शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

देह जावो ...अथवा राहो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:21 IST

साऱ्या संतांच्या मांदियाळीने देवाच्या स्वरूपाचा परिचय करून घेतला आणि देव मिळवला

साऱ्या संतांच्या मांदियाळीने देवाच्या स्वरूपाचा परिचय करून घेतला आणि देव मिळवला. कोणत्याही गोष्टीचा परिचय पूर्णपणे झाल्याशिवाय त्या गोष्टीची आपल्याला पूर्ण जाणीव होत नाही. कधी- कधी वाणीवरून परिचय होतो. चालण्या बोलण्यावरून परिचय होतो. पण हा वरवरचा परिचय.काही लोक कुंभमेळ्याला गेले. तिथे भगव्या कपड्यातील चार साधू बसलेले दिसले. त्यांच्याशी परिचय करून घेऊ, म्हणून लोक त्यांच्यातील पहिल्या साधुकडे गेले आणि त्याला विचारले की, महात्माजी आम्ही संसारात त्रस्त झालो आहोत, आम्हाला यातून सोडवण्यासाठी मार्गदर्शन करा. साधू म्हणाला ‘राम नाम लड्डू’! गोपाळ नाम घी! हरी नाम मिश्री! घोर घोर पी! लोकांना वाटलं की सर्व खाद्यपदार्थ विषयी सांगतोय, म्हणजे हा साधू ब्राम्हण असावा. त्यानंतर दुसºया साधूकडे गेले आणि त्यालाही विचारले तर तो म्हणाला ‘राम नाम का खड्ग बनाया !कृष्ण नाम की कट्यार!हरी नाम की ढाल बनाके! यम का फंदा कात लिया!’ त्याने शस्त्रांचा विचार सांगितला याचा अर्थ हा क्षत्रिय असला पाहिजे.तिसºया साधू कडे गेले, तो म्हणाला यह संसार सब हट्ट है! ज्या को जेसो कर्म ! टोळी दियो सामान! हा व्यापार विषयी बोलतो म्हणजे हा साधू वैश्य असला पाहिजे. चौथ्या साधूकडे गेले, तो म्हणाला... राम नाम झरोखे बैठ कर! कृष्ण नाम की मुजरा ले! या वरून हा साधू क्षुद्र कुळातील असला पाहिजे. असा अंदाज त्यांनी लावला.याचा अर्थ वाणी वरून सुध्दा परिचय होतो.संत तुकाराम महाराज यांनी एका अभंगात भगवंताचा परिचय दिला आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी! कर कटेवरी ठेवोनिया! यात भगवंताचा स्थूल किंवा तटस्थ किंवा रूपाचा परिचय करून दिला आहे तर शेवटच्या चरणात भगवंताचा स्वरूपाचा परिचय करून दिला आहे. हा सूक्ष्म किंवा स्वरूपाचा परिचय झाल्याशिवाय देव म्हणजे सुख आपल्याला मिळणार नाही. म्हणजेच अहं ब्रम्हस्मी या विचारावर आल्याशिवाय देव कळणार नाही आणि देवच अनुभवला नाही तर सुख कधी अनुभवता येईल. म्हणून जाणोनी नेणोनी अंगा आली दशा! मग होय ईच्छा आपणच! या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे संसारातून नेणते झाल्याशिवाय देवाची म्हणजे सुखाची जाणीव होणार नाही.नामदेव महाराज म्हणतात देह जावो अथवा राहो ! पांडुरंगा दृढ भाव! या जाणीव वर ठाम राहून आनंदी जीवन जगता येते, हा संतांचा अनुभव प्रत्यक्षात उतरवण्याच्या प्रयत्न करावा हीच खरी जीवनाची इती कर्तव्यता.े. त्यासाठी विठ्ठल आमुचे जीवन!आगम निगम चे स्थान! विठ्ठल सिद्धीचे साधन! विठ्ठल ध्यान विसावा!- भाऊराव महाराज, मुक्ताईनगर.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव