शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांनी केल्या केळीबागा उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 14:21 IST

भडगाव तालुक्यातील वाडे येथील तळाव शिवारात सध्या रानडुकरांच्या कळपांनी थैमान घातले आहे.

ठळक मुद्देहजारो केळी खोडांचे नुकसान : शेतकरी संतप्त, वनविभाग सुस्तरानडुकरे, हरीणी, ससे, रोही, कोल्हे, सायङ यासह वन्यप्राण्यांचा वावर

भडगाव : तालुक्यातील वाडे येथील तळाव शिवारात सध्या रानडुकरांच्या कळपांनी थैमान घातले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हजारो नवती केळी झाडांचे नुकसान रानडुकरे करीत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. वनविभाग सुस्त तर शेतकरी संतप्त झालेले आहेत. तालुक्यातील वाडे येथील तिखीबर्डी वस्ती परीसरात तळाव शिवारात अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकासह फळबागायत व इतर पिकांची लागवड केलेली आहे. शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेऊन कष्टाने केळीसह इतर पिके हिरवळीने फुलवित आहेत. तळाव भागालगतच डोंगराळ व खडकाळ भाग आहे. या भागातच वनविभागाचे झाडे झुडपे आहेत. या हिरवळीच्या जंगलात रानडुकरे, हरीणी, ससे, रोही, कोल्हे, सायङ यासह वन्यप्राण्यांचा वावर असतो. माञ रानङुकरांचे कळपांनी सध्या मोठे थैमान घातले आहे. रानङुकरे मोसंबी, केळी आदी पिकांसह शेतातील ठिबक सिंचनचे नुकसान करताना दिसत आहेत. रानडुकरे हे रात्रभर अंधारात शेतांमध्ये केळी पिकात घुसुन नुकसान करीत आहेत. शेतकरी रात्रभर या रानडुकरांवर पाळत ठेवत केळीसह पिकांचे नुकसान होऊ नये, याकरिता सतर्कता बाळगतात. मात्र तरीही रानडुकरे केळी, मोसंबी पिकांचे नुकसान करीत आहेत. यावर्षी नुकसानीचे जास्त प्रमाण वाढल्याचे गिरीष लक्ष्मण महाजन यांच्यासह काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तळाव शिवारात केळी पिकाचे नुकसान झालेले शेतकरी असे आहेत.याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा. शेतकर्ऱ्यांना पिक नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होताना दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नारायण सुपडु महाजन यांचे ३०० केळी झाडांचे नुकसान झाले आहे. विजयसिंग भावसिंग गोमलाडू यांचे २००० नवती केळी झाडांचे नुकसान झाले आहे. भुतेसिंग धनसिंग परदेशी यांचेही २०० केळी झाडांचे नुकसान झाले आहे. रामदास नथ्थु महाजन यांचे २५० केळी झाडांचे नुकसान झाले आहे. गिरीष लक्ष्मण महाजन यांचेही २०० केळी झाडांचे व मोसंबी पिकाचे नुकसान झालेले आहे. मानसिंग भगा परदेशी यांचे २०० केळी झाडांचे, तसेच मळगाव रस्ता वाडे शिवारात अनिल सुपडू पाटील यांचेही १२५ केळी झाडांचे नुकसान झाले आहे.

 

सध्या रानडुकरांच्या कळपांनी धुमाकुळ घातला आहे. शेतशिवारातील नवती केळीसह पिकांचे नुकसान रानडुकरे करीत आहेत. माझेही ३००च्या जवळपास केळी झाडांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. वनविभाग हद्दला लागुन शेतांजवळ तारकंपाउंड करावे, अशी आमची मागणी आहे.

-नारायण सुपडू महाजन, शेतकरी, वाडे, ता. भडगाव.

 

वाडे येथील तळाव शेत शिवारात रानडुकरांचे वास्तव्य आहे. रात्रीच्या अंधारात ही रानडुकरे नवती केळी पिकासह मोसंबी आदी पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत. आमचेही नवती केळी झाडांचे जवळपास २००० झाडांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा.

-विजयसिंग गोमलाडू, शेतकरी, वाडे, ता. भडगाव.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBhadgaon भडगाव