शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रापासून आदिवासी-पारधी समाज वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 16:59 IST

राज्यात ३२ जिल्ह्यामध्ये आदिवासी-पारधी समाजाची लोकसंख्या सुमारे २० लाख जनगणना आहे. तरीही हा समाज राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रापासून वंचित आहे. हजारांपेक्षा अधिक आश्रमशाळा असूनही त्या केवळ शिक्षण सम्राटांच्या ताब्यात असल्याने शैक्षणिक स्तर पाहिजे तितका उंचावला नाही. या सर्व कारणांसाठी राज्यभर व्यापक चळवळ उभी करणार असल्याची माहिती आदिवासी-पारधी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष एकनाथ नागो साळुंखे यांनी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखतआदिवासी-पारधी महासंघ प्रदेश अध्यक्ष एकनाथ साळुंखे यांची मुलाखत

संजय सोनारचाळीसगाव, जि.जळगाव : राज्यात ३२ जिल्ह्यामध्ये आदिवासी-पारधी समाजाची लोकसंख्या सुमारे २० लाख जनगणना आहे. तरीही हा समाज राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रापासून वंचित आहे. हजारांपेक्षा अधिक आश्रमशाळा असूनही त्या केवळ शिक्षण सम्राटांच्या ताब्यात असल्याने शैक्षणिक स्तर पाहिजे तितका उंचावला नाही. या सर्व कारणांसाठी राज्यभर व्यापक चळवळ उभी करणार असल्याची माहिती आदिवासी-पारधी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष एकनाथ नागो साळुंखे यांनी ‘लोकमत’ला दिली.चाळीसगाव येथे आदिवासी मेळाव्यासाठी ते आले असता त्यांची प्रस्तूत प्रतिनिधीने भेट घेऊन चर्चा केली.प्रश्न : आदिवासींसाठी स्वतंत्र आश्रमशाळा असूनही शैक्षणिक स्तर घसरला कसा?उत्तर : शासकीय आदिवासी आश्रमशाळा १२५० तर स्वयंसेवी संस्थांकडे १२५० अशा एकूण २५०० शाळा सुरू आहेत. या शाळा शिक्षण सम्राटांच्या ताब्यात आहेत. या शाळांना आदिवासी, पारधी, भटक्या विमुक्त यांची मुले शिकतात म्हणून शासन अनुदान देते. प्रत्यक्षात मात्र या शाळेचे चित्र वेगळे आहे. ज्या उद्देशाने निधी दिला जातो त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे या समाजातील मुलाचा शैक्षणिक स्तर पाहिजे तितका उंचावला गेला नाही.प्रश्न : आदिवासी-पारधी समाजातील मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी शासनाने काय केले पाहिजे?उत्तर : आदिवासीपर्यंत खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगोत्री पोहोचविण्यासाठी ह्या शाळा आदिवासी लोकांना चालविण्यासाठी शासनाने निर्णय घ्यायला हवा. किमान प्रायोगिक तत्वावर परवानगी दिली तरी चालेल. त्यातूनच शासनाची शैक्षणिक चळवळ यशस्वीपणे राबविली जाईल.प्रश्न : आरक्षण असून ही राजकीय क्षेत्रात आपण मागे कसे?उत्तर : राज्यात २५ विधानसभा मतदारसंघ तर चार लोकसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव आहे.परंतु गेल्या ७० वर्षात एकाही राजकीय पक्षाने आदिवासींना उमेदवारी दिलेली नाही. हे मतदारसंघ आदिवासींसाठी असूनही त्याचा फायदा त्यांना मिळत नसेल तर हे राखीव मतदारसंघ काढून टाकले पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. एकंदरीत घटनात्मक राजकीय आरक्षणापासून या समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी स्वातंत्र्यापासून वंचित ठेवल्याची खंत आहे.प्रश्न : ठिकठिकाणी मेळावे घेण्याचे प्रयोजन काय?उत्तर : आदिवासी-पारधी समाज प्रत्येक जिल्ह्यात असून या समाजाच्या ४५ जाती-जमाती आहेत. परंतु हा समाज एकत्र नसल्याने त्याचा फायदा राजकीय पक्षांनी आतापर्यंत घेतलेला आहे. आता मात्र हा समाज जागा झाल्याने तो संघटित करण्यासाठी आम्ही राज्यभर मेळावे घेऊन समाज संघटन करीत आहे.प्रश्न : तुमच्या समाजाच्या काय मागण्या आहेत?उत्तर : शासनाने आदिवासी-पारधी आर्थिक विकास मंडळाची स्थापना करावी. समाजाला राजकीय क्षेत्रात समाविष्ट करून घ्यावे. आदिवासी विकासासाठी स्व.आर.आर.आबा पाटील यांनी पॅकेज दिले होते. भाजप सरकारने ते बंद केले आहे. ते पुन्हा सुरू करावे ही प्रमुख मागणी आहे.यावेळी बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव, आदिवासी-पारधी महासंघाचे महासचिव रा.ना.सोनवणे, संघटक मुकेश साळुंखे, गुजरात महिला अध्यक्ष इंदुमती सोळंके, जळगाव जिल्हाध्यक्ष सीताराम पारधी, विदर्भप्रमुख सुकदेव दाबेराव उपस्थित होते.

टॅग्स :interviewमुलाखतChalisgaonचाळीसगाव