शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ऑक्सिजन ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ती परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : खासगी दवाखान्यात १९ दिवस उलटले होते...कोरोना मानगुटीवर बसला होता...केव्हाही जीव जाऊ शकतो म्हणून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : खासगी दवाखान्यात १९ दिवस उलटले होते...कोरोना मानगुटीवर बसला होता...केव्हाही जीव जाऊ शकतो म्हणून डॉक्टरांनी सांगितले घरी घेऊन जा....ऑक्सिजन फक्त ३८ ...मरू दिल्याचे पाप लागू नये, म्हणून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात महत्प्रयासाने फक्त मृत्यूची वाट पाहण्यासाठी दाखल करण्यात आले... डॉक्टरांनी आपले प्रयत्न चिकाटीने केले... पन्नास दिवस मांडळची राजकोरबाई जिद्दीने कोरोनाशी लढली अन मृत्यूवर विजय मिळवलाच.

मांडळ येथील राजकोरबाई कोळी हिला कोरोना झाल्यामुळे धुळे येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल १९ दिवस खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले; मात्र राजकोर बाईच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. खासगी दवाखान्यातील खर्च परवडत नव्हता. अखेर तेथील डॉक्टरांनी आशा सोडली आणि राजकोरबाई आता जिवंत राहू शकत नाही म्हणून घरी नेण्यास सांगितले. नातेवाईक हतबल झाले. असेच मरणावर कसे सोडणार म्हणून भाऊ अशोक कोळी व इतरांनी ताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांना विनंती केली की, काही करा पेशन्ट मरणार आहेच; पण दाखल करून ऑक्सिजन लावा. साधारणतः महिनाभरापूर्वीची २६ एप्रिलची ती वेळ होती.

बेड उपलब्ध नव्हते तरी प्रशासनाने तिला दाखल करून घेतले. राजकोरबाईचा ऑक्सिजन फक्त ३८ आणि एचआरसीटी स्कोअर १९ आणि उच्च रक्तदाब होता. आलेल्या रुग्णाला वाचवण्याचे प्रयत्न करणे, हे कर्तव्य समजून डॉ. प्रकाश ताडे, डॉ. आशिष पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. मेहमूद, डॉ. तनुश्री फडके, डॉ. प्रशांत कुलकर्णी, डॉ. सागर पाटील, डॉ. परेश पवार, डॉ. नरेंद्र पाटील, सर्व कर्मचारी आणि परिचारिका सर्वांनी जातीने लक्ष घालणे सुरू केले.

ऑक्सिजन लावल्यानंतरही त्या महिलेचा ऑक्सिजन फक्त ८६ होता तरी त्यांनी गोळ्या औषधी, इंजेक्शन वेळेवर सुरू केले. तीन दिवस जणू काही ती मृत्यूशय्येवर होती. जेवण नाही, बोलणे नाही अशी परिस्थिती आल्यावरही डॉक्टरांनी तिला बायपॅप मशीन लावले. हाय फ्लो ऑक्सिजन लावला. हळूहळू महिला प्रतिसाद देऊ लागली. डॉक्टरांच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांनी महिलेला सकारात्मक प्रेरणा देणे सुरू केले. राजकोरबाईनेदेखील जगण्याची जिद्द ठेवली. कोरोनावर राज करणारच म्हणत उपचाराला प्रतिसाद देऊ लागली.

डॉक्टरांनी हळूहळू तिचा ऑक्सिजन कमी केला, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर लावले, नंतर पाच दिवस ऑक्सिजन बंद केला. ग्रामीण रुग्णालयात ३१ दिवसांनंतर महिलेचा ऑक्सिजन ९५ ते ९६ येऊ लागला अन् एकूण ५० दिवस कोरोनाशी लढून ती महिला घरी परतली.

जाताना डॉक्टरांच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद लपला नव्हता. सर्वांनी गेटवर येऊन तिला कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. महिला व तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि प्रशासनाचे आभार मानले.

===Photopath===

270521\27jal_5_27052021_12.jpg

===Caption===

ऑक्सिजन ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ती परतली