शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

ठेवीदारांची शपथपत्रावरून बचाव व सरकार पक्षात खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:11 IST

युक्तीवादात ॲड.चव्हाण यांनी सांगितले की, विवेक ठाकरे यांच्यात टेम्परींग करण्याची ताकद आहे. पोलीस कोठडीत असताना त्यांनी ठेवीदारांची ९ शपथपत्रे ...

युक्तीवादात ॲड.चव्हाण यांनी सांगितले की, विवेक ठाकरे यांच्यात टेम्परींग करण्याची ताकद आहे. पोलीस कोठडीत असताना त्यांनी ठेवीदारांची ९ शपथपत्रे करुन घेतली. यावर आरोपीचे वकील उमेश रघूवंशी यांनी आक्षेप घेतला. कोठडीत असताना कसे काय हे करु शकतो. पोलिसांनी इतरांशी बोलायला सवलत दिली होती का? असा आक्षेप नोंदविला. आम्ही ठेवीदारांकडे गेलो नाही. ते आमच्याकडे आले होते, असे सांगितले. दोन्ही वकिलांमध्ये बराचवेळ शाब्दीक खडाजंगी झाली. बीएचआर प्रकरणात अटक झालेल्या पाचही संशयित आरोपींना पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर रविवारी पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी तर बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीसाठी युक्तीवाद केला. बचाव पक्षाच्या वकिलांच्या आक्षेपावर ॲड.चव्हाण यांनी सांगितले की, पुण्यातील लोक जळगावला गेले नव्हते. तुम्ही सारसबागेत आला होता. बनावट वेबसाईट बनविणाऱ्याची माहिती मिळाली आहे. महावीर जैन यांची नेमणूक केली नसताना त्याचे मानधन कंडारे याने कसे काय दिले. यामुळे महावीर जैन यांची संपूर्ण कृती संशयास्पद दिसून येते. आरोपींना वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्यासह सर्वांची चौकशी करायची आहे. हा सर्व कटकारस्थानाचा भाग आहे. २ ते ३ व्यक्तींचे जबाब नोंदविण्यात आले आहे. फाॅरेन्सिक ऑडिट आणि ऑडिट यात फरक आहे.

विवेक ठाकरेला किंग बनायला होते

विवेक ठाकरे यांना स्वत:ला किंग बनायचे होते. त्यामुळे यातील इतरांना बाजूला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी पुण्यातील सारसबागेत बैठक घेतली. सोसायटी प्रस्तावित असताना त्यावर पैसे जमा केले. बाहेरच्यांच्या पावत्या केल्या. ३० ते ४० जणांच्या तक्रारी आहेत. ॲड. उमेश रघुवंशी यांनी सांगितले की, ठाकरे व कंडारे यांचा काही संबंध नाही. पोलिसांनी त्यांच्या घरातून जप्त केलेली सर्व १२७ प्रकरणे मी स्वत: दिली आहेत. ज्या बैठका घेतल्या. त्यात कोण कोण उपस्थित होते, यांच्या सह्या घेतलेली कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्व जणांची यादी आहे. ठेवीदारांच्या वतीने आपण काम पहात होतो. ठेवीदारांना प्रत्येक वेळी जळगाव येणे शक्य नसल्याने त्यांनी त्यांच्या मुळ ठेवपावत्या आपल्याकडे दिल्या होत्या. पोलिसांनी मागील पोलीस कोठडीच्या वेळी जी कारणे दिली आहेत, तीच कारणे यामध्ये पुन्हा दिली आहेत. ठेवीदारांना व्याजासह सर्व पैसे मिळावेत, अशीच आपली भूमिका आहे. ९ ठेवीदारांनी शपथपत्र दिली असून त्यात त्यांनी विवेक ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आमची कोणतीही फसवणूक झाली नसल्याचे सांगितले. पोलिसांनी जप्त केलेली कागदपत्रे ही माहिती अधिकारात मिळविलेली आहेत. ठेवीदारांसाठी लढा उभारतोय आहे हा गुन्हा आहे का? सामाजिक संस्थेमार्फत पारदर्शक काम करतो असे त्यांनी सांगितले. कमलाकर कोळीचा बचाव मांडताना ॲड. रघुवंशी यांनी सांगितले की, आपण चालक म्हणून कंडारे सांगतील, त्या ठिकाणी घेऊन जाणे हे काम होते. आपण ऑफिसर बेअरर नाही. फक्त चालक होतो. त्यामुळे त्यांनी कोणाबरोबर काय व्यवहार केले याच्याशी आपला काहीही संबंध नाही. दरम्यान, ठेवीदारांच्या वतीने ॲड. मनोज नायक, ॲड, अक्षता नायक यांनी आज न्यायालयात एक अर्ज केला. त्यात ठेवीदारांच्या वतीने आपल्याला बाजू मांडण्यास संधी द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.