शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

आपली बलस्थाने ओळखून नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 17:38 IST

आपली बलस्थाने ओळखून नियोजन करा, असा सल्ला मुंबई येथील प्रा.डॉ.सुधाकर आगरकर यांनी दिला. शेठ ना.बं.वाचनालयात सुरू असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प शनिवारी प्रा.डॉ.आगरकर यांनी गुंफले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे प्रा.डॉ.सुधाकर आगरकर यांचे प्रतिपादनडॉ.आगरकर यांनी विविध क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आलेख ठेवला श्रोत्यांसमोरसरस्वती व्याख्यानमालेस प्रतिसाद

चाळीसगाव, जि.जळगाव : आपली बलस्थाने ओळखून नियोजन करा, असा सल्ला मुंबई येथील प्रा.डॉ.सुधाकर आगरकर यांनी दिला.शेठ ना.बं.वाचनालयात सुरू असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प शनिवारी प्रा.डॉ.आगरकर यांनी गुंफले. आधुनिक भारताची प्रगती या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. त्यांचे स्वागत वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रीतमदास रावलानी यांनी केले. परिचय संचालक राजेश ठोंबरे यांनी करून दिला.आपल्या व्याख्यानात डॉ.आगरकर यांनी विविध क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आलेख श्रोत्यांसमोर ठेवला. यासंदर्भात त्यांनी आपले विविध देशातील अनुभवदेखील श्रोत्यांना रंजक शैलीत सांगितले. भारत आज अण्वस्त्रधारी देश असून, अणुशक्तीचा वापर शांततेसाठी करण्याची कल्पना पं.नेहरूंनी मांडली. डॉ.होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. आज भारताने या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. आज देशात अनेक ठिकाणी रिअ‍ॅक्टर्स आहेत. अणुशक्तीसाठी लागणारे जड पाणी भारतातच तयार होते. भारत त्याची निर्यात करून परकीय चलन मिळवतो. आज अनेक उपग्रह भारताने अंतराळात स्थापित केले असून, त्यांच्याकडून विविध क्षेत्रात कार्य करून घेण्यात आपण यशस्वी झालो आहोत. एकाच वेळी अवकाशात १०८ उपग्रहांचे प्रक्षेपण भारताने केले आहे. आपलेच नव्हे तर इतर देशांचे उपग्रहदेखील आपण प्रक्षेपित केले आहेत. संगणकाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात भारतीय तज्ज्ञ जगात आघाडीवर आहेत. अन्नधान्याच्या बाबतीतसुद्धा भारत स्वयंपूर्ण बनला आहे. १९५० मध्ये भारतातील लोकसंख्येपैकी केवळ १७ टक्के लोक साक्षर होते. आज हे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोहचले आहे. भारतातील बुद्धिमान तरुणांनी कामानिमित्त विविध देशात जाऊन तेथे आपल्या देशाची प्रतिमा उंचावली आहे. परंतु ही सर्व प्रगती भारताची नसून इंडियाची आहे. खऱ्या भारतासमोर आज अजूनही बºयाच समस्या आहेत. भारतातील अनेक लोकांना आजही दोन वेळेचे पोटभर जेवण मिळत नाही. रिकाम्या हातांना काम नाही. गरिबी, शेतकºयांच्या आत्महत्या इ.समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. या समस्या दूर करायच्या असतील तर आपण आपली बलस्थाने ओळखून त्यानुसार पुढील नियोजन केले पाहिजे. तरच आपण प्रगती करू शकू. सिंगापूर, चीन, इस्रायल या देशांनी स्वत:ची बलस्थाने ओळखून त्याप्रमाणे आपली धोरणे ठरवली. म्हणून ते आज प्रगतीपथावर आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष शहा यांनी, तर प्रकाश कुलकर्णी यांनी आभार मानले. 

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव