शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

समस्यांच्या पावसासाठी आरोग्य विभाग सक्षम आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 17:12 IST

आनंद सुरवाडे सर्वत्र समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. धरणांची पातळी समाधानकारक आहे, मात्र, शहरात, गावांमध्ये झालेल्या रिमझीम पावसामुळे साचलेले डबके, ...

आनंद सुरवाडेसर्वत्र समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. धरणांची पातळी समाधानकारक आहे, मात्र, शहरात, गावांमध्ये झालेल्या रिमझीम पावसामुळे साचलेले डबके, तुंबलेल्या गटारी, तुंबलेले नाले, स्वच्छतेचा अभाव या सर्व बाबी आगामी काळात आरोग्याच्या समस्यांना मोठ्या प्रमाणावर निमंत्रण देणाऱ्या आहेत़ ज्या वेगोन या समस्या उदभवण्याची शक्यता आहे, त्यावेगाने आरोग्य विभागाच्या मात्र कुठल्याही उपाययोजना नाहीत़ त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आता सक्षम आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे़पावसामुळे सर्वत्र छोटे मोठे डबके साचलेले आहेत़ हे डबके डासांना पोसणारे असतात, स्वच्छता नसल्याने सहाजिकच रोगराईला आमंत्रण मिळते़ पावसाळा सुरू असतानाच भुसावळात दोन डेंग्यूचे रूग्ण आढळल्याचे वृत्त आले़ आगामी काळात ही स्थिती अधिकच गंभीर होणार आहे़ ज्या आरोग्य यंत्रणेवर जिल्ह्याची आरोग्य सेवा अवलंबून आहे त्या जिल्हा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दोन -दोन तीन - तीन महिने पगार होत नसल्याने या विभागाचेच आरोग्य सध्या बिघडल्यात जमा आहे़ नवीन जिल्हा आरोग्य अधिकारी यायला तयार नसून गेल्या दोन महिन्यांपासून प्रभारी कारभार सुरू आहे़ कर्मचाºयांना वेतन नसल्याने त्यांचे मनोबल खचल्याचे सांगण्यात येते़ सर्वात जास्त प्रलंबित फाईली या विभागात राहत असल्याच्या वरिष्ठांच्या तक्रारी आहेत़ जिल्हाभरातील आरोग्य केंद्रात ९४ जागा रिक्त पडल्या आहेत़ बºयाच आरोग्य केंद्राना डॉक्टर मिळत नाही, ही डगमगलेली सेवा सावरण्यातच आरोग्य विभागाचे अर्धे श्रम जात आहेत, त्यामुळे आता पावसामुळे जिल्हाभरात उद्भवणाºया आरोग्याच्या समस्या सावरण्यात यंत्रणा पुरेसी पडेल का? असा प्रश्न तर आहेच मात्र, जर अशा समस्या आता उद्भवणार आहे, हे उघड असताना आतापासूनच उपायायोजनांना व जनजागृतीला सुरूवात का होत नाही? शासकीय कागदांचे खेळ खेळण्यापेक्षा थेट लोकांमध्ये जावून समस्या थांबवायला यंत्रणा नेहमी कमी का पडत असत? या प्रश्नाचे उत्तर शोधल्यास बºयाच अडचणींवर मात करता येणे शक्य होणार आहे़ चांगल्या अधिकाºयांना टिकू दिले जात नाही, हा जो आरोप होतो तो सामान्य व आरोग्य यंत्रणा यातील दुरावा अधिक वाढविणारा आहे़ नवीन अधिकारी यायला या ठिकाणी धजावत नाही, हा स्थानिक प्रशासनाने आत्मपरिक्षण करण्याचा विषय आहे़ जनजागृतीसाठी कोट्यवधींवर खर्च होतो मात्र तरीही दर वर्षी पुन्हा त्याच विषयावर जागृतीसाठी मोहीम हाती घ्यावीच लागते हे यंत्रणेचे अपयश म्हणावे का? डेंग्यू, मलेरिया, टाईफार्ईड, डायरिया या आजारांचे थैमान सुरू होण्याआधी ते आता थांबविणे आरोग्य विभागाच्या हाती आहे किंवा नाही़?आरोग्य विभागाच्या बाबतीत आधिच सामन्यांच्या मनात असंतोष आहे, तो दूर करण्यास हा विभाग वारंवार कमी पडला आहे़ चांगले अधिकारी येतात मात्र, राजकीय अडथळ्यांमुळे ते चांगल्या सेवा देऊ शकत नाही, किंवा अधिकारीच उदासीन असतात व आरोग्य सेवा कोलमडते अशातच हा आरोग्य विभाग गुरफटून पडला आहे़ एक लिपीक काम करीत नाही म्हणून सर्व कर्मचाºयांचे पगारच होत नाही, अशी पर्यायी व्यवस्था नसलेली ही यंत्रणा आता पावसानंतर उद्भवणाºया समस्यांचा सामना करायला सक्षम आहे का?त्यामुळे नागरिकांनी काहीबाबींवर स्वत:च काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल़ स्वच्छता राखणे, डबके साचू न देणे, मच्छरांना पोषक वातावरण निर्माण होऊ न देणे, कोरडा दिवस पाळणे, कचºयाची वेगवेगळा करून योग्य विल्हेवाट लावणे, पाणी उकळून पिणे, लहान बालके व वृद्धांची अधिक काळजी घेणे, मच्छरांपासून बचावात्मक उपाययोजना करणे याबाबी पाळाव्यात जेणे करून आरोग्य विभागावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही़

टॅग्स :Jalgaonजळगाव