शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

देहिनोऽस्मिन्यथा देहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 21:30 IST

भगवंत स्वत:चा विस्तार असंख्य रुपांमध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रुपांना विष्णूतत्व म्हटले जाते तर दुय्यम किंवा गौव विस्तारांना ...

भगवंत स्वत:चा विस्तार असंख्य रुपांमध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रुपांना विष्णूतत्व म्हटले जाते तर दुय्यम किंवा गौव विस्तारांना जीवतत्व म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाले तर, विष्णूतत्व म्हणजे त्यांचे स्वांश तर जीव म्हणजे विभिन्नांश आहेत. भगवंत स्वत:च्या वैयक्तिक विस्ताराव्दारे भगवान राम, नृसिंहदेव, विष्णूमूर्ती आणि वैकुंठलोकातील इतर सर्व अधिष्ठाता मूर्तींच्या रुपात प्रकट होतात.भगवंतांचे स्वांश अर्थात, त्यांची प्रधान रूपे नित्य अस्तित्वात असतात. त्याचप्रमाणे त्याचे विभिन्नांश असणाºया जीवांनाही व्यक्तित्व असते. जीव हे भगवंतांचे अंश असल्याकारणाने त्यांच्यामध्ये भगवंतांचे गुणही अंशरुपाने असतात. स्वातंत्र्य हा एक गुण आहे.या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने जीव बध्द होतो आणि योग्य उपयोग केल्याने तो सदैव मुक्त राहतो. योंपैकी कोणत्याही स्थितीत तो भगवंतांप्रमाणेच गुणात्मकदृष्ट्या सनातन आहे. मुक्तावस्थेमध्ये तो या भौतिक बध्द जीवनातून मुक्त असतो आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न असतो; बध्द जीवनामध्ये त्याच्यावर त्रिगुणांचे वर्चस्व असते आणि त्याला दिव्य प्रेममयी भगवत् सेवेचे विस्मरण झालेले असते.मांजर-कुत्री, मनुष्य-प्राणी इत्यादी जीवच नव्हे तर या प्राकृत जगताचे ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि विष्णू इत्यादी महान नियंत्रकही भगवंतांचे अंश आहेत. ते सर्व अनित्य नसून शाश्वत आहेत. बध्द जीव हा जणू काही लोखंडांच्या साखळ्यांनी बांधला गेला आहे. तो मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि मन त्याला संसारात संघर्ष करण्यास भाग पाडण्याच प्रमुख कारण आहे.जेव्हा त्याचे मन सत्वगुणांमध्ये स्थित असते, तेव्हा त्याचे कर्म कष्टप्रद असते आणि तमोगुणांमध्ये असते तेव्हा तो शुध्द जीवयोनीत भ्रमण करत असतो. तरीही या श्लोकावरून स्पष्टच आहे की, बध्द जीवावर, मन व इंद्रियासहित भौतिक शरिराचे आच्छादन आहे आणि जीव मुक्त झाल्यावर हे भौतिक आच्छादन नष्ट होते. परंतु त्याचवेळी त्याचा आध्यात्मिक देह त्याच्या मूळ रुपात व्यक्त होतो. जेव्हा जीव या प्राकृत देहाचा त्याग करून वैकुंठलोकात प्रवेश करतो तेव्हा त्याला त्याचे अध्यात्मिक शरीर प्राप्त होते. आपल्या अध्यात्मिक शरीराव्दारे तो भगवंतांना समोरासमोर पाहू शकतो. ‘स्मृती’वरूनही असे कळून येते की, वैकुंठ लोकांमध्ये जीव हा भगवंतांच्या दिव्य शरीरासारख्याच शरीरामध्ये वास करतो. भगवंतांचे विभिन्नांश असणाºया जीवांमध्ये आणि विष्णूमूर्तींच्य विस्तारांमध्ये मुळीच भेद नसतो. दुसºया शब्दात सांगावयाचे तर भगवतांच्या कृपेमुळे जीवाला मुक्तीनंतर अध्यात्मिक देहाची प्राप्ती होते.- रेवतीरमण दास

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव