शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

देह जावो ...अथवा राहो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:21 IST

साऱ्या संतांच्या मांदियाळीने देवाच्या स्वरूपाचा परिचय करून घेतला आणि देव मिळवला

साऱ्या संतांच्या मांदियाळीने देवाच्या स्वरूपाचा परिचय करून घेतला आणि देव मिळवला. कोणत्याही गोष्टीचा परिचय पूर्णपणे झाल्याशिवाय त्या गोष्टीची आपल्याला पूर्ण जाणीव होत नाही. कधी- कधी वाणीवरून परिचय होतो. चालण्या बोलण्यावरून परिचय होतो. पण हा वरवरचा परिचय.काही लोक कुंभमेळ्याला गेले. तिथे भगव्या कपड्यातील चार साधू बसलेले दिसले. त्यांच्याशी परिचय करून घेऊ, म्हणून लोक त्यांच्यातील पहिल्या साधुकडे गेले आणि त्याला विचारले की, महात्माजी आम्ही संसारात त्रस्त झालो आहोत, आम्हाला यातून सोडवण्यासाठी मार्गदर्शन करा. साधू म्हणाला ‘राम नाम लड्डू’! गोपाळ नाम घी! हरी नाम मिश्री! घोर घोर पी! लोकांना वाटलं की सर्व खाद्यपदार्थ विषयी सांगतोय, म्हणजे हा साधू ब्राम्हण असावा. त्यानंतर दुसºया साधूकडे गेले आणि त्यालाही विचारले तर तो म्हणाला ‘राम नाम का खड्ग बनाया !कृष्ण नाम की कट्यार!हरी नाम की ढाल बनाके! यम का फंदा कात लिया!’ त्याने शस्त्रांचा विचार सांगितला याचा अर्थ हा क्षत्रिय असला पाहिजे.तिसºया साधू कडे गेले, तो म्हणाला यह संसार सब हट्ट है! ज्या को जेसो कर्म ! टोळी दियो सामान! हा व्यापार विषयी बोलतो म्हणजे हा साधू वैश्य असला पाहिजे. चौथ्या साधूकडे गेले, तो म्हणाला... राम नाम झरोखे बैठ कर! कृष्ण नाम की मुजरा ले! या वरून हा साधू क्षुद्र कुळातील असला पाहिजे. असा अंदाज त्यांनी लावला.याचा अर्थ वाणी वरून सुध्दा परिचय होतो.संत तुकाराम महाराज यांनी एका अभंगात भगवंताचा परिचय दिला आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी! कर कटेवरी ठेवोनिया! यात भगवंताचा स्थूल किंवा तटस्थ किंवा रूपाचा परिचय करून दिला आहे तर शेवटच्या चरणात भगवंताचा स्वरूपाचा परिचय करून दिला आहे. हा सूक्ष्म किंवा स्वरूपाचा परिचय झाल्याशिवाय देव म्हणजे सुख आपल्याला मिळणार नाही. म्हणजेच अहं ब्रम्हस्मी या विचारावर आल्याशिवाय देव कळणार नाही आणि देवच अनुभवला नाही तर सुख कधी अनुभवता येईल. म्हणून जाणोनी नेणोनी अंगा आली दशा! मग होय ईच्छा आपणच! या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे संसारातून नेणते झाल्याशिवाय देवाची म्हणजे सुखाची जाणीव होणार नाही.नामदेव महाराज म्हणतात देह जावो अथवा राहो ! पांडुरंगा दृढ भाव! या जाणीव वर ठाम राहून आनंदी जीवन जगता येते, हा संतांचा अनुभव प्रत्यक्षात उतरवण्याच्या प्रयत्न करावा हीच खरी जीवनाची इती कर्तव्यता.े. त्यासाठी विठ्ठल आमुचे जीवन!आगम निगम चे स्थान! विठ्ठल सिद्धीचे साधन! विठ्ठल ध्यान विसावा!- भाऊराव महाराज, मुक्ताईनगर.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव