शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

केळीची नुकसानभरपाई मिळण्यास बिलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST

केऱ्हाळे, ता. रावेर : गत एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या तारखेस तालुकाभरात वादळी वाऱ्यामुळे केळीचे खूप ...

केऱ्हाळे, ता. रावेर : गत एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या तारखेस तालुकाभरात वादळी वाऱ्यामुळे केळीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या वेळेस झालेल्या नुकसानीची भरपाई ही पीकविमा संरक्षण घेतलेल्या कंपनीकडून पूर्णतः तत्काळ मिळावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वादळ-वाऱ्यामुळे नुकसान झाले त्या वेळेस विमा कंपनीच्या नियमानुसार वेळेच्या आत शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे कंपनीला सूचित केले आहे. त्याप्रमाणे कंपनीने आपले प्रतिनिधी पाठवून संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करून कंपनीकडे अहवाल सादर केलेले आहेत. सदर कार्यालयीन कामकाज कधीच आटोपले असून आता कंपनीकडून भरपाई होणे आवश्यक आहे. कारण ज्याप्रमाणे विमा हप्ता भरतेवेळी एक दिवसाचा विलंब झाला तर शेतकऱ्याला योजनेपासून दूर ठेवले जाते, त्याप्रमाणे शासनाच्या नियमानुसार १५ सप्टेंबरपर्यंत संबंधित विमा संरक्षण देणाऱ्या कंपनीने भरपाईची रक्कम लाभधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणेदेखील बंधनकारक आहे. मात्र मुदत संपून एक आठवडा झाला असून अद्यापही भरपाईची रक्कम देण्यासाठी कंपनीकडून कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्यामुळे शेतकरी वर्गातून अनंत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कमाल व किमान तापमानातून तालुका निरंक असह्य तापमान व कडाक्याच्या थंडीचा सामना करूनदेखील तालुक्यातील कोणतेही महसूल मंडळ भरपाईस पात्र ठरले नसल्याचे कंपनीकडून जाहीर होताच शेतकरी अचंबित झाले आहेत. यामुळे संबंधित कंपनीच्या कामकाजावर शंका निर्माण केली जात आहे. अशा दुहेरी कचाट्यात सापडलेला शेतकरी भरपाईच्या रकमेची विवंचना करीत आहे.

सन २०२०/२१ मध्ये वादळामुळे झालेली हानी अपरिमित आहे. मात्र आमच्या हक्काच्या विमा संरक्षणापोटी मिळणारी रक्कम तत्काळ मिळावी. अन्यथा शेतकरी कर्जाच्या खाईत जास्त ढकलला जाईल

- योगेश प्रकाश पाटील शेतकरी, केऱ्हाळे, ता. रावेर