयसह कार्यवाह बाळासाहेब चौधरी, सहकार भारतीचे दिलीप रामू पाटील, संमेलनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष अशोक जैन, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, अभाविपचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.मनिष जोशी, महानगरप्रमुख प्रा.भूषण राजपूत, महानगरमंत्री विराज भामरे, सचिन बोरसे उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात पूर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात संघ परिवारातील वेगवेगळ्या संघटनांमधील विविध क्षेत्रात काम करणाºया कार्यकर्त्यांची संख्या किती? अशी विचारणा केली. त्यावर अंदाजे १० हजार पर्यंत ही संख्या असल्याचे समजल्यावर या लोकांची छाननी करून त्यातून सुरूवातीला केवळ १०० जणांची नावे निवडावीत. त्या १०० लोकांनी जिल्ह्यातील प्रत्येकी दोन सामान्य, गरीब कुटुंबांची निवड करून त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना मांडली. ती सर्वांनी एकमताने मंजूर केली. या कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच शैक्षणिक, सामाजिक उन्नतीसाठी वेळोवेळी मदत, मार्गदर्शन करून या कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा निर्धार करण्यात आला. पुढील वर्षी याचा आढावा घ्यावा, असे ठरले.संघाची शाखा जीवन नीट ठेवणारे यंत्रपालकमंत्री पाटील यांनी उपस्थितांपैकी किती जर नियमित संघाच्या शाखेत जातात? किमान आठवड्याला किती जातात? किंवा स्वत:चे सामाजिक कार्य करतात? अशी विचारणा केली. त्यावर आलेला अल्प प्रतिसाद पाहता त्यांनी सांगितले की, अभाविपने आपल्याला घडविण्यावर आर्थिक नसला तरी वेळ व श्रम खर्च केले आहेत. परिषदेतून बाहेर पडल्यावर त्याचा उपयोग समाजासाठी व्हायला हवा. आणि आगामी काळात जे यंत्र आपल्याला नीट ठेवेल ते यंत्र म्हणजे संघाचीशाखाअसल्याचेसांगितले.