शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील ११५ गावांमधील ३८५२ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 22:48 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पंचनामे सुरू

ठळक मुद्दे८ तालुक्यांना बसला तडाखा रावेर, मुक्ताईनगरला सर्वाधिक नुकसान

जळगाव: जून महिन्याला प्रारंभ होताच मान्सूनपूर्व पाऊस व वादळाचातडाखा जिल्ह्यातील ८ तालुक्यांना बसला असून २,३, ५ व ६ जून या चारच दिवसांत जिल्ह्यातील ११५ गावांमधील ४७८९ शेतकºयांचे ३८५२ हेक्टरवरील पीक व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यात रावेर व मुक्ताईनगरला सर्वाधिक नुकसान झाले असून पंचनाम्यांना सुरूवात झाली आहे. दरम्यान ६ रोजी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील झालेल्या नुकसानीची आकडेवारी प्रशासनाकडे गुरूवार, ७ रोजी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेली नव्हती.जिल्ह्यात २ जून रोजी मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाºयांनी यावल, चोपडा, भडगाव, चाळीसगाव या भागात तडाखा बसला. त्यानंतर ३ जून रोजी चोपडा, पाचोरा तालुक्यांना, ५ जून रोजी रावेर, यावल तर ६ रोजी रावेर,मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांना वादळी वारा व पावसाचा जोरदार फटका बसला. याखेरीज भुसावळ,जळगाव व इतर तालुक्यांनाही फटका बसला. मात्र त्याची आकडेवारी प्रशासनाकडे सायंकाळपर्यंत प्राप्त झालेली नव्हती.रावेर, मुक्ताईनगरला सर्वाधिक नुकसानरावेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३२ गावांमधील २०४० शेतकºयांचे १९५२ हेक्टरवरील केळी पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्या पाठोपाठ मुक्ताईनगर तालुक्यात ३२ गावांमधील २१५२ शेतकºयांचे १५५६ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. यावल तालुक्यात १८ गावांमधील २२६ शेतकºयांच्या १५८.५० हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. बोदवड तालुक्यातील ७ गावांमधील ३० शेतकºयांचे २१.५ हेक्टर कागदी लिंबू व ४.५ हेक्टर वरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. चोपडा तालुक्यातील १० गावांमधील १४२ शेतकºयांचे ८६ हेक्टर केळीचे तर भडगाव तालुक्यातील ४ गावांमधील ३१ शेतकºयांचे २५ हेक्टर केळी व २ हेक्टर कागदी लिंबूचे, चाळीसगाव तालुक्यातील ६ गावांमधील १२३ शेतकºयांचे ४३.६२ हेक्टर केळी व १५.४४ हेक्टर लिंबू, १२ हेक्टर फळबागांचे असे ७१.०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर पाचोरा तालुक्यात ६ गावांमधील ४५ शेतकºयांचे १६ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे.जिल्हाधिकाºयांनी केली पाहणीजिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी गुरूवारी भुसावळ तालुक्यातील तसेच रावेर तालुक्यातील काही नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. त्यानुसार विमा कंपनी, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभागामार्फत एकत्रितपणे पंचनामे सुरू झाले आहेत.वादळीवारे व पावसामुळे २ जून पासून आतापर्यंत नुकसानगावे शेतकरी पिके व क्षेत्र (हेक्टर)यावल १८ २२६ १५८.५० (केळी)रावेर ३२ २०४० १९५२ (केळी)बोदवड ७ ३० २६ (कागदी लिंबू व केळी)मुक्ताईनगर ३२ २१५२ १५५६ (केळी)चोपडा १० १४२ ८६ (केळी)भडगाव ४ ३१ २७(केळी व लिंबू)चाळीसगाव ६ १२३ ७१.०६(केळी, लिंबू व फळबाग)पाचोरा ६ ४५ १६ (केळी)एकूण ११५ ४७८९ ३८९२.५६