शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नोटीस बजावूनही तरसोद ते फागणे महामार्गाच्या कामाला गती येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:18 IST

जळगाव : तरसोद ते फागणे महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून या विषयी नोटीस देऊनही उपयोग नसल्याने या ...

जळगाव : तरसोद ते फागणे महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून या विषयी नोटीस देऊनही उपयोग नसल्याने या कामाबाबत संबंधित अधिकारी, सल्लागार, संबंधित एजन्सी या सर्व अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलाविण्यात यावी, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे. या विषयी त्यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या मार्गाचे केवळ १० टक्केच काम झाले असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

तरसोद ते फागणे दरम्यान महामार्गाचे काम गेल्या ५ वर्षांपासून सुरू असून या कामाच्या दिरंगाईमुळे या महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. बऱ्याच ठिकाणी खड्डे असल्याने दररोज होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात असून आतापर्यंत २५० जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे खासदार पाटील यांनी नमूूद करीत हा विषय थेट लोकसभेत उपस्थित केला. या विषयी ते म्हणाले की, आजही या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने येथून प्रवास करणाऱ्या बऱ्याच लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. या विषयी आपण जिल्हा विकास समन्वय व देखरेख समिती (दिशा) आणि रस्ते सुरक्षा सभेपुढे विषय ठेवल्यानंतर संबंधित कंत्राटदार व प्रशासकीय यंत्रणांना नोटीस बजावण्यात आली. तरीदेखील अद्याप हे काम अतिशय धीम्यागतीने सुरू आहे. यामुळे जनतेत तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या तरसोद, असोदा, ममुराबाद, आव्हाणे, बांभोरी, पाळधी, एकलग्न, वराड, पिंपळकोठे, एरंडोल, धारागीर, तुराटखेडा, सावखेडा, सार्वे, म्हसवे, पारोळा, विदखेडा, दळवेल, मुकटी, अजंग, फागणे या मार्गालगतच्या व परिसरातील नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहे. याकरिता संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणे गरजेचे आहे. जेणेकरून या महामार्गाच्या दिरंगाईबाबत दिशानिर्देश देता येतील, असे खासदार पाटील म्हणाले.

केवळ १० टक्केच काम

या महामार्गाची लांबी ८७.३ किमी आहे, त्यापैकी आतापर्यंत जवळपास १० टक्केच काम झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. या करिता संथ गतीने सुरू असलेल्या तरसोद ते फागणे महामार्गाच्या बांधकामाबाबत संबंधित अधिकारी, सल्लागार, संबंधित एजन्सी या सर्व अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलाविण्यात यावी, अशी मागणी केली.