शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

रानडुकरांनी केल्या केळीबागा उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 14:21 IST

भडगाव तालुक्यातील वाडे येथील तळाव शिवारात सध्या रानडुकरांच्या कळपांनी थैमान घातले आहे.

ठळक मुद्देहजारो केळी खोडांचे नुकसान : शेतकरी संतप्त, वनविभाग सुस्तरानडुकरे, हरीणी, ससे, रोही, कोल्हे, सायङ यासह वन्यप्राण्यांचा वावर

भडगाव : तालुक्यातील वाडे येथील तळाव शिवारात सध्या रानडुकरांच्या कळपांनी थैमान घातले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हजारो नवती केळी झाडांचे नुकसान रानडुकरे करीत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. वनविभाग सुस्त तर शेतकरी संतप्त झालेले आहेत. तालुक्यातील वाडे येथील तिखीबर्डी वस्ती परीसरात तळाव शिवारात अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकासह फळबागायत व इतर पिकांची लागवड केलेली आहे. शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेऊन कष्टाने केळीसह इतर पिके हिरवळीने फुलवित आहेत. तळाव भागालगतच डोंगराळ व खडकाळ भाग आहे. या भागातच वनविभागाचे झाडे झुडपे आहेत. या हिरवळीच्या जंगलात रानडुकरे, हरीणी, ससे, रोही, कोल्हे, सायङ यासह वन्यप्राण्यांचा वावर असतो. माञ रानङुकरांचे कळपांनी सध्या मोठे थैमान घातले आहे. रानङुकरे मोसंबी, केळी आदी पिकांसह शेतातील ठिबक सिंचनचे नुकसान करताना दिसत आहेत. रानडुकरे हे रात्रभर अंधारात शेतांमध्ये केळी पिकात घुसुन नुकसान करीत आहेत. शेतकरी रात्रभर या रानडुकरांवर पाळत ठेवत केळीसह पिकांचे नुकसान होऊ नये, याकरिता सतर्कता बाळगतात. मात्र तरीही रानडुकरे केळी, मोसंबी पिकांचे नुकसान करीत आहेत. यावर्षी नुकसानीचे जास्त प्रमाण वाढल्याचे गिरीष लक्ष्मण महाजन यांच्यासह काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तळाव शिवारात केळी पिकाचे नुकसान झालेले शेतकरी असे आहेत.याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा. शेतकर्ऱ्यांना पिक नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होताना दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नारायण सुपडु महाजन यांचे ३०० केळी झाडांचे नुकसान झाले आहे. विजयसिंग भावसिंग गोमलाडू यांचे २००० नवती केळी झाडांचे नुकसान झाले आहे. भुतेसिंग धनसिंग परदेशी यांचेही २०० केळी झाडांचे नुकसान झाले आहे. रामदास नथ्थु महाजन यांचे २५० केळी झाडांचे नुकसान झाले आहे. गिरीष लक्ष्मण महाजन यांचेही २०० केळी झाडांचे व मोसंबी पिकाचे नुकसान झालेले आहे. मानसिंग भगा परदेशी यांचे २०० केळी झाडांचे, तसेच मळगाव रस्ता वाडे शिवारात अनिल सुपडू पाटील यांचेही १२५ केळी झाडांचे नुकसान झाले आहे.

 

सध्या रानडुकरांच्या कळपांनी धुमाकुळ घातला आहे. शेतशिवारातील नवती केळीसह पिकांचे नुकसान रानडुकरे करीत आहेत. माझेही ३००च्या जवळपास केळी झाडांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. वनविभाग हद्दला लागुन शेतांजवळ तारकंपाउंड करावे, अशी आमची मागणी आहे.

-नारायण सुपडू महाजन, शेतकरी, वाडे, ता. भडगाव.

 

वाडे येथील तळाव शेत शिवारात रानडुकरांचे वास्तव्य आहे. रात्रीच्या अंधारात ही रानडुकरे नवती केळी पिकासह मोसंबी आदी पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत. आमचेही नवती केळी झाडांचे जवळपास २००० झाडांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा.

-विजयसिंग गोमलाडू, शेतकरी, वाडे, ता. भडगाव.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBhadgaon भडगाव