शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

जळगाव जिल्ह्यासाठी १५०० वाढीव शिवभोजन थाळींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:36 IST

जिल्ह्यात दररोज ३८ केंद्रांवरून ३५०० थाळ््यांचे वितरण

जळगाव : लॉकडाऊनच्या काळात अनेक गरीब आणि गरजूंना शिवभोजनाचा आधार मिळत असून जिल्ह्यात वाढता प्रतिसाद पाहता जिल्ह्यासाठी आणखी वाढीव एक हजार ५०० शिवभोजन थाळींची मागणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून दररोज ३५०० थाळींचे वितरण होत आहे.थाळीची किंमत निम्म्यावरज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये तर ही योजना जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि निराश्रित यांच्यासाठी वरदान ठरत आहे. त्यात या काळात अनेकांच्या हाताला काम नसल्याने शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपये केली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे.दिवसेंदिवस वाढती मागणीगेल्या पाच ते सहा महिन्यांपासून या योजनेला जिल्ह्यात वाढता प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला जळगाव शहरातील ९ केंद्र्रासह व मुक्ताईनगर तालुक्यातील एका केंद्रावर जवळपास ९२५ थाळी रोज नागरिकांना वाटप केल्या जात होत्या. त्यानंतर त्यात वाढ होत जाऊन अन्य तालुक्यांमध्येदेखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे सध्या जळगाव शहरातील १६ केंद्रांसह जिल्ह्यातील ३८ शिवभोजन केंद्रांवरून दररोज ३५०० थाळ््यांचे वितरण केले जात आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली.मागणी आणखी वाढविलीया योजनेला वाढता प्रतिसाद पाहता आता पुन्हा वाढीव १५०० थाळ््यांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. तसे पत्र देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात ३८ शिवभोजन केंद्र्राच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यात ४ लाख ९२ हजार ३४८ नागरिकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला.पार्सल स्वरुपात वाटपकोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याने शिवभोजन थाळीचे स्वरूप बदलून पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये पार्सल स्वरूपात तयार जेवण दिले जात आहे. या शिवभोजन थाळीचा वितरण करताना फोटो काढण्यात येतो. प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र अ‍ॅपवरदेखील अपलोड केले जात आहे. एक वाटी वरण, एक वाटी भात, दोन पोळ््या आणि एक वाटी भाजी असे शिवभोजन योजनेचे स्वरूप आहे.दोन केंद्र चालकांना ताकीदशिवभोजन केंद्रांवरून वितरण होणाºया या पार्सल स्वरुपातील थाळीमध्ये देण्यात येणाºया पोळ््या व भाताचे ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कमी वजन भरल्याचे आढळून आले होते. यामध्ये संबंधितांना ताकीद देण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव