शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

रानडुकरांनी केल्या केळीबागा उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 14:21 IST

भडगाव तालुक्यातील वाडे येथील तळाव शिवारात सध्या रानडुकरांच्या कळपांनी थैमान घातले आहे.

ठळक मुद्देहजारो केळी खोडांचे नुकसान : शेतकरी संतप्त, वनविभाग सुस्तरानडुकरे, हरीणी, ससे, रोही, कोल्हे, सायङ यासह वन्यप्राण्यांचा वावर

भडगाव : तालुक्यातील वाडे येथील तळाव शिवारात सध्या रानडुकरांच्या कळपांनी थैमान घातले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हजारो नवती केळी झाडांचे नुकसान रानडुकरे करीत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. वनविभाग सुस्त तर शेतकरी संतप्त झालेले आहेत. तालुक्यातील वाडे येथील तिखीबर्डी वस्ती परीसरात तळाव शिवारात अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकासह फळबागायत व इतर पिकांची लागवड केलेली आहे. शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेऊन कष्टाने केळीसह इतर पिके हिरवळीने फुलवित आहेत. तळाव भागालगतच डोंगराळ व खडकाळ भाग आहे. या भागातच वनविभागाचे झाडे झुडपे आहेत. या हिरवळीच्या जंगलात रानडुकरे, हरीणी, ससे, रोही, कोल्हे, सायङ यासह वन्यप्राण्यांचा वावर असतो. माञ रानङुकरांचे कळपांनी सध्या मोठे थैमान घातले आहे. रानङुकरे मोसंबी, केळी आदी पिकांसह शेतातील ठिबक सिंचनचे नुकसान करताना दिसत आहेत. रानडुकरे हे रात्रभर अंधारात शेतांमध्ये केळी पिकात घुसुन नुकसान करीत आहेत. शेतकरी रात्रभर या रानडुकरांवर पाळत ठेवत केळीसह पिकांचे नुकसान होऊ नये, याकरिता सतर्कता बाळगतात. मात्र तरीही रानडुकरे केळी, मोसंबी पिकांचे नुकसान करीत आहेत. यावर्षी नुकसानीचे जास्त प्रमाण वाढल्याचे गिरीष लक्ष्मण महाजन यांच्यासह काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तळाव शिवारात केळी पिकाचे नुकसान झालेले शेतकरी असे आहेत.याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा. शेतकर्ऱ्यांना पिक नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होताना दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नारायण सुपडु महाजन यांचे ३०० केळी झाडांचे नुकसान झाले आहे. विजयसिंग भावसिंग गोमलाडू यांचे २००० नवती केळी झाडांचे नुकसान झाले आहे. भुतेसिंग धनसिंग परदेशी यांचेही २०० केळी झाडांचे नुकसान झाले आहे. रामदास नथ्थु महाजन यांचे २५० केळी झाडांचे नुकसान झाले आहे. गिरीष लक्ष्मण महाजन यांचेही २०० केळी झाडांचे व मोसंबी पिकाचे नुकसान झालेले आहे. मानसिंग भगा परदेशी यांचे २०० केळी झाडांचे, तसेच मळगाव रस्ता वाडे शिवारात अनिल सुपडू पाटील यांचेही १२५ केळी झाडांचे नुकसान झाले आहे.

 

सध्या रानडुकरांच्या कळपांनी धुमाकुळ घातला आहे. शेतशिवारातील नवती केळीसह पिकांचे नुकसान रानडुकरे करीत आहेत. माझेही ३००च्या जवळपास केळी झाडांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. वनविभाग हद्दला लागुन शेतांजवळ तारकंपाउंड करावे, अशी आमची मागणी आहे.

-नारायण सुपडू महाजन, शेतकरी, वाडे, ता. भडगाव.

 

वाडे येथील तळाव शेत शिवारात रानडुकरांचे वास्तव्य आहे. रात्रीच्या अंधारात ही रानडुकरे नवती केळी पिकासह मोसंबी आदी पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत. आमचेही नवती केळी झाडांचे जवळपास २००० झाडांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा.

-विजयसिंग गोमलाडू, शेतकरी, वाडे, ता. भडगाव.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBhadgaon भडगाव