शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

वाघूरमधून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 11:27 IST

मनपाने गिरणातील पाण्यावर पुन्हा आरक्षण करावे : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : वाघूर धरणातून उजव्या व डाव्या कालव्यात शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने लाभसिंचन समितीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.समितीने याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळी कापूस लागवडीसाठी दरवर्षाप्रमाणे लाभसिंचन समितीने पाण्याची मागणी केली. वाघूर धरण विभागाकडून पिण्याचे पाणी राखीव ठेवून शेतीसाठी आवर्तन सोडणे शक्य आहे, असे सांगितले. मात्र त्याबाबत लाभसिंचन समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घ्यावी, असे वाघूर धरण विभागातर्फे सांगण्यात आले. त्यानुसार २० मे रोजी समिती सदस्यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली असता वाघूर धरण विभागाकडून पाणीसाठ्याची माहिती मागवून निर्णय घेऊ, असे सांगितले. २७ मे रोजी समिती सदस्यांनी पुन्हा जिल्हाधिकाºयांची भेट घेतली असता वाघूर धरण विभागाकडून पिण्याचे पाणी राखीव ठेवून शेतीसाठी पाणी सोडणे शक्य आहे, असा अहवाल प्राप्त झाल्याचे सांगितले. परंतू कृषी अधिकाºयांच्यामते ३१ मेच्या आधी कापूस लागवड केली तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्ळामुळे मे ऐवजी १ ते ७ जून दरम्यान आवर्तन सोडू, असे सांगितले.वाघूर धरणाच्या लाभक्षेत्रात येतअसलेल्या जळगाव, भुसावळ तालुक्यातील शेतकºयांना सिंचनासाठी वाघूर धरण हाच एकमेव पर्याय असल्यामुळे त्या परिसरातील लाभधारक शेतकरी पाटाला पाणी सुटणार, या भरवशावर होता. २७ मे रोजी आवर्तन सोडणे शक्य असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. मात्र ३ जून रोजी भेट घेतली असता वाघूर धरण विभागाकडून पाणी सोडणे शक्य नसल्याचा अहवाल आला असल्याचे सांगितले. यावरून प्रशासन व शासन हे या धरणासाठी आपली सोन्यासारखी जमीन देणाºया श्ोतकºयांबाबत उदासीन आहे. शेतकºयांनी या धरणासाठी जमीन दिली, त्यांचे काय? असा सवाल शेतकºयांनी केला आहे.१५० दलघमीचे आवर्तन सोडासद्यस्थितीत वाघूर धरणात १२०० दलघमी जिवंत पाणीसाठा असून त्यापैकी सिंचनासाठी केवळ १०० ते १५० दलघमी पाण्याचे आवर्तन सोडावे लागणार आहे. त्यामुळे या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. मात्र त्याबाबत काहीही हालचाल न झाल्याने प्रशासन व शासनाच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी सर्व लाभधारक शेतकºयांनी काळ्या फितीलावून लाक्षणिक उपोषण केले. त्यात जि.प. सदस्य लालचंद पाटील, किशोर चौधरी, पं.स. सभापती यमुनाबाई रोटे, भादली विकासो चेअरमन मिलिंद चौधरी, राजेंद्र चौधरी भादली बु., धनराज कोल्हे, असोदा, योगेश नारायण पाटील, नशिराबाद, बेलव्हाळ सरपंच मनिष खाचणे, निमगाव बु. सरपंच प्रियंका पाटील, बेळी सरपंच शालिनी भंगाळे, ललित बºहाटे, नशिराबाद, वराडसीम सरपंच प्रशांत खाचणे, खेमचंद महाजन यांच्यासह श्ोतकरी सहभागी झाले होते.जलसंपदाने ने निर्णय घ्यापाऊस लांबला असून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. वाघूरवर जळगाव मनपासह विविध पाणीयोजनांचे आरक्षण आहे. ते आरक्षित पाणी तसेच बाष्पीभवन या सगळ्यांचा विचार करून या पाणी योजनांना १५ जुलैपर्यंत पाणी राहील, याचा विचार करून जलसंपदाविभागाने अतिरिक्त पाणी असल्यास ते शेतीला सोडायचे की नाही? याचा निर्णय घ्यावा, असे जिल्हाधिकाºयांनी शिष्टमंडळाला सांगितले. तसे जलसंपदाविभागालाही कळविण्यात आले असल्याचे समजते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव