शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उद्दीष्ट निश्चित करुन पूर्णत्त्वाची जिद्द बाळगा-प्रांजल पाटील

By admin | Updated: June 8, 2017 11:06 IST

‘लोकमत’ला सदिच्छा भेटीदरम्यान तरुणांना दिला यशाचा मंत्र

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.8 - आत्मविश्वास ठेवून स्वत: निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर यश हमखास मिळते. यासाठी जीवनात कोणते तरी एक उद्दीष्ट ठरवा व ते पूर्ण करण्याची जिद्द बाळगा असा यशाचा मंत्र केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण प्रज्ञाचक्षू प्रांजल पाटील हिने दिला. 
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 124 व्या आलेल्या प्रांजल पाटील हिने बुधवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी प्रांजलचे पती कोमलसिंग पाटील, वडील एल.बी. पाटील तसेच ‘दीपस्तंभ’चे जयदीप पाटील उपस्थित होते. या वेळी प्रांजलशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद...
प्रश्न- प्राथमिक शिक्षण ते स्पर्धा परीक्षा हा प्रवास कसा शक्य झाला?
प्रांजल पाटील- मी  जन्मत: अंध नाही. काही कारणांमुळे माझी दृष्टी गेली. त्यामुळे दादर येथे अंधशाळेत ब्रेल लिपीमध्ये शिक्षण घेतले. ही ब्रेल लिपी दहावीर्पयतच उपलब्ध होती. त्यानंतर इयत्ता अकरावीपासून ब्रेल लिपी नव्हती. त्यामुळे मी घरी ब्रेल लिहू लागले. यासाठी मला आईची खूप मदत झाली. पदवीचे शिक्षण तर संगणकाच्या साहाय्याने घेतले. स्पर्धा परीक्षेचीही अशीच जिद्दीने तयारी केली व त्यात यश मिळाले. 
प्रश्न- भविष्यातील काय कल्पना आहे?
प्रांजल पाटील - तशा माङया तर भरपूर कल्पना आहे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला स्वत:ला खूप विकसित करायचे आहे. आज समाजात मोठय़ा प्रमाणात विषमता आहे. कोठेही नोकरी करायची झाल्यास रँकनुसार नोकरी मिळतच नाही. आर्थिक, सामाजिक विषमता दूर करण्यासाठीही मला काम करायचे आहे. समानता आणण्यासाठी शिक्षण हा मोठा घटक आहे. त्यामुळे शाळांमध्येही मी बोलणार आहे. 
प्रश्न - अभ्यासाचे नियोजन कसे असायचे?
प्रांजल पाटील - अभ्यास करण्याची प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते. अभ्यासाचे माङो गणित तासात कधीच नसायचे. मी सकाळी लवकर उठून अभ्यासाला सुरुवात करायची व त्यात सलगता ठेवत असे. दिवसभरात जे वाचायचे आहे, त्याचे नियोजन करायचे. रविवारी चाचणी परीक्षा असायची त्यामुळे त्या पद्धतीने अभ्यास करीत असे. 
प्रश्न- गेल्या वर्षाचा व आताचा  परीक्षेचा अनुभव कसा राहिला?
प्रांजल पाटील - मला माझी रँक वाढवायची होती. प्रशासकीय सेवा करायची असल्याने त्या दृष्टीने मी तयारी केली. यंदा तर माझा आत्मविश्वास आणखी वाढलेला होता. अनुभवामुळे चुका कमी झाल्या. 
प्रश्न- आजच्या तरुण पिढीला काय मंत्र द्याल?
प्रांजल पाटील - प्रत्येक व्यक्ती ‘युनिक’आहे. आपण स्वत: विश्वासाने कशालाही सामोरे जा. स्वत:साठी उद्दीष्ट ठरवा. केवळ सामाजिक प्रतिष्ठा म्हणून पद मिळवू नये तर त्यासाठी मनाचीही तयारी असावी.
स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक काय ?
स्पर्धा परीक्षेत यशासाठी एकच गोष्ट कारणीभूत ठरली नाही तर दोन ते तीन मुद्दे यासाठी महत्त्वाचे ठरले. अभ्यास करताना ब:याचवेळा नकारात्मक दृष्टिकोन होऊ शकतो, तो टाळला पाहिजे. चांगली सोबत असणे गरजेचे आहे. मला आईची सदैव साथ मिळाली व तिने मला नकारात्मक गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मित्र-मैत्रिणींनीही मला चांगली साथ दिली. यामुळे यश मिळवायचे असेल तर सकारात्मक दृष्टिकोन, धैर्य आणि स्वत:ला अभ्यासात गुंतवून ठेवणे गरजेचे आहे आणि मी तेच केले, तेच माङया यशाचे गमक आहे.