शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

ऑक्सिजन पातळी ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ती परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 15:24 IST

राजकोरबाई हिला कोरोना झाल्यामुळे धुळे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल १९ दिवस या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

संजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : खाजगी दवाखान्यात १९ दिवस उलटले होते. कोरोना मानगुटीवर बसला होता. केव्हाही जीव जाऊ शकतो, असे सांगत डॉक्टरांनी रुग्ण महिलेस घरी नेण्यास सांगितले. त्यावेळी ऑक्सिजन पातळी होती फक्त ३८; पण जबर इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने मांडळच्या राजकोरबाई कोळी (५०) हिने जिद्दीने कोरोनाशी लढत मृत्यूलाही परतवून लावले.

राजकोरबाई हिला कोरोना झाल्यामुळे धुळे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल १९ दिवस या रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, राजकोरबाईच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दुसरीकडे खाजगी दवाखान्यातील खर्च परवडत नव्हता. अखेर तेथील डॉक्टरांनी आशा सोडली आणि राजकोरबाईचे केव्हाही काहीही होऊ शकते, असे सांगत घरी नेण्यास सांगितले. डॉक्टरांनी आशा सोडल्यावर नातेवाईकही हतबल झाले. असेच मरणावर कसे सोडणार म्हणून भाऊ अशोक कोळी व इतरांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांना विनंती केली की, काही करा पेशंट जाणार आहेच; पण दाखल करून ऑक्सिजन लावा. साधारणतः महिनाभरपूर्वीची २६ एप्रिलची ती वेळ होती.

या काळात अमळनेरात बेड उपलब्ध नव्हते. प्रशासनाने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घेतले. राजकोरबाईचा ऑक्सिजन फक्त ३८ आणि एचआरसीटी स्कोअर १९ आणि उच्च रक्तदाब होता तो वेगळाच.

रुग्णाला वाचवण्याचे प्रयत्न करणे हे कर्तव्य समजून डॉ. प्रकाश ताडे, डॉ. आशिष पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. मेहमूद, डॉ. तनुश्री फडके, डॉ. प्रशांत कुलकर्णी, डॉ. सागर पाटील, डॉ. परेश पवार, डॉ. नरेंद्र पाटील, सर्व कर्मचारी आणि परिचारिका असे सर्व जण कामाला लागले.

ऑक्सिजन लावल्यानंतरही या महिलेचा ऑक्सिजन फक्त ८६ होता तरी त्यांनी गोळ्या औषधी, इंजेक्शन वेळेवर सुरू केले. तीन दिवस जणूकाही ही महिला मृत्यूशय्येवर होती. जेवण नाही, बोलणे नाही. अशी परिस्थितीतही डॉक्टरांनी तिला बायपॅप मशीन लावले. हाय फ्लो ऑक्सिजन लावला. हळूहळू महिला प्रतिसाद देऊ लागली.

डॉक्टरांच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांनी महिलेला सकारात्मक प्रेरणा देणे सुरू केले. राजकोरबाईने देखील जगण्याची जिद्द ठेवली. कोरोनावर राज करणारच म्हणत उपचाराला प्रतिसाद देऊ लागली. ग्रामीण रुग्णालयात ३१ दिवसांनंतर महिलेचा ऑक्सिजन ९५ ते ९६ येऊ लागला अन् एकूण ५० दिवस कोरोनाशी लढून ती महिला घरी परतली.

जाताना डॉक्टरांच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद होता. सर्वांनी गेटवर येऊन तिला कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. महिला व तिच्या कुटुंबीयांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस