शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

देहिनोऽस्मिन्यथा देहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 21:30 IST

भगवंत स्वत:चा विस्तार असंख्य रुपांमध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रुपांना विष्णूतत्व म्हटले जाते तर दुय्यम किंवा गौव विस्तारांना ...

भगवंत स्वत:चा विस्तार असंख्य रुपांमध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रुपांना विष्णूतत्व म्हटले जाते तर दुय्यम किंवा गौव विस्तारांना जीवतत्व म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाले तर, विष्णूतत्व म्हणजे त्यांचे स्वांश तर जीव म्हणजे विभिन्नांश आहेत. भगवंत स्वत:च्या वैयक्तिक विस्ताराव्दारे भगवान राम, नृसिंहदेव, विष्णूमूर्ती आणि वैकुंठलोकातील इतर सर्व अधिष्ठाता मूर्तींच्या रुपात प्रकट होतात.भगवंतांचे स्वांश अर्थात, त्यांची प्रधान रूपे नित्य अस्तित्वात असतात. त्याचप्रमाणे त्याचे विभिन्नांश असणाºया जीवांनाही व्यक्तित्व असते. जीव हे भगवंतांचे अंश असल्याकारणाने त्यांच्यामध्ये भगवंतांचे गुणही अंशरुपाने असतात. स्वातंत्र्य हा एक गुण आहे.या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने जीव बध्द होतो आणि योग्य उपयोग केल्याने तो सदैव मुक्त राहतो. योंपैकी कोणत्याही स्थितीत तो भगवंतांप्रमाणेच गुणात्मकदृष्ट्या सनातन आहे. मुक्तावस्थेमध्ये तो या भौतिक बध्द जीवनातून मुक्त असतो आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न असतो; बध्द जीवनामध्ये त्याच्यावर त्रिगुणांचे वर्चस्व असते आणि त्याला दिव्य प्रेममयी भगवत् सेवेचे विस्मरण झालेले असते.मांजर-कुत्री, मनुष्य-प्राणी इत्यादी जीवच नव्हे तर या प्राकृत जगताचे ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि विष्णू इत्यादी महान नियंत्रकही भगवंतांचे अंश आहेत. ते सर्व अनित्य नसून शाश्वत आहेत. बध्द जीव हा जणू काही लोखंडांच्या साखळ्यांनी बांधला गेला आहे. तो मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि मन त्याला संसारात संघर्ष करण्यास भाग पाडण्याच प्रमुख कारण आहे.जेव्हा त्याचे मन सत्वगुणांमध्ये स्थित असते, तेव्हा त्याचे कर्म कष्टप्रद असते आणि तमोगुणांमध्ये असते तेव्हा तो शुध्द जीवयोनीत भ्रमण करत असतो. तरीही या श्लोकावरून स्पष्टच आहे की, बध्द जीवावर, मन व इंद्रियासहित भौतिक शरिराचे आच्छादन आहे आणि जीव मुक्त झाल्यावर हे भौतिक आच्छादन नष्ट होते. परंतु त्याचवेळी त्याचा आध्यात्मिक देह त्याच्या मूळ रुपात व्यक्त होतो. जेव्हा जीव या प्राकृत देहाचा त्याग करून वैकुंठलोकात प्रवेश करतो तेव्हा त्याला त्याचे अध्यात्मिक शरीर प्राप्त होते. आपल्या अध्यात्मिक शरीराव्दारे तो भगवंतांना समोरासमोर पाहू शकतो. ‘स्मृती’वरूनही असे कळून येते की, वैकुंठ लोकांमध्ये जीव हा भगवंतांच्या दिव्य शरीरासारख्याच शरीरामध्ये वास करतो. भगवंतांचे विभिन्नांश असणाºया जीवांमध्ये आणि विष्णूमूर्तींच्य विस्तारांमध्ये मुळीच भेद नसतो. दुसºया शब्दात सांगावयाचे तर भगवतांच्या कृपेमुळे जीवाला मुक्तीनंतर अध्यात्मिक देहाची प्राप्ती होते.- रेवतीरमण दास

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव