शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
2
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
3
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तारीख ठरली; पीएम मोदींशी ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर होणार चर्चा
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत गुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम
7
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
8
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
9
वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळणार, संघाचे नेतृत्व 'मराठी मुलगा' करणार !
10
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
11
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
12
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
13
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
14
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
15
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
16
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
17
'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
18
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
19
Black Friday Sale 2025: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ६५% पर्यंत स्वस्तात मिळताहेत TV-फ्रिज; पाहा ऑफर आणि किंमत
20
निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
Daily Top 2Weekly Top 5

केळीची नुकसानभरपाई मिळण्यास बिलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST

केऱ्हाळे, ता. रावेर : गत एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या तारखेस तालुकाभरात वादळी वाऱ्यामुळे केळीचे खूप ...

केऱ्हाळे, ता. रावेर : गत एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या तारखेस तालुकाभरात वादळी वाऱ्यामुळे केळीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या वेळेस झालेल्या नुकसानीची भरपाई ही पीकविमा संरक्षण घेतलेल्या कंपनीकडून पूर्णतः तत्काळ मिळावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वादळ-वाऱ्यामुळे नुकसान झाले त्या वेळेस विमा कंपनीच्या नियमानुसार वेळेच्या आत शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे कंपनीला सूचित केले आहे. त्याप्रमाणे कंपनीने आपले प्रतिनिधी पाठवून संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करून कंपनीकडे अहवाल सादर केलेले आहेत. सदर कार्यालयीन कामकाज कधीच आटोपले असून आता कंपनीकडून भरपाई होणे आवश्यक आहे. कारण ज्याप्रमाणे विमा हप्ता भरतेवेळी एक दिवसाचा विलंब झाला तर शेतकऱ्याला योजनेपासून दूर ठेवले जाते, त्याप्रमाणे शासनाच्या नियमानुसार १५ सप्टेंबरपर्यंत संबंधित विमा संरक्षण देणाऱ्या कंपनीने भरपाईची रक्कम लाभधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणेदेखील बंधनकारक आहे. मात्र मुदत संपून एक आठवडा झाला असून अद्यापही भरपाईची रक्कम देण्यासाठी कंपनीकडून कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्यामुळे शेतकरी वर्गातून अनंत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कमाल व किमान तापमानातून तालुका निरंक असह्य तापमान व कडाक्याच्या थंडीचा सामना करूनदेखील तालुक्यातील कोणतेही महसूल मंडळ भरपाईस पात्र ठरले नसल्याचे कंपनीकडून जाहीर होताच शेतकरी अचंबित झाले आहेत. यामुळे संबंधित कंपनीच्या कामकाजावर शंका निर्माण केली जात आहे. अशा दुहेरी कचाट्यात सापडलेला शेतकरी भरपाईच्या रकमेची विवंचना करीत आहे.

सन २०२०/२१ मध्ये वादळामुळे झालेली हानी अपरिमित आहे. मात्र आमच्या हक्काच्या विमा संरक्षणापोटी मिळणारी रक्कम तत्काळ मिळावी. अन्यथा शेतकरी कर्जाच्या खाईत जास्त ढकलला जाईल

- योगेश प्रकाश पाटील शेतकरी, केऱ्हाळे, ता. रावेर