शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आपली बलस्थाने ओळखून नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 17:38 IST

आपली बलस्थाने ओळखून नियोजन करा, असा सल्ला मुंबई येथील प्रा.डॉ.सुधाकर आगरकर यांनी दिला. शेठ ना.बं.वाचनालयात सुरू असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प शनिवारी प्रा.डॉ.आगरकर यांनी गुंफले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे प्रा.डॉ.सुधाकर आगरकर यांचे प्रतिपादनडॉ.आगरकर यांनी विविध क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आलेख ठेवला श्रोत्यांसमोरसरस्वती व्याख्यानमालेस प्रतिसाद

चाळीसगाव, जि.जळगाव : आपली बलस्थाने ओळखून नियोजन करा, असा सल्ला मुंबई येथील प्रा.डॉ.सुधाकर आगरकर यांनी दिला.शेठ ना.बं.वाचनालयात सुरू असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प शनिवारी प्रा.डॉ.आगरकर यांनी गुंफले. आधुनिक भारताची प्रगती या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. त्यांचे स्वागत वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रीतमदास रावलानी यांनी केले. परिचय संचालक राजेश ठोंबरे यांनी करून दिला.आपल्या व्याख्यानात डॉ.आगरकर यांनी विविध क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आलेख श्रोत्यांसमोर ठेवला. यासंदर्भात त्यांनी आपले विविध देशातील अनुभवदेखील श्रोत्यांना रंजक शैलीत सांगितले. भारत आज अण्वस्त्रधारी देश असून, अणुशक्तीचा वापर शांततेसाठी करण्याची कल्पना पं.नेहरूंनी मांडली. डॉ.होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. आज भारताने या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. आज देशात अनेक ठिकाणी रिअ‍ॅक्टर्स आहेत. अणुशक्तीसाठी लागणारे जड पाणी भारतातच तयार होते. भारत त्याची निर्यात करून परकीय चलन मिळवतो. आज अनेक उपग्रह भारताने अंतराळात स्थापित केले असून, त्यांच्याकडून विविध क्षेत्रात कार्य करून घेण्यात आपण यशस्वी झालो आहोत. एकाच वेळी अवकाशात १०८ उपग्रहांचे प्रक्षेपण भारताने केले आहे. आपलेच नव्हे तर इतर देशांचे उपग्रहदेखील आपण प्रक्षेपित केले आहेत. संगणकाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात भारतीय तज्ज्ञ जगात आघाडीवर आहेत. अन्नधान्याच्या बाबतीतसुद्धा भारत स्वयंपूर्ण बनला आहे. १९५० मध्ये भारतातील लोकसंख्येपैकी केवळ १७ टक्के लोक साक्षर होते. आज हे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोहचले आहे. भारतातील बुद्धिमान तरुणांनी कामानिमित्त विविध देशात जाऊन तेथे आपल्या देशाची प्रतिमा उंचावली आहे. परंतु ही सर्व प्रगती भारताची नसून इंडियाची आहे. खऱ्या भारतासमोर आज अजूनही बºयाच समस्या आहेत. भारतातील अनेक लोकांना आजही दोन वेळेचे पोटभर जेवण मिळत नाही. रिकाम्या हातांना काम नाही. गरिबी, शेतकºयांच्या आत्महत्या इ.समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. या समस्या दूर करायच्या असतील तर आपण आपली बलस्थाने ओळखून त्यानुसार पुढील नियोजन केले पाहिजे. तरच आपण प्रगती करू शकू. सिंगापूर, चीन, इस्रायल या देशांनी स्वत:ची बलस्थाने ओळखून त्याप्रमाणे आपली धोरणे ठरवली. म्हणून ते आज प्रगतीपथावर आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष शहा यांनी, तर प्रकाश कुलकर्णी यांनी आभार मानले. 

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव